शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

६० हजार हेक्टरवरील सोयाबीनचा झाला धुराळा

By admin | Updated: August 13, 2014 01:06 IST

रमेश शिंदे , औसा औसा तालुक्यात यावर्षी खरीप हंगामाच्या पेरण्यांना तब्बल महिनाभर उशिर झाला होता़ १० जुलै दरम्यान, कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ काही

रमेश शिंदे , औसाऔसा तालुक्यात यावर्षी खरीप हंगामाच्या पेरण्यांना तब्बल महिनाभर उशिर झाला होता़ १० जुलै दरम्यान, कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ काही भागामध्ये अजूनही अपुऱ्या पावसामुळे पेरण्या झाल्या नाहीत़ तर काही ठिकाणी पेरण्या होऊन महिना उलटला तरी पाऊस झाला नाही़ परिणामी ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन धुराळा होण्याच्या मार्गावर आहे़ औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून असणारा तालुका आहे़ तालुक्यातील १ लाख २० हजार ७२० हेक्टर इतके क्षेत्र असलेल्या या तालुक्यात १ लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पिके घेतली जातात़ यावर्षी ४ आॅगस्टपर्यंत ९८ हजार ७०८ हेक्टरवर खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या आहेत़ यामध्ये ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ त्याखालोखाल २० हजार ७६६ हेक्टर क्षेत्रावर तूर तर ९ हजार ५२८ हेक्टर क्षेत्रावर हायब्रीड ज्वारी ही प्रमुख पिके घेण्यात आली आहेत़ तालुक्यात एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे नद्या, नाले, विहिर, बोअर कोरडे पडले आहेत़ त्यामुळे पाणीटंचाई अजूनही कायम आहे़ रिमझिम पावसावर पिकांनी तग धरली़ पण आता पंधरा दिवसापासून पाऊस नसल्यामुळे पिके जागेवरच वाळून चालली आहेत़ एकूण ६० हजार हेक्टरवरील सोयाबीन धुराळा होण्याच्या मार्गावर आहे़ याबाबत तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सोयाबीनची पेरणी १५ जुलैपुर्वी झाली पाहिजे़ परंतु, १० जुलैला पाऊस पडल्याने पेरण्या १५ जुलैनंतर झाल्या़ त्यातच आता पावसाने उघडीप दिल्याने २५ ते ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ याबाबत तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पावसाळ्याचे दोन महिने संपले आतापर्यंत ३६४ मिली मीटर पाऊस झाला पाहिजे़ परंतु, १२ आॅगस्टपर्यंत १५८ मिली मिटर पाऊस झाला आहे़ त्यामुळे आठवडाभरात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागेन, असे मतही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मंगळवारी व्यक्त केले़