शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर अळी

By admin | Updated: August 7, 2014 01:39 IST

औसा: खरीपातील पेरण्यांना महिनाभर उशीर झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनवर भर दिला़ परंतु,

औसा: खरीपातील पेरण्यांना महिनाभर उशीर झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनवर भर दिला़ परंतु, निम्म्या क्षेत्रावरील बियाणे उगवले नाही़ त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ जे बियाणे उगवले ते आता पावसाअभावी कोमेजून जात आहे़ मागील १५ दिवसांपासून पाऊस नाही़ वातावरण ढगाळ निर्माण होत असल्याने हे वातावरण आळ्यांना पोषक ठरत आहे़ परिणामी, सोयाबीनवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी धास्तावला आहे़औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबुन असलेला तालुका आहे़मागील तीन चार वर्षापासून औसा तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे़यावर्षी तर खरीपाच्या पेरण्यांना महिनाभराचा विलंब झाल्यामुळे मुग उडीद पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे़तसेच पावसाला विलंब झाल्यामुळे संकरीत ज्वारीसह खरीप हंगामातील अन्य पिकांच्या पेरण्याकडेही न वळता शेतकरी सोयाबीनकडे वळला़सध्या तालुक्यात ८५ ते ९० हेक्टरक्षेत्रावर पेरण्या झाल्या असून ५० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे़लवकर निघणारे नगदी पिक असल्यामुळे व एकाच वेळी दोन पिके घेता येत असल्यामुळे सोयाबीनच्या पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे़त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे़ एकूण क्षेत्रापैकी पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी वाढली परंतू त्यातील अर्धे बियाणे उगवले तर अर्धे बियाणे उगवलेच नाही़ त्यातच राहीलेल्या सोयाबीनवरही पाने गुंडाळणाऱ्या आळीने मोठ्या प्रमाणात हल्ला केला आहे़ढगाळ वातावरण असल्यामुळे हे वातावरण आळ्यासाठी पोषक आहे़ मोठा पाऊस झाला तर आळ्या राहणार नाहीत़ पाऊसच नसल्याने शेतकरी धास्तावला आहे़(वार्ताहर)