शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सोशल मिडियातून मैत्री, प्रेम, फसवणूकीचा शेवट थेट कारागृहात; अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

By सुमित डोळे | Updated: May 2, 2024 19:48 IST

तीन महिन्यात ८७ गुन्हे दाखल, अत्याचाराच्या ८० टक्के प्रकरणांना प्रेमसंबंधाची मोठी किनार

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियातून मैत्री, अल्लड प्रेम, खोटे आश्वासन आणि फसवणुकीच्या रागातून बहुतांश प्रेमप्रकरणांचा शेवट कारागृहात हाेत आहे. गेल्या तीन महिन्यात शहर व जिल्ह्यात अत्याचाराचे ८७ गुन्हे दाखल झाले. गेल्या २० दिवसांमध्ये २० पेक्षा अधिक तरुणींनी प्रियकराकडून अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली. यातील जवळपास ८० टक्के गुन्ह्यात पीडिता व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीतलेच असल्याचे निरीक्षणही पोलिस नोंदवतात. मात्र, महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा व अटक अटळ असल्याने ८० पेक्षा अधिक तरुणांवर कारागृहात जाण्याची वेळ आली.

विनयभंग, छेडछाडीच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढत होत आहे. दुसरीकडे अत्याचाराच्या घटनांचा आलेखही ८ वर्षांमध्ये वाढला. असल्याचे पोलिसांच्या अहवालातून निदर्शनास येत आहे. शहरात चिकलठाणा परिसरात काही महिन्यांपूर्वी रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी प्रार्थनास्थळातून घरी जात असलेल्या विवाहितेला निर्मनुष्य परिसरात नेऊन सामूहिक हिंस्र पद्धतीने अत्याचार करून हत्या केली होती. वाळूज परिसरात अपंग व्यक्तीकडून चिमुकलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना घडली. मात्र, बहुतांश घटनांमध्ये ओळखीतल्याच व्यक्तीकडून अत्याचार, विनयभंग होत असल्याचे प्रमाण यात सर्वाधिक असल्याचेही तपासात निष्पन्न होत आहे.

एप्रिल महिन्यात वाढजानेवारीत ६ अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले तर एप्रिल महिन्यात हाच आकडा १५ पर्यंत पोहोचला. त्याशिवाय ३ बाललैंगिक अत्याचाराचे तर २३ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. २०२० च्या संपूर्ण वर्षात अत्याचाराच्या ८४ गुन्ह्यांची नोंद होती. ती २०२४ च्या एप्रिल अखेर ४७ पर्यंत पोहोचली. एकूण तीन महिन्यांमध्ये बाललैंगिक अत्याचाराचे १४ प्रकरण उघडकीस आले.

शहरात अत्याचाराच्या घटनांचा आलेखवर्ष २०१९ २०२० २०२१ २०२२ २०२३ २०२४ (एप्रिल अखेर)अत्याचार ८५ ८४ ८८ ९९ १०२ ४७विनयभंग ३०१ २४५ १९९ २९२ ३६९ ६५

ग्रामीणमध्येही मार्चमध्ये मोठी वाढमार्च महिन्यात जिल्ह्यात ७ अत्याचाराच्या तर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. यात जानेवारीत दाखल ४ अल्पवयीन अत्याचाराच्या गुन्ह्यात ५ आरोपींना अटक झाली. तर, फेब्रुवारीच्या ३ घटनांमध्ये तीनही आरोपी अटकेत आहे. मार्च महिन्यात १० गुन्ह्यांमध्ये ७ आरोपी कारागृहात गेले.

             जानेवारी फेब्रुवारी मार्च

अत्याचार             ७ ६ १७

विनयभंग            १७ ३४ २७

जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींच्या गुन्ह्यांचा आलेख

             जानेवारी फेब्रुवारी मार्च

अत्याचार ४ ३ १०

विनयभंग ५            ५ ५

जवळच्यांकडूनच घात, प्रेमसंबंधाची मोठी किनार२०२४ मध्ये शहर पाेलिस दलात दाखल अत्याचाराच्या जवळपास सर्वच घटनांमध्ये आरोपी व पीडिता एकमेकांच्या ओळखीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला प्रेमसंबंधाची मोठी किनार होती. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या तक्रारींची संख्या तुलनेने अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात वय वर्षे २० ते ३५ वयोगटातील तरुण, तरुणींचे प्रमाण अधिक आहे. दाखल गुन्ह्यांपैकी ८० टक्के गुन्ह्यात पीडिता व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे, मित्र मैत्रिण किंवा प्रेमसंबंधातील असल्याचे निरीक्षणही पोलिसांनी नोंदवले.

नंतर तथ्य राहत नाही..सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलांच्या तक्रारीत पहिले एफआयआर दाखल करणे बंधनकारक आहे. परंतु, बहुतांश अत्याचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तथ्य नसल्याचे निष्पन्न होते. नुकतेच छावणीत दाखल अल्पवयीन अत्याचार प्रकरणात देखील मुलीने तक्रार मागे घेण्यासाठी न्यायालयाकडे दाद मागितली. अशात अनेक प्रकरणात तक्रारदार न्यायालयात तक्रार मागे घेण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करतात. बहुतांश प्रकरणांना समोरच्याची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लावणे, फ्रस्टेशन ऑफ लव्ह किंवा फसवणुकीची किनार असते.- ॲड. अभयसिंग भोसले, विधिज्ञ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबाद