शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

पथदिवे काही उजळेनात..!

By admin | Updated: December 19, 2014 00:55 IST

जालना : अक्षय योजनेचे दोन हप्ते थकीत राहिल्याने महावितरणने नगरपालिकेचा वीजपुरवठा पुन्हा खंडित केल्याने शहरातील पथदिवे बंद असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

जालना : अक्षय योजनेचे दोन हप्ते थकीत राहिल्याने महावितरणने नगरपालिकेचा वीजपुरवठा पुन्हा खंडित केल्याने शहरातील पथदिवे बंद असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. शहरात एकूण १३०० पथदिवे आहेत. मात्र त्यापैकी अनेक दिवे खराब झाल्याने बंद आहेत. पथदिव्यांच्या वीज बिलापोटी थकबाकीची रक्कम १४ कोटींवर गेल्याने दोन वर्षांपूर्वीपासून महावितरणने पालिकेच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यानंतर नगरपालिकेने केलेल्या पाठपुराव्यानंतर अभय योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महावितरणने घेतला. त्यामुळे पालिकेला ७ कोटी ४० लाख रुपयांचा भरणा करावा लागणार होता. या योजनेअंतर्गत पालिकेला प्रत्येकी १ कोटी ८० लाख रुपयांचे चार हप्ते पाडून देण्यात आले होते. परंतु त्यापैकी दोन हप्ते पालिकेने भरणा केला. हप्ते नियमित सुरू झाल्यामुळे महावितरणने गेल्या दोन-अडीच महिन्यांपूर्वी पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला होता. परंतु पालिकेने पुन्हा हप्ते थकविले. दोन हप्ते थकीत राहिल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी शहरात काही भागात सुरू झालेले पथदिवेही सध्या बंद आहेत. पथदिवे बंद असल्याने सर्वत्र अंधार जाणवत असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. सायंकाळनंतर महिलांना घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पेंढारकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, पथदिव्यांसाठी महावितरणने १९३ कनेक्शन दिलेले आहेत. अभय योजनेअंतर्गत वीज बिलाची थकबाकी रक्कम भरण्यासाठी पालिकेला चार हप्ते पाडून देण्यात आले होते. परंतु त्यात खंड पडला. पालिकेचे हप्ते पूर्ववत सुरळीत व्हावे, यासाठी महावितरणकडून पाठपुरावा सुरू असल्याचे पेंढारकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)४जालना नगरपालिकेसमोर आर्थिक पेच अद्यापही कायम आहे. शहरात वसुली मोहीम जोरदारपणे सुरू करण्यात आलेली असली तरी पालिकेला वीज देयकापोटी महावितरणचा हप्ता मोठ्या प्रमाणावर भरावा लागत आहे. १ कोटी ८० लाखांचे दोन हप्ते थकीत आहेत. शिवाय जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेच्या व पूर्वीच्या थकीत वीज बिलापोटी दरमहा ४० लाखांचा हप्ता भरावा लागत आहे. ४नोव्हेंबर २०१४ चा पाणीपुरवठा देयकाचा हप्ता अद्याप भरणा झालेला नाही.