शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या सातच शाळांना ‘अ’ श्रेणी

By admin | Updated: August 29, 2014 01:29 IST

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १ हजार ९२ शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात आले होते.

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १ हजार ९२ शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात आले होते. हा अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्हाभरातील केवळ सातच शाळांना ‘अ’श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. ही बाब गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून चिंतेत टाकणारी आहे. घसरलेली गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत पालकातून व्यक्त होत आहे.चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्याला दोन अंकी बेरीज येत नाही, अशी माहिती खुद्द शिक्षण सभापती संजय पाटील दुधगावकर यांनी जि.प. च्या मागील सर्वसाधारण सभेत दिली होती. स्वयंमूल्यमापनातूनही असेच चिंताजनक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील १ हजार ९२ शाळांच्या स्वयंमूल्यमापनाचा अहवाल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार ७ शाळांनाच ‘अ’ श्रेणीमध्ये स्थान मिळविता आले आहे. तुळजापूर, उस्मानाबाद आणि लोहारा या तालुक्यांना तर भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे संबंधित तालुक्यातील गुरुजी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकारी यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ येवून ठेपली आहे. दिवसेंदिवस इंग्रजी शाळांचे आव्हान अधिक व्यापक होत चालले आहे. वर्षागणिक इंग्रजी शाळांच्या संख्येमध्ये झपाट्याने भर पडत आहे. असे असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता खालावत चालली आहे. ही बाब लोकप्रतिनिधीपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आत्मचिंतन करायला लावणारी आहे. उमरगा तालुक्यातील १५१ पैकी २, परंडा तालुक्यातील १३९ पैकी २, भूम तालुक्यातील १२१ पैकी १, वाशी तालुक्यातील ७४ पैकी १ तर कळंब तालुक्यातील १४१ पैकी एकाच शाळेला ‘अ’ श्रेणी मिळू शकली. या उपरोक्त सातही शाळांना ९० ते १०० टक्के दरम्यान गुण प्राप्त झाले आहेत. ‘ब’ श्रेणीत स्थान मिळालेल्या शाळांची संख्याही काही समाधानकारक नाही. गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात असतानाही गुणवत्तेचा आलेख मात्र वरती जाण्याऐवजी घसरत असताना दिसत आहे. ‘ब’ श्रेणीमध्येही केवळ १२४ शाळा समाविष्ट झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा या उमरगा तालुक्यातील आहेत. त्यानंतर तुळजापूर आणि कळंब तालुक्यातील प्रत्येकी १४, उस्मानाबाद २४, लोहारा ८, वाशी ३, भूम १३ आणि परंडा तालुक्यातील २३ शाळांचा समावेश आहे. ‘क’ श्रेणीमध्ये ९३४ शाळा समाविष्ट आहेत. या शाळांना ६० ते ७९ टक्के दरम्यान गुण मिळाले आहेत. तर २७ शाळांना ‘ड’ श्रेणी मिळाली. ज्यांना ४० ते ५९ टक्के दरम्यान गुण मिळाले आहेत. हे चित्र बदलण्यासाठी जि.प. कडून जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे पालकांतून बोलले जात आहे. (प्रतिनिधी)