शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजारी उद्योगांसाठी विशेष अभय योजना

By admin | Updated: September 9, 2014 23:56 IST

हिंगोली : राज्यात पुनरूज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकांना सुलभ निर्गमन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभय योजना सुरू करण्यात आली आहे.

हिंगोली : राज्यात पुनरूज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकांना सुलभ निर्गमन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभय योजना सुरू करण्यात आली आहे. समतोल औद्योगिक विकास घडविण्यासाठी व त्याद्वारे आर्थिक विकास साधण्यासाठी आणि नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेस चालना देण्यासाठी व त्याद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक धोरण २०१३ नुसार ही योजना राबविण्यात येणार आहे. सदरील योजनेचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील संबंधित लाभार्थ्यांनी घेण्याचे घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे. पुनरूज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकांची जमिनीसकटची स्थिर मालमत्ता वापरात येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीचे निकष पूर्ण करणाऱ्या उद्योग घटकांना विशेष अभय योजनेद्वारे सुलभ निर्गमन पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. १ वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असलेल्या किंवा न्यायालयाकडून नादार-दिवाळखोर म्हणून घोषित झालेला उद्योग घटक, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुनरूज्जीवन नसलेला उद्योग घटक घटकाच्या व्यवस्थापनामध्ये बदल होवून, घटक पुढे यशस्वीरित्या चालू रहावा. या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या घटकांनी राज्य शासनाची सर्व मुदलाची रक्कम एकरकमी भरल्यास व्याज व दंड व्याज माफ केले जाईल. सदर योजना ही शासनाची सर्व प्रकारची देणी म्हणजे विक्रीकर, वीज वितरण कंपनीची मूळ रक्कम, व्याज, दंड व्याज इत्यादीसह जो रक्कम येईल ती सर्व रक्कम थकबाकी समजण्यात येईल. सदर योजना निमशासकीय संस्था, शासकीय कंपन्या व महामंडळे यांच्याकडील थकित देण्यासाठी लागू राहील. सदर योजना शासनाने सन २०१३-१४ या आर्थिक वर्षांत राबवली होती. या योजनेस माहे मार्च २०१५ अखेरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या योजनेविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)