शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

धर्माच्या नावावर देशभर सुरू आहे ‘दुकानदारी’

By admin | Updated: December 13, 2014 00:29 IST

औरंगाबाद : धर्माच्या नावावर देशात काही लोकांनी ‘दुकानदारी’ सुरू केली आहे.

औरंगाबाद : धर्माच्या नावावर देशात काही लोकांनी ‘दुकानदारी’ सुरू केली आहे. त्यांनी धर्माला ‘व्यापार’ बनविले आहे, असा संताप व्यक्त करीत साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, धर्म म्हणजे आत्मशांती आहे, लोक धर्म बदलू शकतात; पण ते आपले पूर्वज, कुळ बदलू शकत नाहीत. विश्व हिंदू परिषद-बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू संमेलनात त्यांनी आपले विचार मांडले. व्यासपीठावर स्वामी शांतीगिरीजी महाराज, भास्करगिरी महाराज, भन्ते चंद्रबोधीजी, सद्गुरु डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य, धावणी मोहल्ल्यातील गुरुद्वाराचे भाई खडकसिंग महाराज, शनिसाधिका विभाश्रीजी, संतोषमुनी कपाटे, भगवान आनंदगडकर महाराज, आनंदशास्त्रीगिरीजी महाराज, काशीगिरीजी महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती. साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, जातीवाद-संप्रदायवादात हिंदू धर्माची ताकद वाटली गेली आहे. त्यामुळे धर्माची अशी दुर्दशा झाली आहे. सर्व जातिभेदाच्या भिंती तोडून एकजूट झाल्यास हिंदू धर्म प्रबल बनेल. भ्रूणहत्या व गोहत्या ही दोन मोठी पापे देशात घडत आहेत. भगवद्गीता ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ मानण्यास विरोध करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. प्रत्येकाच्या घरात गीता व गोमाता असलीच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. रामजींच्या कामात विराम नाही, असे म्हणत साध्वींनी घोषणा केली की, ‘अयोध्येत राम मंदिर उभारणार, तेही धुमधडाक्यात.’ यावेळी उपस्थितांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष केला. शांतीगिरी महाराजांच्या वतीने विष्णूगिरी महाराज यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यात अंजनीगड येथे हनुमानाचा जन्म झाला; मात्र हे ठिकाण दुर्लक्षित आहे. त्याच्या विकासासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मानवाचा धर्म मानवता आहे. मन:शुद्धीसाठी अंत:करणातील मत्सर, मोह, द्वेषाचे दहन करा, असे आवाहन भन्ते चंद्रबोधी यांनी केले. हिंदू धर्माची संस्कृती दया आहे. तुम्ही सर्व देव बना, दैवी गुणांचे संपादन करा, असे विचार डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य यांनी मांडले. प्रारंभी विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विनायकराव देशपांडे यांनी दिली. या संमेलनासाठी जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक कडा आॅफिसच्या मैदानावर आले होते.