शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

लसीकरणातही जिल्ह्याची घसरगुंडी !

By admin | Updated: September 24, 2014 00:45 IST

बाबूराव चव्हाण, उस्मानाबाद उस्मानाबाद : बाळ जन्मल्यापासून ते एक वर्षाचे होईपर्यंत शासनाने ठरवून दिलेले लसीकरण शंभर टक्के करणे आवश्यक आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात

बाबूराव चव्हाण, उस्मानाबादउस्मानाबाद : बाळ जन्मल्यापासून ते एक वर्षाचे होईपर्यंत शासनाने ठरवून दिलेले लसीकरण शंभर टक्के करणे आवश्यक आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात या लसीकरणाचे प्रमाण चिंताजनक आहे. नुकत्याच एका संस्थेने केलेल्या सर्व्हेदरम्यान जिल्ह्याचे प्रमाण ६६ वरुन ५८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ही बाब आरोग्य विभागाच्या दृष्टीकोनातून धक्कादायक मानली जात आहे. बाळ जन्मल्यापासून ते एक वर्षाचे होईपर्यंत त्याला विविध प्रकारची रोगप्रतिबंधक लस दिली जाते. आरोग्य खात्याच्या वतीने त्याचे नियोजनही करण्यात आलेले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी शासनाच्या वतीने मदर अँड चाईल्ड ट्रॅकिंक सिस्टीम (एमसीटीएस) हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरोदर माता व मुलांना दर्जात्मक आरोग्य सेवा पुरविण्यावर भर दिला जातो. तसेच गरोदर माता, बालक, लसीकरण नोंदणीची माहिती अद्ययावत ठेवून आरोग्य सेवांचा पाठपुरावा करुन सदर प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाते. माता मृत्यू व अर्भक मृत्यू दर कमी करणे हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. सदरील उपक्रमांतर्गत गरोदर मातांची वेळोवेळी तपासणी करुन जरुरीच्या आवश्यक आरोग्य सुविधांचे नियंत्रण केले जाते. तसेच गरोदर माता व बालकांचे संपूर्ण लसीकरणही करण्यात येते. सेवांपासून वंचित राहिलेल्यांचा पाठपुरावा करुन सेवा दिलेल्यांचा मागोवा घेतला जातो. संपूर्ण लसीकरण तसेच आरोग्य संस्थांमध्ये सुरक्षित प्रसूती यांना पाठबळ दिले जाते. दरम्यान, हा उपक्रम कितीही चांगला असला तरी तो जिल्ह्यात अपेक्षित क्षमतेने राबविला जात नसल्याचे समोर आले आहे. एका संस्थेने (थर्ड पार्टी) जिल्ह्यातील लसीकरणाचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेअंती अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एकीकडे शासन ‘संपूर्ण लसीकरण’ यावर भर देत असताना दुसरीकडे याच्या उलट चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण ६६ टक्क्यावरुन ५८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ही बाब प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. हे चित्र असेच कायम राहिले तर माता आणि अर्भक मृत्यूदर कसा कमी होणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होते आहे. बीसीजी लसीकरणाच्या प्रमाणावर नजर टाकली असता, तेही ९८ वरुन ९५ टक्क्यावर आले आहे. पोलिओ लसीकरणही ८६ वरुन ८२ टक्क्यापर्यंत घसरले आहे. गोवरच्या लसीकरणात मात्र काही प्रमाणात वाढ झाली आहे. ते ७७ वरुन ८४ वर पोहचले आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. ल सीकरणा’साठी शासनाने दोन वर्षापूर्वी एमसीटीएस हा उपक्रम सुरु केला आहे. मात्र जिल्ह्यात तोही पूर्ण क्षमतेने राबविला जात नसल्याचेच सर्वेक्षणातून समोर आले आहे. लसीकरणाचे प्रमाण केवळ ५८ टक्के एवढे आहे. म्हणजे आजही ५० टक्के बालकांचे संपूर्ण लसीकरण होत नाही. आरोग्य विभागाकडून होत असलेला हा कानाडोळा भावीपिढीसाठी घातक ठरणार आहे. हे प्रमाणा वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.ए मसीटीएस हे एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये गरोदर माता आणि जन्माला आलेल्या बालकांची नोंद करण्यात येते. त्यानुसार हे सॉफ्टवेअर मेसेजच्या माध्यमातून लसीकरणाची वेळ, तारीख सूचविते. हे दररोज अपडेट होते. असा मेसेज प्राप्त झाल्यानंतरर संबंधित कर्मचाऱ्यांनी घरी जावून माता अथवा बालकाना आवश्यक लस देणे अपेक्षित आहे. या माध्यमातून वर्षभराचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे काहींना चार, काहींना दोन, काहींना एक तर काहींना आठ डोस मिळतात. त्यामुळे शासनाचे ‘संपूर्ण लसीकरण’ हे धोरण साध्य होताना दिसत नाही. एकूणच विचार केला तर आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.