शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

६० हजार हेक्टरवरील सोयाबीनचा झाला धुराळा

By admin | Updated: August 13, 2014 01:06 IST

रमेश शिंदे , औसा औसा तालुक्यात यावर्षी खरीप हंगामाच्या पेरण्यांना तब्बल महिनाभर उशिर झाला होता़ १० जुलै दरम्यान, कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ काही

रमेश शिंदे , औसाऔसा तालुक्यात यावर्षी खरीप हंगामाच्या पेरण्यांना तब्बल महिनाभर उशिर झाला होता़ १० जुलै दरम्यान, कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ काही भागामध्ये अजूनही अपुऱ्या पावसामुळे पेरण्या झाल्या नाहीत़ तर काही ठिकाणी पेरण्या होऊन महिना उलटला तरी पाऊस झाला नाही़ परिणामी ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन धुराळा होण्याच्या मार्गावर आहे़ औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून असणारा तालुका आहे़ तालुक्यातील १ लाख २० हजार ७२० हेक्टर इतके क्षेत्र असलेल्या या तालुक्यात १ लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पिके घेतली जातात़ यावर्षी ४ आॅगस्टपर्यंत ९८ हजार ७०८ हेक्टरवर खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या आहेत़ यामध्ये ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ त्याखालोखाल २० हजार ७६६ हेक्टर क्षेत्रावर तूर तर ९ हजार ५२८ हेक्टर क्षेत्रावर हायब्रीड ज्वारी ही प्रमुख पिके घेण्यात आली आहेत़ तालुक्यात एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे नद्या, नाले, विहिर, बोअर कोरडे पडले आहेत़ त्यामुळे पाणीटंचाई अजूनही कायम आहे़ रिमझिम पावसावर पिकांनी तग धरली़ पण आता पंधरा दिवसापासून पाऊस नसल्यामुळे पिके जागेवरच वाळून चालली आहेत़ एकूण ६० हजार हेक्टरवरील सोयाबीन धुराळा होण्याच्या मार्गावर आहे़ याबाबत तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सोयाबीनची पेरणी १५ जुलैपुर्वी झाली पाहिजे़ परंतु, १० जुलैला पाऊस पडल्याने पेरण्या १५ जुलैनंतर झाल्या़ त्यातच आता पावसाने उघडीप दिल्याने २५ ते ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ याबाबत तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पावसाळ्याचे दोन महिने संपले आतापर्यंत ३६४ मिली मीटर पाऊस झाला पाहिजे़ परंतु, १२ आॅगस्टपर्यंत १५८ मिली मिटर पाऊस झाला आहे़ त्यामुळे आठवडाभरात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागेन, असे मतही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मंगळवारी व्यक्त केले़