शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

टंचाईच्या उपाययोजना रखडल्या

By admin | Updated: December 14, 2015 23:56 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाही अद्याप प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या नाहीत़ त्यामुळे नागरिकांची होरपळ सुरू आहे़

लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाही अद्याप प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या नाहीत़ त्यामुळे नागरिकांची होरपळ सुरू आहे़ याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नसल्याने पाण्याचा अक्षरश: खेळ झाला आहे़ सर्वसामान्य नागरिकांना सांडपाणीही विकत घेण्याची वेळ आली आहे़ हेच चित्र ग्रामीण भागातही दिसून येत आहे़ दुष्काळात पाणी विकत घेऊन प्यायची वेळ आली असल्याने शासनाकडून कधी उपाययोजना होणार याकडे शहरवासियांबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे़ दरम्यान, पाण्यासाठी नागपुरात विधान भवनासमोर महापौरांचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे.लातूर शहराला गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईचे चटके सुरू आहेत़ यावर्षी तीव्रता अधिक असून फेब्रुवारीनंतर शहरावासियांचे हाल होणार आहेत़ मांजरा प्रकल्पात असलेल्या पाण्यावर आणखी दोन ते अडीच महिने लातूरकरांची तहान भागणार आहे, त्यानंतर मात्र काय उपाययोजना असतील यावर अद्यापही प्रशासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही़ उजनीच्या धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात यावे़ उजनी ते लातूर शहरापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात यावी यासाठी लागणारा ६८८ कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ त्याचबरोबर शासनाने २०० फुटांपेक्षा अधिक खोल विंधन विहीर घेण्यास बंदी घातली असल्याने विंधन विहिरींचाही उपयोग होत नाही़ त्यामुळे विंधन विहिरीचा नियम शिथिल करून ४५० फुट खोलीपर्यंत विंधन विहिर घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे़ नागपूरच्या विधान भवनसमोर महापौरांसह पदाधिकाऱ्यांनीही धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला आहे़ यात उपमहापौर कैलास कांबळे, स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख, गटनेते नरेंद्र अग्रवाल, प्रभाग समितीच्या सभापती सपना किसवे, श्रीदेवी औसे, अ‍ॅड़ समद पटेल, प्रभाग समितीचे माजी सभापती प्रा़ राजकुमार जाधव, रूपाली साळुंके, केशरबाई महापुरे, उषा कांबळे आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)