शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
3
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
4
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
5
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
6
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
7
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
8
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
9
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
10
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
11
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
12
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
13
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
14
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
15
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
16
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
17
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
18
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
19
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
20
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

सणांच्या तोंडावर शिमगा़़़

By admin | Updated: September 24, 2014 00:45 IST

उदगीर : सणासुदीच्या काळात गावाकडे परतणाऱ्या प्रवाश्यांची सोय व्हावी, यासाठी रेल्वे बोर्डाकडून देशभरात २०० विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत़

उदगीर : सणासुदीच्या काळात गावाकडे परतणाऱ्या प्रवाश्यांची सोय व्हावी, यासाठी रेल्वे बोर्डाकडून देशभरात २०० विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत़ त्यापैकी काही महाराष्ट्राच्या वाट्यालाही आल्या़ परंतु, नेहमीप्रमाणे याहीवेळी रेल्वेकडून मराठवाड्याच्या पदरी मात्र पुन्हा उपेक्षा पडली़ आजघडीला एकही विशेष गाडी मराठवाड्यात न सोडता रेल्वे बोर्डाने प्रांतद्वेषाची भावना निर्माण केल्याचा आरोप उदगीर रेल्वे संघर्ष समितीने केला आहे़दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गरज लक्षात घेवून दरवर्षीच शेकडो विशेष गाडया रेल्वे बोर्डाकडून सोडण्यात येतात़ यंदाही तब्बल २०० विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा बोर्डाने जाहीर केली आहे़ परंतु, यापैकी एकही गाडी मराठवाड्यात सोडली नाही़ मराठवाड्यातील रेल्वेचा भाग दक्षिण मध्य रेल्वे व मध्य रेल्वेशी जोडला गेला आहे़ नांदेड विभाग व सिकंदराबाद विभागातील विकाराबाद-परळी मार्गावर एकही विशेष गाडी घोषित झाली नाही़ विशेषत: सीमावर्ती भागातील हजारो नागरिक व्यवसायाच्या निमित्ताने पुण्या-मुंबईत स्थायिक आहेत़ प्रतिवर्षीच या सणात ते गावाकडे परतत असतात़ दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता नियमित रेल्वेगाड्यांमध्ये अगदी पाय ठेवायलाही जागा शिल्लक नसते़ बऱ्याचदा जागेवरुन प्रवाशांत हाणामारीच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत़ लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांसोबतच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बीदर जिल्ह्यातील नागरिकांची रेल्वेला या काळात मोठी गर्दी असते़ तरीही रेल्वे बोर्डाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोपही रेल्वे संघर्ष समितीने केला आहे़उदगीर रेल्चे संघर्ष समितीने विशेष गाडी न मिळाल्याच्या विरोधात बोर्डाकडे तक्रार केली आहे़ जाणीवपूर्वक होणाऱ्या या अन्यायामुळे क्षमता व पात्रता असणाऱ्या मराठवाडयातील रेल्वे रुळावर बोर्डाची सुविधेची गाडी धावत नाही, ही खंत अद्याप कायम आहे़ निवडणुकांच्या हंगामात लोकप्रतिनिधी व्यस्त आहेत़ या व्यस्ततेतून या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधी वेळ देत नसल्याचा आरोपही रेल्वे संघर्ष समितीने केला आहे़ या अन्यायाविरुद्ध लढा देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली़सध्या उदगीर शहरातून दररोज पुण्या-मुंबईला जवळपास ३० वाहने धावतात़ त्यात एसटीची ६ तर खाजगी २४ वाहने आहेत़ मुंबईसाठी उदगीरमधून एकमेव देगलूर-मुंबई एसटी सुरु आहे़ पुण्यासाठी ५ एसटी धावतात़ याशिवाय, पुण्याकडे धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सची संख्या १६ तर मुंबईला ८ खाजगी ट्रॅव्हल्स धावतात़ या वाहनांच्या माध्यमातून दररोज दीड हजारांवर प्रवासी ये-जा करीत आहेत़ तरीही ही वाहने प्रवाश्यांसाठी तुटपुंजी ठरत आहेत़४ऐन मोसमात खाजगी वाहनांकडून अगदी ८०० ते १ हजार रुपयांपर्यंत तिकिट आकारले जाते़ त्यामुळे सध्या ट्रॅव्हल्स चालकांकडून अ‍ॅडव्हान्स बुकिंग नाकारले जात आहे़ प्रवाशांचा इतका ओघ या भागात असतानाही रेल्वे बोर्डाने एकही विशेष गाडी न सोडून अन्याय केल्याची भावना आहे़