शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

विद्यापीठात दबावाचे राजकारण शिगेला

By admin | Updated: January 20, 2015 01:29 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंवर दबाव आणून पाहिजे तसा निर्णय पदरात पाडून घ्यायचा,

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंवर दबाव आणून पाहिजे तसा निर्णय पदरात पाडून घ्यायचा, ही अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. चार दिवसांपूर्वीच एका संघटनेने परीक्षा नियंत्रक आणि कुलसचिवपदावरून कॅप्टन सुरेश गायकवाड यांना हटविण्यास कुलगुरूंना भाग पाडले. आज प्राध्यापकांच्या संघटनेने कुलसचिवपदावर नेमलेल्या डॉ. सिरसाट यांना हटविण्यासाठी कुलगुरूंना घेराव घातला. ‘बामुक्टा’ व ‘मुप्टा’ शिक्षक संघटनेच्या २५-३० पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी कुलगुरूंच्या दालनात जाऊन घेराव घातला. तेव्हा कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात आपण सविस्तर विचारविनिमय करू, असे सांगितले. त्यानुसार त्या सभागृहात ‘बामुक्टा’चे सचिव डॉ. सुहास मोराळे, जिल्हाध्यक्ष डॉ. विलास खंदारे, जालन्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप पाटील, बीडचे जिल्हाध्यक्ष डॉ. एम.बी. धोंडगे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. गोपाल बच्छिरे, ‘मुप्टा’चे सचिव प्रा. सुनील मगरे, डॉ. संभाजी वाघमारे, राजेंद्र जाधव आदींसह अन्य प्राध्यापकांच्या उपस्थितीत कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर कुलगुरू हे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना ऐकून घेत असतानाच बाहेर नगरसेवक अमित भुईगळ, ‘स्वाभिमानी मुप्टा’चे डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर साळवे, प्रा. ईश्वर मोरे व अन्य कार्यकर्ते कुलगुरूंच्या दालनासमोर येऊन धडकले. सभागृहामध्ये ‘बामुक्टा’ व ‘मुप्टा’चे पदाधिकारी तर, बाहेर ‘स्वाभिमानी मुप्टा’चे पदाधिकारी, अशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. रात्री ९ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंचा जमाव विद्यापीठात बसून होता. दरम्यान, रात्री प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. अडचणींचा सामना करण्याची माझी भूमिका आहे. मी घाबरणारा नाही; पण लोक समजून घेत नाहीत. विद्यापीठातील संघटनांचे वाढलेले वातावरण बंद झाले पाहिजे. संघटनांच्या बाबतीत आता व्यवस्थापन परिषदेत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. तरीही मी आशावादी आहे. सुधारणा होईल, अशी मला अपेक्षा आहे.