शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
2
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
3
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
4
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
5
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
6
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
7
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
8
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
9
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
10
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
11
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
12
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
13
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
14
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
15
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
16
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
17
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
18
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
19
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
20
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ

लसीकरणातही जिल्ह्याची घसरगुंडी !

By admin | Updated: September 24, 2014 00:45 IST

बाबूराव चव्हाण, उस्मानाबाद उस्मानाबाद : बाळ जन्मल्यापासून ते एक वर्षाचे होईपर्यंत शासनाने ठरवून दिलेले लसीकरण शंभर टक्के करणे आवश्यक आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात

बाबूराव चव्हाण, उस्मानाबादउस्मानाबाद : बाळ जन्मल्यापासून ते एक वर्षाचे होईपर्यंत शासनाने ठरवून दिलेले लसीकरण शंभर टक्के करणे आवश्यक आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात या लसीकरणाचे प्रमाण चिंताजनक आहे. नुकत्याच एका संस्थेने केलेल्या सर्व्हेदरम्यान जिल्ह्याचे प्रमाण ६६ वरुन ५८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ही बाब आरोग्य विभागाच्या दृष्टीकोनातून धक्कादायक मानली जात आहे. बाळ जन्मल्यापासून ते एक वर्षाचे होईपर्यंत त्याला विविध प्रकारची रोगप्रतिबंधक लस दिली जाते. आरोग्य खात्याच्या वतीने त्याचे नियोजनही करण्यात आलेले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी शासनाच्या वतीने मदर अँड चाईल्ड ट्रॅकिंक सिस्टीम (एमसीटीएस) हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरोदर माता व मुलांना दर्जात्मक आरोग्य सेवा पुरविण्यावर भर दिला जातो. तसेच गरोदर माता, बालक, लसीकरण नोंदणीची माहिती अद्ययावत ठेवून आरोग्य सेवांचा पाठपुरावा करुन सदर प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाते. माता मृत्यू व अर्भक मृत्यू दर कमी करणे हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. सदरील उपक्रमांतर्गत गरोदर मातांची वेळोवेळी तपासणी करुन जरुरीच्या आवश्यक आरोग्य सुविधांचे नियंत्रण केले जाते. तसेच गरोदर माता व बालकांचे संपूर्ण लसीकरणही करण्यात येते. सेवांपासून वंचित राहिलेल्यांचा पाठपुरावा करुन सेवा दिलेल्यांचा मागोवा घेतला जातो. संपूर्ण लसीकरण तसेच आरोग्य संस्थांमध्ये सुरक्षित प्रसूती यांना पाठबळ दिले जाते. दरम्यान, हा उपक्रम कितीही चांगला असला तरी तो जिल्ह्यात अपेक्षित क्षमतेने राबविला जात नसल्याचे समोर आले आहे. एका संस्थेने (थर्ड पार्टी) जिल्ह्यातील लसीकरणाचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेअंती अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एकीकडे शासन ‘संपूर्ण लसीकरण’ यावर भर देत असताना दुसरीकडे याच्या उलट चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण ६६ टक्क्यावरुन ५८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ही बाब प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. हे चित्र असेच कायम राहिले तर माता आणि अर्भक मृत्यूदर कसा कमी होणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होते आहे. बीसीजी लसीकरणाच्या प्रमाणावर नजर टाकली असता, तेही ९८ वरुन ९५ टक्क्यावर आले आहे. पोलिओ लसीकरणही ८६ वरुन ८२ टक्क्यापर्यंत घसरले आहे. गोवरच्या लसीकरणात मात्र काही प्रमाणात वाढ झाली आहे. ते ७७ वरुन ८४ वर पोहचले आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. ल सीकरणा’साठी शासनाने दोन वर्षापूर्वी एमसीटीएस हा उपक्रम सुरु केला आहे. मात्र जिल्ह्यात तोही पूर्ण क्षमतेने राबविला जात नसल्याचेच सर्वेक्षणातून समोर आले आहे. लसीकरणाचे प्रमाण केवळ ५८ टक्के एवढे आहे. म्हणजे आजही ५० टक्के बालकांचे संपूर्ण लसीकरण होत नाही. आरोग्य विभागाकडून होत असलेला हा कानाडोळा भावीपिढीसाठी घातक ठरणार आहे. हे प्रमाणा वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.ए मसीटीएस हे एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये गरोदर माता आणि जन्माला आलेल्या बालकांची नोंद करण्यात येते. त्यानुसार हे सॉफ्टवेअर मेसेजच्या माध्यमातून लसीकरणाची वेळ, तारीख सूचविते. हे दररोज अपडेट होते. असा मेसेज प्राप्त झाल्यानंतरर संबंधित कर्मचाऱ्यांनी घरी जावून माता अथवा बालकाना आवश्यक लस देणे अपेक्षित आहे. या माध्यमातून वर्षभराचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे काहींना चार, काहींना दोन, काहींना एक तर काहींना आठ डोस मिळतात. त्यामुळे शासनाचे ‘संपूर्ण लसीकरण’ हे धोरण साध्य होताना दिसत नाही. एकूणच विचार केला तर आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.