शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

... तर हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायाला लागेल घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:05 IST

संपूर्ण लॉकडाऊनमुळे शहरातील जवळपास ५०० हॉटेल्स तसेच १३०० रेस्टॉरंटस व बारमध्ये काम करणारे लोक बेरोजगार होतील आणि त्यातून होणाऱ्या ...

संपूर्ण लॉकडाऊनमुळे शहरातील जवळपास ५०० हॉटेल्स तसेच १३०० रेस्टॉरंटस व बारमध्ये काम करणारे लोक बेरोजगार होतील आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसानामुळे पूर्ण यंत्रणा दिवाळखोरीकडे ढकलली जाईल, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

आर्थिक संकटामुळे अनलॉकनंतर २० टक्के हॉटेल- रेस्टॉरंट पूर्णपणे बंद झाली असून, अजूनही जवळपास ३० टक्के हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झालेली नाहीत. तर बाकीची लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा एकदा बंद होण्याची वेळ आली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे, हे खरे असले तरी आधीच डबघाईला आलेल्या या व्यवसायालाच जबाबदार धरणे योग्य नाही, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही संपूर्ण काळजी आणि सुरक्षा घेऊनच व्यवसाय करू, त्यामुळे हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असेही एचआरएडब्ल्यूआयचे अध्यक्ष श्री शेरी भाटिया यांनी राज्य शासनाला निवेदनातून सांगितले आहे.

चौकट :

केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंटलाच केले टार्गेट

जिल्हा प्रशासनाने केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगालाच लक्ष्य केले असून अतिशय कठोर निर्णय घेतला आहे. सगळ्या नियमांचे पालन करूनही हॉटेल आणि रेस्टॉरंट कारवाईच्या विळख्यात आले आहेत. या निर्णयामुळे या व्यवसायाशी संबंधित लोकांवर होणारा परिणाम प्रशासनाने विचारात घ्यावा आणि हा निर्णय मागे घ्यावा, असे विनंती संस्थेचे प्रवक्ते हरप्रीत सिंग यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.