शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

शिवसैनिक म्हणतात, ‘स्वाभिमान गहाण ठेवू नये’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:05 IST

आ. सरनाईक यांचा लेटरबॉम्ब : दोन्ही पक्षांतील फ्रंटवर्कर अस्वस्थ आणि अशांत औरंगाबाद : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले शिवसेनेचे ...

आ. सरनाईक यांचा लेटरबॉम्ब : दोन्ही पक्षांतील फ्रंटवर्कर अस्वस्थ आणि अशांत

औरंगाबाद : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर पत्र देऊन त्रास टाळायचा असेल तर भाजपशी जुळवून घ्या, अशी आग्रहवजा विनंती केल्यामुळे शिवेसना आणि भाजपाच्या फ्रंटवर्कर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता स्वाभिमान गहाण ठेवू नये, अशी शिवसैनिकांची भावना आहे, तर युती नैसर्गिक आहे, आमचे नेतृत्व सेनेने स्वीकारावे, असा सूर भाजपा आळवित आहे.

निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मागील २० महिन्यांपासून संघर्ष आणि खुन्नस निर्माण झाली असून आता अचानक जुळवण्याची भाषा सुरू झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया अशा

पक्षनेतृत्वाला शिकवणारे आपण कोण?

माजी नगरसेवक राजू वैद्य म्हणाले, पक्ष नेतृत्वाला शिकवणारे आपण कोण आहोत, याचा विचार करून आ. सरनाईक यांनी जाहीररीत्या पत्र देण्याऐवजी वैयक्तिक भेटून बाजू मांडणे गरजेचे होते. शिवसेनेत शिस्त आहे, मातोश्रीचा आदेश अंतिम असतो.

आता जुळवून घेण्यात अर्थ नाही

शिवसैनिक बाळासाहेब गायकवाड म्हणाले, आ. सरनाईक यांच्या प्रकरणात पक्षप्रमुखच निर्णय घेतील. परंतु भाजपाने आजवर दिलेल्या त्रासामुळे पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेण्यात काही अर्थ नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे.

स्वाभिमान गहाण ठेवून कसे चालेल?

उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे म्हणाले, भाजपासोबत गेल्यावर पुन्हा फरपट होईल. शिवसैनिकांनी कुणाकुणाशी आणि किती काळ संघर्ष करायचा. शिवसेना स्वाभिमानी पक्ष असून तो गहाण ठेवून कसे चालेल.

शरणागती पत्करणे योग्य नाही

आता शरणागती पत्करणे योग्य नाही. स्वाभिमानापोटी भाजपासोबतची युती तुटली. आ. सरनाईक यांचे खासगी मत त्यांनी व्यक्त केले. त्यावर पक्ष काय तो निर्णय घेईल, असे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी म्हणाले.

---------------------------------------------------------

हिंदुत्वाचा विचार करून जुळवून घ्यावे

भाजपाचे मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत थेटे म्हणाले, हिंदुत्वाचा विचार करून एकत्र यावे. जसे आ. सरनाईक यांना समजले, ते सर्व शिवसेनेच्या लक्षात आले पाहिजे.

झाले गेले विसरून जावे

हेमंत खेडकर म्हणाले, झाले गेले विसरून जावे. हिंदू मतदारांसाठी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे. सरनाईक यांच्याप्रमाणे सर्वांनीच विचार केला पाहिजे. ‘सुबह का भूला शाम को घर आये तो उसे भुला नहीं कहते.’

जुळवून घेण्यात काय अडचण

माजी नगरसेवक पंकज भारसाखळे म्हणाले, दोन्ही पक्षांना जुळवून घेण्यात काहीच अडचण नाही. ही नैसर्गिक युती असून फडणवीस यांचे नेतृत्व शिवसेनेने स्वीकारले पाहिजे. निवडणूक लढविणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी युती गरजेची आहे.

ही नैसर्गिक युती आहे

भाजपाचे संजय खंबायते म्हणाले, ही नैसर्गिक युती आहे. युतीबाबत भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. आ. सरनाईक यांची भावना सर्वांची असू शकते.