शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

धर्माच्या नावावर देशभर सुरू आहे ‘दुकानदारी’

By admin | Updated: December 13, 2014 00:29 IST

औरंगाबाद : धर्माच्या नावावर देशात काही लोकांनी ‘दुकानदारी’ सुरू केली आहे.

औरंगाबाद : धर्माच्या नावावर देशात काही लोकांनी ‘दुकानदारी’ सुरू केली आहे. त्यांनी धर्माला ‘व्यापार’ बनविले आहे, असा संताप व्यक्त करीत साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, धर्म म्हणजे आत्मशांती आहे, लोक धर्म बदलू शकतात; पण ते आपले पूर्वज, कुळ बदलू शकत नाहीत. विश्व हिंदू परिषद-बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू संमेलनात त्यांनी आपले विचार मांडले. व्यासपीठावर स्वामी शांतीगिरीजी महाराज, भास्करगिरी महाराज, भन्ते चंद्रबोधीजी, सद्गुरु डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य, धावणी मोहल्ल्यातील गुरुद्वाराचे भाई खडकसिंग महाराज, शनिसाधिका विभाश्रीजी, संतोषमुनी कपाटे, भगवान आनंदगडकर महाराज, आनंदशास्त्रीगिरीजी महाराज, काशीगिरीजी महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती. साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, जातीवाद-संप्रदायवादात हिंदू धर्माची ताकद वाटली गेली आहे. त्यामुळे धर्माची अशी दुर्दशा झाली आहे. सर्व जातिभेदाच्या भिंती तोडून एकजूट झाल्यास हिंदू धर्म प्रबल बनेल. भ्रूणहत्या व गोहत्या ही दोन मोठी पापे देशात घडत आहेत. भगवद्गीता ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ मानण्यास विरोध करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. प्रत्येकाच्या घरात गीता व गोमाता असलीच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. रामजींच्या कामात विराम नाही, असे म्हणत साध्वींनी घोषणा केली की, ‘अयोध्येत राम मंदिर उभारणार, तेही धुमधडाक्यात.’ यावेळी उपस्थितांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष केला. शांतीगिरी महाराजांच्या वतीने विष्णूगिरी महाराज यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यात अंजनीगड येथे हनुमानाचा जन्म झाला; मात्र हे ठिकाण दुर्लक्षित आहे. त्याच्या विकासासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मानवाचा धर्म मानवता आहे. मन:शुद्धीसाठी अंत:करणातील मत्सर, मोह, द्वेषाचे दहन करा, असे आवाहन भन्ते चंद्रबोधी यांनी केले. हिंदू धर्माची संस्कृती दया आहे. तुम्ही सर्व देव बना, दैवी गुणांचे संपादन करा, असे विचार डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य यांनी मांडले. प्रारंभी विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विनायकराव देशपांडे यांनी दिली. या संमेलनासाठी जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक कडा आॅफिसच्या मैदानावर आले होते.