शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

आतापर्यंत फक्त ३५.७९ टक्के पाऊस

By admin | Updated: September 1, 2014 01:06 IST

जालना: जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. दोन महिने दडी मारलेल्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा आगमन झाल्याने पावसाच्या नोंदीत वाढ झाली आहे

जालना: जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. दोन महिने दडी मारलेल्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा आगमन झाल्याने पावसाच्या नोंदीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४६. ३८ मि. मी. म्हणजेच ३५.३८ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस असल्याने दुष्काळी स्थिती जैसे थेच आहे.जिल्ह्यात शनिवारी जाफराबाद आणि बदनापूर तालुका वगळता सर्वत्र पाऊस झाला. त्याची एकूण सरासरी १०.२७ मि. मी. ऐवढी आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी कंसातील आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची नोंद आहे. जालना ७.५० (२६६.७९), भोकरदन १.८८(३४९.३५), जाफराबाद ००(२४७.४), बदनापूर ०० (२२२.८), परतूर २८.२० (२३२.२९), अंबड १७.०० (२३२.२९), घनसावंगी १९.८६ (१८४.६८) , मंठा ६.७५ (१५८.७५ )मि. मी. असा एकूण सरासरी २४६.३८ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. त्याची वार्षिक सरासरी फक्त ३५ .७९ टक्के आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात अधिक पाऊस भोकरदन तालुक्यात ३४९. ३५ मि. मी. झाला तर सर्वात कमी पाऊस मंठा तालुक्यात १५८.७५ मि. मी झाला आहे. अद्यापही जिल्ह्यात पावसाची टक्केवारी ५० टक्याच्या आतच आहे. त्यामुळे टंचाई स्थिती कायम आहे. मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाामुळे पावसाची टक्केवारी वाढत आहे. १५ दिवसापूर्वीच केवळ १७ टक्के असलेल्या पावसाची आकडेवारी आता ३५ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. वरुणराजाने उशिरा का होईना पण हजेरी लावल्याने या पावसामुळे खरिपाच्या पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने दडी मारली होती. मध्यंतरी थोडा पाऊस झाल्यानंतर पुन्हा सुमारे दीड महिना पाऊस गायब झाला होता. २० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात फक्त १७ टक्के पाऊस पडलेला होता. त्यानंतर पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याने दहा दिवसांत या टक्केवारीत वाढ झाली. ती आता ३० आॅगस्टपर्यंत ३५ टक्के झाली आहे.