शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

... तर हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायाला लागेल घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:05 IST

संपूर्ण लॉकडाऊनमुळे शहरातील जवळपास ५०० हॉटेल्स तसेच १३०० रेस्टॉरंटस व बारमध्ये काम करणारे लोक बेरोजगार होतील आणि त्यातून होणाऱ्या ...

संपूर्ण लॉकडाऊनमुळे शहरातील जवळपास ५०० हॉटेल्स तसेच १३०० रेस्टॉरंटस व बारमध्ये काम करणारे लोक बेरोजगार होतील आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसानामुळे पूर्ण यंत्रणा दिवाळखोरीकडे ढकलली जाईल, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

आर्थिक संकटामुळे अनलॉकनंतर २० टक्के हॉटेल- रेस्टॉरंट पूर्णपणे बंद झाली असून, अजूनही जवळपास ३० टक्के हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झालेली नाहीत. तर बाकीची लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा एकदा बंद होण्याची वेळ आली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे, हे खरे असले तरी आधीच डबघाईला आलेल्या या व्यवसायालाच जबाबदार धरणे योग्य नाही, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही संपूर्ण काळजी आणि सुरक्षा घेऊनच व्यवसाय करू, त्यामुळे हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असेही एचआरएडब्ल्यूआयचे अध्यक्ष श्री शेरी भाटिया यांनी राज्य शासनाला निवेदनातून सांगितले आहे.

चौकट :

केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंटलाच केले टार्गेट

जिल्हा प्रशासनाने केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगालाच लक्ष्य केले असून अतिशय कठोर निर्णय घेतला आहे. सगळ्या नियमांचे पालन करूनही हॉटेल आणि रेस्टॉरंट कारवाईच्या विळख्यात आले आहेत. या निर्णयामुळे या व्यवसायाशी संबंधित लोकांवर होणारा परिणाम प्रशासनाने विचारात घ्यावा आणि हा निर्णय मागे घ्यावा, असे विनंती संस्थेचे प्रवक्ते हरप्रीत सिंग यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.