शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

मराठवाड्यातील ६५ तालुक्यांत टंचाईची स्थिती

By admin | Updated: August 20, 2014 00:59 IST

बिडकीन : मराठवाड्यातील ६५ तालुक्यांत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली

बिडकीन : मराठवाड्यातील ६५ तालुक्यांत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून निसर्गाने साथ दिली नसली तरी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहील. शेतकऱ्यांनी हादरून जाऊ नये, असा दिलासा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी बिडकीन व आवडे उंचेगाव येथे झालेल्या जाहीर सभेतून दिला.बिडकीन येथील १८.७० कोटी रुपयांच्या बिडकीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वसाहतीचे व बिडकीन पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आर.आर. पाटील यांच्या हस्ते बिडकीन येथे दुपारी १ वाजता करण्यात आले. दुपारी ४ वाजता आवडे उंचेगाव येथील महावितरणच्या ३३ केव्हीए सबस्टेशनचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी आमदार संजय वाघचौरे, कदीर मौलाना, हरिश्चंद्र लघाने पाटील, आप्पासाहेब पाटील, विनोद पाटील, अभिजित देशमुख, अ‍ॅड. बद्रीनारायण भुमरे, रवींद्र शिसोदे, रामगोपाल धूत, कैलास धर्मे, अप्पासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष भाऊसाहेब पिसे, अजय डिघुळे, अनिल घोडके, मनोहर एरंडे, हर्षवर्धन तुपे, विलास शेळके, रंजना कडू पाटील, युसूफ पठाण, मुन्ना मिर्झा, लतीफ कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना आमदार संजय वाघचौरे यांनी बिडकीन येथील शेतकऱ्यांना २३ लाख रुपये एकर भाव मिळवून दिला. बिडकीनच्या पाणीपुरवठ्याचा शब्द दिला होता, तो पाळला. कायमस्वरूपी दुष्काळी भागासाठी २२२ कोटी रुपयांची योजना मार्गी लावली. आज १०० कोटी रुपये या योजनेवर खर्च झालेले आहेत. विविध धर्माच्या व समाजाच्या नागरिकांसाठी ८०० सामाजिक सभागृह बांधले. आमच्या विरोधकांनी २५ वर्षांत काहीच केले नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी विकासकामांचा प्रचार करून विरोधकांचे तोंड बंद करावे, असे आवाहन केले.यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मार्गदर्शन करताना शिवसेना व भाजपाचा आपल्या शैलीत समाचार घेताना दिल्लीतील सरकार हे मोदींचे नसून ते उद्योगपतींचे आहे. देशात महागाई कमी करणार असे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तीन महिन्यांत १५ टक्के महागाईत वाढ केली. उद्योगपतींच्या मालाची किंमत वाढत आहे, तर शेतकऱ्यांच्या मालाची किंमत वाढू नये म्हणून मोदी सरकार काळजी घेत आहे. पेट्रोल, डिझेल, सिमेंट, खते आदींची भाववाढ झाली. मात्र कांद्याची किंमत वाढताच सरकारने कांदा जीवनावश्यक वस्तू करून कांदा निर्यातीस बंदी केली, त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही.