शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

जिल्हा परिषदेच्या सातच शाळांना ‘अ’ श्रेणी

By admin | Updated: August 29, 2014 01:29 IST

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १ हजार ९२ शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात आले होते.

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १ हजार ९२ शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात आले होते. हा अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्हाभरातील केवळ सातच शाळांना ‘अ’श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. ही बाब गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून चिंतेत टाकणारी आहे. घसरलेली गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत पालकातून व्यक्त होत आहे.चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्याला दोन अंकी बेरीज येत नाही, अशी माहिती खुद्द शिक्षण सभापती संजय पाटील दुधगावकर यांनी जि.प. च्या मागील सर्वसाधारण सभेत दिली होती. स्वयंमूल्यमापनातूनही असेच चिंताजनक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील १ हजार ९२ शाळांच्या स्वयंमूल्यमापनाचा अहवाल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार ७ शाळांनाच ‘अ’ श्रेणीमध्ये स्थान मिळविता आले आहे. तुळजापूर, उस्मानाबाद आणि लोहारा या तालुक्यांना तर भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे संबंधित तालुक्यातील गुरुजी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकारी यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ येवून ठेपली आहे. दिवसेंदिवस इंग्रजी शाळांचे आव्हान अधिक व्यापक होत चालले आहे. वर्षागणिक इंग्रजी शाळांच्या संख्येमध्ये झपाट्याने भर पडत आहे. असे असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता खालावत चालली आहे. ही बाब लोकप्रतिनिधीपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आत्मचिंतन करायला लावणारी आहे. उमरगा तालुक्यातील १५१ पैकी २, परंडा तालुक्यातील १३९ पैकी २, भूम तालुक्यातील १२१ पैकी १, वाशी तालुक्यातील ७४ पैकी १ तर कळंब तालुक्यातील १४१ पैकी एकाच शाळेला ‘अ’ श्रेणी मिळू शकली. या उपरोक्त सातही शाळांना ९० ते १०० टक्के दरम्यान गुण प्राप्त झाले आहेत. ‘ब’ श्रेणीत स्थान मिळालेल्या शाळांची संख्याही काही समाधानकारक नाही. गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात असतानाही गुणवत्तेचा आलेख मात्र वरती जाण्याऐवजी घसरत असताना दिसत आहे. ‘ब’ श्रेणीमध्येही केवळ १२४ शाळा समाविष्ट झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा या उमरगा तालुक्यातील आहेत. त्यानंतर तुळजापूर आणि कळंब तालुक्यातील प्रत्येकी १४, उस्मानाबाद २४, लोहारा ८, वाशी ३, भूम १३ आणि परंडा तालुक्यातील २३ शाळांचा समावेश आहे. ‘क’ श्रेणीमध्ये ९३४ शाळा समाविष्ट आहेत. या शाळांना ६० ते ७९ टक्के दरम्यान गुण मिळाले आहेत. तर २७ शाळांना ‘ड’ श्रेणी मिळाली. ज्यांना ४० ते ५९ टक्के दरम्यान गुण मिळाले आहेत. हे चित्र बदलण्यासाठी जि.प. कडून जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे पालकांतून बोलले जात आहे. (प्रतिनिधी)