शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वर्षभरात दुधाचे सहा नमुने आढळले अप्रमाणित

By admin | Updated: January 3, 2017 23:31 IST

जालना : जिल्ह्यात भेसळीचे प्रमाण प्रचंड असले तरी तपासणी किरकोळ आहे.

जालना : जिल्ह्यात दुधाचे प्रति दिन संकलन दहा हजार लिटर आहे. मात्र यात दूध भेसळीचे प्रमाण प्रचंड असले तरी तपासणी किरकोळ आहे. अन्न व औषधी प्रशासनाचे वर्षभरात सहा नमुने अप्रमाणित आले असून, चौघांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वर्षभरात फक्त ३८ भेसळीचे नुमने घेण्यात आले. राज्यात जवळपास ७० टक्के दूध भेसळयुक्त असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली होती. त्या अनुषंगाने ज्ल्ह्यिातील दूध भेसळीचा आढावा घेतला असता, परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात शासकीय तसेच खाजगी असे दुधाचे संकलन होते. हे संकलन कमी असले तरी यात भेसळीचे प्रमाण जास्त असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात कारवाईचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे दुधाची भेसळ दुग्धजन्य पदार्थांमध्ये येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व औषधी प्रशासनाकडून फॅटच्या प्रमाणानुसार तपासणी करण्यात येते. म्हशीच्या दुधात सहा टक्के फॅटचे प्रमाण असावे तर गायीच्या दुधात साडेतीन टक्के फॅट असण्याची गरज आहे. प्रत्यक्षात वर्षभरात ३८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ६ नमुने अप्रमाणित करण्यात आले आहेत. सात नुमन्याचा अहवाल प्रलंबित आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या नियमानुसार आर्थिक स्वरूपाच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. एका नमुन्याला दहा ते बारा हजारांचा दंड आकारून यापुढे असे काही होणार हे लिहून घेण्यात येते. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्याचाही निकाल लवकरच लागेल, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.