शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

सोयाबीनचा तुटवडा भासणार

By admin | Updated: May 19, 2014 01:08 IST

शेषराव वायाळ, परतूर अवकाळी पावसाने सोयाबीनची प्रत खराब झाल्याने यंदाच्या खरीप हंगामात ‘सोयाबीन’ बियाणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होण्याची शक्यता आहे

शेषराव वायाळ, परतूर अवकाळी पावसाने सोयाबीनची प्रत खराब झाल्याने यंदाच्या खरीप हंगामात ‘सोयाबीन’ बियाणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान कृषी विभागही याबाबत भीती व्यक्त करीत आहे. यावर्षी ऐन सोयाबीन काढणीच्या वेळीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारा, वार्‍यासह हा पाऊस सतत पडत राहिल्याने काढणीस आलेले व काढून टाकलेले सोयाबीन पाण्यात भिजले. काही ठिकाणी तर काढून टाकलेले सोयाबीन सततच्या पावसाने अक्षरश: पाण्यावर तरंगत होते. यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. बरोबरच झालेल्या सोयाबीनची प्रतही खराब झाली. विविध कंपन्यांच्या बियाणे प्लॉटचीही अशीच अवस्था झाली. तालुक्यात शेतकर्‍यांकडे २ हजार ४६० क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. या उपलब्ध बियाणांचा दर्जा खालावल्यामुळे, उगवण शक्ती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरील बियाणावर बीज प्रकिया करून, उगवण शक्तीची तपासणी करूनच शेतकर्‍यांना बियाणे पेरणी करावी लागणार आहे. सोयाबीन पिकाला लागवडीपासून काढणी पर्यंत खर्च कमी लागतो. त्यामुळे इतर पिकांपेक्षा तालुक्यातील शेतकरी आता सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. मागील वर्षी १२ ते १३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. या वर्षी पुन्हा हे क्षेत्र वाढून १५ ते १६ हेक्टर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र आता या वाढत्या क्षेत्राला बियाणे कोठून आणायचे असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे पडला आहे. एकूणच बियाणांच्या अत्यल्प उत्पादनामुळे बियाणांचा काळा बाजार करणारेही पुढे सरसावणार आहेत. बियाणांचा होणारा तुटवडा व शेतकर्‍यांची वाढती मागणी याबाबतीत कृषी विभागही धास्तावला आहे. एकूणच यावर्षी सेयाबीन उत्पादक मोठ्या अडचणीत सापडला आहे. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे म्हणाले की, अवकाळी पावसाने सोयाबीनच्या बियाणांचा दर्जा खालावल्यामुळे उगवण शक्ती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्याच बियाणांची खात्रीने पेरणी करावी असेही कांबळे यांनी सांगितले.