शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नाही, दुपारी ३ पर्यंत जागा रिकामी करा: मुंबई हायकोर्ट
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
6
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
7
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
8
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
9
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
10
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
11
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
12
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
13
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
14
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
15
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
16
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
17
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
18
शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्य, राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
19
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
20
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?

जिल्हा परिषदेच्या सातच शाळांना ‘अ’ श्रेणी

By admin | Updated: August 29, 2014 01:29 IST

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १ हजार ९२ शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात आले होते.

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १ हजार ९२ शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात आले होते. हा अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्हाभरातील केवळ सातच शाळांना ‘अ’श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. ही बाब गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून चिंतेत टाकणारी आहे. घसरलेली गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत पालकातून व्यक्त होत आहे.चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्याला दोन अंकी बेरीज येत नाही, अशी माहिती खुद्द शिक्षण सभापती संजय पाटील दुधगावकर यांनी जि.प. च्या मागील सर्वसाधारण सभेत दिली होती. स्वयंमूल्यमापनातूनही असेच चिंताजनक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील १ हजार ९२ शाळांच्या स्वयंमूल्यमापनाचा अहवाल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार ७ शाळांनाच ‘अ’ श्रेणीमध्ये स्थान मिळविता आले आहे. तुळजापूर, उस्मानाबाद आणि लोहारा या तालुक्यांना तर भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे संबंधित तालुक्यातील गुरुजी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकारी यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ येवून ठेपली आहे. दिवसेंदिवस इंग्रजी शाळांचे आव्हान अधिक व्यापक होत चालले आहे. वर्षागणिक इंग्रजी शाळांच्या संख्येमध्ये झपाट्याने भर पडत आहे. असे असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता खालावत चालली आहे. ही बाब लोकप्रतिनिधीपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आत्मचिंतन करायला लावणारी आहे. उमरगा तालुक्यातील १५१ पैकी २, परंडा तालुक्यातील १३९ पैकी २, भूम तालुक्यातील १२१ पैकी १, वाशी तालुक्यातील ७४ पैकी १ तर कळंब तालुक्यातील १४१ पैकी एकाच शाळेला ‘अ’ श्रेणी मिळू शकली. या उपरोक्त सातही शाळांना ९० ते १०० टक्के दरम्यान गुण प्राप्त झाले आहेत. ‘ब’ श्रेणीत स्थान मिळालेल्या शाळांची संख्याही काही समाधानकारक नाही. गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात असतानाही गुणवत्तेचा आलेख मात्र वरती जाण्याऐवजी घसरत असताना दिसत आहे. ‘ब’ श्रेणीमध्येही केवळ १२४ शाळा समाविष्ट झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा या उमरगा तालुक्यातील आहेत. त्यानंतर तुळजापूर आणि कळंब तालुक्यातील प्रत्येकी १४, उस्मानाबाद २४, लोहारा ८, वाशी ३, भूम १३ आणि परंडा तालुक्यातील २३ शाळांचा समावेश आहे. ‘क’ श्रेणीमध्ये ९३४ शाळा समाविष्ट आहेत. या शाळांना ६० ते ७९ टक्के दरम्यान गुण मिळाले आहेत. तर २७ शाळांना ‘ड’ श्रेणी मिळाली. ज्यांना ४० ते ५९ टक्के दरम्यान गुण मिळाले आहेत. हे चित्र बदलण्यासाठी जि.प. कडून जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे पालकांतून बोलले जात आहे. (प्रतिनिधी)