शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार हेक्टरवरील सोयाबीनचा झाला धुराळा

By admin | Updated: August 13, 2014 01:06 IST

रमेश शिंदे , औसा औसा तालुक्यात यावर्षी खरीप हंगामाच्या पेरण्यांना तब्बल महिनाभर उशिर झाला होता़ १० जुलै दरम्यान, कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ काही

रमेश शिंदे , औसाऔसा तालुक्यात यावर्षी खरीप हंगामाच्या पेरण्यांना तब्बल महिनाभर उशिर झाला होता़ १० जुलै दरम्यान, कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ काही भागामध्ये अजूनही अपुऱ्या पावसामुळे पेरण्या झाल्या नाहीत़ तर काही ठिकाणी पेरण्या होऊन महिना उलटला तरी पाऊस झाला नाही़ परिणामी ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन धुराळा होण्याच्या मार्गावर आहे़ औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून असणारा तालुका आहे़ तालुक्यातील १ लाख २० हजार ७२० हेक्टर इतके क्षेत्र असलेल्या या तालुक्यात १ लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पिके घेतली जातात़ यावर्षी ४ आॅगस्टपर्यंत ९८ हजार ७०८ हेक्टरवर खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या आहेत़ यामध्ये ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ त्याखालोखाल २० हजार ७६६ हेक्टर क्षेत्रावर तूर तर ९ हजार ५२८ हेक्टर क्षेत्रावर हायब्रीड ज्वारी ही प्रमुख पिके घेण्यात आली आहेत़ तालुक्यात एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे नद्या, नाले, विहिर, बोअर कोरडे पडले आहेत़ त्यामुळे पाणीटंचाई अजूनही कायम आहे़ रिमझिम पावसावर पिकांनी तग धरली़ पण आता पंधरा दिवसापासून पाऊस नसल्यामुळे पिके जागेवरच वाळून चालली आहेत़ एकूण ६० हजार हेक्टरवरील सोयाबीन धुराळा होण्याच्या मार्गावर आहे़ याबाबत तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सोयाबीनची पेरणी १५ जुलैपुर्वी झाली पाहिजे़ परंतु, १० जुलैला पाऊस पडल्याने पेरण्या १५ जुलैनंतर झाल्या़ त्यातच आता पावसाने उघडीप दिल्याने २५ ते ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ याबाबत तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पावसाळ्याचे दोन महिने संपले आतापर्यंत ३६४ मिली मीटर पाऊस झाला पाहिजे़ परंतु, १२ आॅगस्टपर्यंत १५८ मिली मिटर पाऊस झाला आहे़ त्यामुळे आठवडाभरात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागेन, असे मतही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मंगळवारी व्यक्त केले़