शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मराठवाड्यातील ६५ तालुक्यांत टंचाईची स्थिती

By admin | Updated: August 20, 2014 00:59 IST

बिडकीन : मराठवाड्यातील ६५ तालुक्यांत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली

बिडकीन : मराठवाड्यातील ६५ तालुक्यांत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून निसर्गाने साथ दिली नसली तरी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहील. शेतकऱ्यांनी हादरून जाऊ नये, असा दिलासा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी बिडकीन व आवडे उंचेगाव येथे झालेल्या जाहीर सभेतून दिला.बिडकीन येथील १८.७० कोटी रुपयांच्या बिडकीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वसाहतीचे व बिडकीन पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आर.आर. पाटील यांच्या हस्ते बिडकीन येथे दुपारी १ वाजता करण्यात आले. दुपारी ४ वाजता आवडे उंचेगाव येथील महावितरणच्या ३३ केव्हीए सबस्टेशनचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी आमदार संजय वाघचौरे, कदीर मौलाना, हरिश्चंद्र लघाने पाटील, आप्पासाहेब पाटील, विनोद पाटील, अभिजित देशमुख, अ‍ॅड. बद्रीनारायण भुमरे, रवींद्र शिसोदे, रामगोपाल धूत, कैलास धर्मे, अप्पासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष भाऊसाहेब पिसे, अजय डिघुळे, अनिल घोडके, मनोहर एरंडे, हर्षवर्धन तुपे, विलास शेळके, रंजना कडू पाटील, युसूफ पठाण, मुन्ना मिर्झा, लतीफ कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना आमदार संजय वाघचौरे यांनी बिडकीन येथील शेतकऱ्यांना २३ लाख रुपये एकर भाव मिळवून दिला. बिडकीनच्या पाणीपुरवठ्याचा शब्द दिला होता, तो पाळला. कायमस्वरूपी दुष्काळी भागासाठी २२२ कोटी रुपयांची योजना मार्गी लावली. आज १०० कोटी रुपये या योजनेवर खर्च झालेले आहेत. विविध धर्माच्या व समाजाच्या नागरिकांसाठी ८०० सामाजिक सभागृह बांधले. आमच्या विरोधकांनी २५ वर्षांत काहीच केले नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी विकासकामांचा प्रचार करून विरोधकांचे तोंड बंद करावे, असे आवाहन केले.यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मार्गदर्शन करताना शिवसेना व भाजपाचा आपल्या शैलीत समाचार घेताना दिल्लीतील सरकार हे मोदींचे नसून ते उद्योगपतींचे आहे. देशात महागाई कमी करणार असे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तीन महिन्यांत १५ टक्के महागाईत वाढ केली. उद्योगपतींच्या मालाची किंमत वाढत आहे, तर शेतकऱ्यांच्या मालाची किंमत वाढू नये म्हणून मोदी सरकार काळजी घेत आहे. पेट्रोल, डिझेल, सिमेंट, खते आदींची भाववाढ झाली. मात्र कांद्याची किंमत वाढताच सरकारने कांदा जीवनावश्यक वस्तू करून कांदा निर्यातीस बंदी केली, त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही.