शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

नाग, पाल, विंचू यंदा सात दिवस एकत्र

By admin | Updated: July 28, 2014 00:57 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रा नागपंचमीदिवशी साजरी केली जाणार असून, त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रा नागपंचमीदिवशी साजरी केली जाणार असून, त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साप, पाल, विंचू या उभयचर प्राण्यांचे मंदिर परिसरात शनिवारी सकाळी १० वाजता आगमन झाले. हे प्राणी एकत्रीत सात दिवस राहणार आहेत. यात्रेत खरगा, गण, भाकणूक, पालखी मिरवणूक हे कार्यक्रम होणार आहेत.आषाढ अमावस्येदिवशी एकमेकांचे शत्रू समजले जाणारे साप-पाल-विंचू या प्राण्यांचे आगमनापूर्वी पुजारी कल्याण स्वामी यांना मानकरी हरी डोके या मानकऱ्यांच्या घरी आंघोळ घालून मंदिरात नेण्यात आले. तेथे पुजाऱ्याच्या हाताला विधीवत कंकण (काकनऊ) बांधण्यात आले. अमावस्येपासून यात्रेच्या औपचारिकतेस प्रारंभ होतो. बुधवारी पहाटे ४ वाजता पुजाऱ्याचे केस कापले जातात. हा विधी मंदिरासमोर असणाऱ्या दगडी शिळेवर पार पडतो. त्यास खरगा असे म्हणतात. १ आॅगस्ट रोजी नागपंचमीदिवशी पहाटे नागोबा मूर्तीस अभिषेक घालण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता पुजारी कल्याण स्वामी व पालखी मिरवणूक वाजत गाजत गावातून काढण्यात येणार आहे, त्यास गण असे म्हणतात. सायंकाळी ६ वाजता मंदिराजवळ मिरवणूक आल्यानंतर तिथे महाआरतीने नागोबास ओळखले जाते. मंदिराशेजारी ओट्यावर भाकवणूक कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी माजी जि.प. सदस्य संतोष बोबडे, रामेश्वर तोडकरी, सरपंच प्रभावती मारडकर, उपसरपंच आनंद बोबडे, राजकुमार पाटील आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. तसेच तुळजापूर आगाराच्या वतीने जादा बसेसचीही सोय करण्यात आली आहे.अतिक्रमण हटविलेयात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मुख्य चौकात तसेच रस्त्यालगत झालेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. त्यामुळे यात्रेत या चौकात वाहनांची कोंडी होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायतीने घेतल्याचे उपसरपंच आनंद बोबडे यांनी सांगितले. (वार्ताहर)सावरगावात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागलीशनिवारी मंदिरासमोर आगमन झालेल्या साप-पाल-विंचवाचा मुक्काम यंदा दोन दिवसांनी वाढला आहे. हे एकमेकांचे हाडवैरी असणारे प्राणी सात दिवस एकत्रीत राहणार आहेत. या दुर्मिळ दश्याच्या दर्शनासाठी भाविक सावरगावला येत आहेत. तर यात्रेत सुरक्षितता रहावी, यासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचे सपोनि राहुल देशपांडे यांनी सांगितले. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवस भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.माळा बनविण्याचे काम सुरुलिंबाऱ्याच्या पालापासून गोलाकार माळा बनविण्याचे काम हरी विश्वनाथ डोके यांच्या घरी शनिवारपासून चालू झाले आहे. ते मागील ५० वर्षापासून माळा तयार करण्याचे काम करतात. अख्खे कुटुंब सलग पाच ते सात दिवस निष्काम सेवा करतात. त्यात कसलाही मोबदला घेत नाहीत. या तयार केलेल्या माळा नागपंचमीदिवशी गण मिरवणुकीत भाविक गळ्यात घालतात. ही लिंबाऱ्याची माळ वर्षभर घरात अडकवतात त्यामुळे घरात सापांचा वावर होत नाही, अशी आख्यायिका आहे.