शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

आजारी उद्योगांसाठी विशेष अभय योजना

By admin | Updated: September 9, 2014 23:56 IST

हिंगोली : राज्यात पुनरूज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकांना सुलभ निर्गमन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभय योजना सुरू करण्यात आली आहे.

हिंगोली : राज्यात पुनरूज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकांना सुलभ निर्गमन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभय योजना सुरू करण्यात आली आहे. समतोल औद्योगिक विकास घडविण्यासाठी व त्याद्वारे आर्थिक विकास साधण्यासाठी आणि नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेस चालना देण्यासाठी व त्याद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक धोरण २०१३ नुसार ही योजना राबविण्यात येणार आहे. सदरील योजनेचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील संबंधित लाभार्थ्यांनी घेण्याचे घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे. पुनरूज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकांची जमिनीसकटची स्थिर मालमत्ता वापरात येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीचे निकष पूर्ण करणाऱ्या उद्योग घटकांना विशेष अभय योजनेद्वारे सुलभ निर्गमन पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. १ वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असलेल्या किंवा न्यायालयाकडून नादार-दिवाळखोर म्हणून घोषित झालेला उद्योग घटक, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुनरूज्जीवन नसलेला उद्योग घटक घटकाच्या व्यवस्थापनामध्ये बदल होवून, घटक पुढे यशस्वीरित्या चालू रहावा. या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या घटकांनी राज्य शासनाची सर्व मुदलाची रक्कम एकरकमी भरल्यास व्याज व दंड व्याज माफ केले जाईल. सदर योजना ही शासनाची सर्व प्रकारची देणी म्हणजे विक्रीकर, वीज वितरण कंपनीची मूळ रक्कम, व्याज, दंड व्याज इत्यादीसह जो रक्कम येईल ती सर्व रक्कम थकबाकी समजण्यात येईल. सदर योजना निमशासकीय संस्था, शासकीय कंपन्या व महामंडळे यांच्याकडील थकित देण्यासाठी लागू राहील. सदर योजना शासनाने सन २०१३-१४ या आर्थिक वर्षांत राबवली होती. या योजनेस माहे मार्च २०१५ अखेरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या योजनेविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)