शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

उन्हाळ्यात जाणवणार दीड लाख मेट्रिक टन चाऱ्याचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 21:25 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार १८० लहान-मोठी जनावरे आहेत. ८ लाख १० हजार ८४ मे.टन चाºयाची आवश्यकता असून, त्यापेक्षा दीड लाख मे.टन चारा कमी आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी व चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आतापासूनच पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

जिल्ह्यात ७ लाख जनावरे : पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकटऔरंगाबाद : जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार १८० लहान-मोठी जनावरे आहेत. ८ लाख १० हजार ८४ मे.टन चाºयाची आवश्यकता असून, त्यापेक्षा दीड लाख मे.टन चारा कमी आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी व चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आतापासूनच पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

जिल्ह्यात ६५ महसूल मंडळे असून, त्यापैकी २८ मंडळांत अपेक्षित सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला. ५१ ते ७५ टक्क्यांमध्ये २९, तर ७६ ते १०० टक्क्यांमध्ये ८ महसूल मंडळांचा समावेश आहे. ऐन वेळेवर पाऊस न पडल्याने खरीप पिकांचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. कमी पाण्यामुळे रबी पेरणीचे धाडस करण्यास शेतकरी धजावत नसल्याचे दिसत आहे. यामुळे दिवाळी आधीपर्यंत जिल्ह्यात अवघे ४ टक्के पेरणी झाली होती. जिथे माणसांनाच पिण्यासाठी कमी पाणी आहे तिथे जनावरांचे काय, त्यात कडबा कमी असल्याने उन्हाळ्यात जनावरांना कसे सांभाळायचे, असा यक्ष प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात लहान-मोठी ६७६१८० जनावरे आहेत. ही आकडेवारी २०१२ मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार आहे. त्यांना दररोज ३५५३ मे.टन चारा लागतो, तर महिनाभरात १०६५६२ मे.टन चारा लागतो. यानुसार ३१ मे २०१९ पर्यंत ८१००८४ मे.टन चाºयाची आवश्यकता आहे; पण प्रत्यक्षात ६६०६२५ मे.टन चारा उपलब्ध आहे. म्हणजे उन्हाळ्यात १ लाख ४९ हजार ४५९ मे.टन चाºयाची टंचाई जाणविणार आहे.

याशिवाय पाण्याचा प्रश्नही बिकट आहे. अनेक गावांत सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात पशुखाद्याचे भाव वाढू लागल्याने आता जनावरांना कसे सांभाळावे, असा प्रश्न पशुपालकांना पडू लागला आहे. परिणामी, अनेकांनी पशुधन विक्रीसाठी काढले आहे. मागील दुष्काळात चारा छावण्यांमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. अनेक छावण्यांची चौकशी करण्यात आली. हा अनुभव लक्षात घेता यंदा चारा छावण्यांविषयी राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. नियमही आणखी कठोर करण्यात आले आहेत. यामुळे चारा छावण्या किती उघडतील व पशुधन वाचविण्यासाठी चारा कुठून उपलब्ध केला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कडबा महागलादुष्काळामुळे भविष्यातील चाराटंचाई लक्षात घेता आता कडबा महाग होऊ लागला आहे. कडब्याच्या भावात २०० ते ३०० रुपयांनी भाववाढ होऊन ४००० ते ४५०० रुपये प्रति शेकडा विकत आहे, तर ऊसकुट्टीचे भाव १०० रुपयांनी वाढून २०० ते २५० रुपये प्रतिगोणी विकत आहे. सरकी ढेप १९०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल विकली जात आहे. मात्र, पुढील महिन्यात नवीन सरकी उपलब्ध झाल्यावर सरकी ढेपचे भाव थोडे कमी होतील. मात्र, कडबा व ऊसकुट्टीचे भाव वाढतील, असे विक्रेत्यांनी सांगितले. यामुळे म्हशी, गाय, बैल सांभाळणाºयांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद