शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
6
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
7
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
8
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
9
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
10
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
11
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
12
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
13
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
14
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
15
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
16
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
17
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
18
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
19
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
20
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

सेतू कार्यालय बंद, तलाठीही गैरहजर

By admin | Updated: June 12, 2014 01:34 IST

औरंगाबाद : सातारा परिसरातील तलाठी कार्यालयास टाळे असल्याने अधिकारी भेटत नसल्यामुळे नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत.

औरंगाबाद : सातारा परिसरातील तलाठी कार्यालयास टाळे असल्याने अधिकारी भेटत नसल्यामुळे नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. संगणकीय सातबारे सेतूमधून घ्यावेत, अशा सूचना दिल्या असल्या तरी परिसरातील सेतू सुविधा महा ई-सेवा केंद्र बंद असून नागरिकांची मात्र धावपळ होत आहे. सातारा परिसरात एन-४७ बीच्या सर्व्हेपासून नागरिक आपल्या मालमत्तेविषयी सतर्क झाले असून, साडेदहा हजार मालमत्तांची रीतसर नोंदणी तलाठी सज्जाच्या अधिकाराखाली ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत व महसूल विभागाला मोठा महसूलही मिळाला होता. सध्याच्या स्थितीत मात्र कार्यालयाचा महसूल बुडत असल्याची तक्रार सातारा परिसरातील असंख्य नागरिकांतून होत आहे. कारण तलाठी कार्यालयात अधिकारी मिळत नसल्याने महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू होत असून, शालेय कामासाठी व बँक तसेच प्रॉपर्टीच्या कामासाठी कागदपत्रांसाठी नागरिक व पालकांची पायपीट वाढली आहे.मुख्य सेतू कार्यालयातील गर्दी नियंत्रणासाठी व नागरिकांना कागदपत्रे आपल्या परिसरात सहजपणे मिळावीत यासाठी हे सेतू सुविधा केंद्र विविध भागात सुरू करण्यात आले होते. तेथे रंगविलेले बोर्डही असून, सातारा परिसरातील महा ई-सेवा केंद्रात तर कांदे-बटाटे विक्रीचे दुकान सुरू आहे. तलाठी कार्यालयात अधिकारी उपलब्ध होत नसल्याने नवीन फेरफार व सातबारा उतारा घेण्यासाठी सातारा परिसरातील नागरिकांची धावपळ होत आहे. नागरिकांना सततच्या होणाऱ्या फेऱ्या टाळण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे; अन्यथा वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल, असे काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे म्हणाले, तर राहुल शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या असून, लवकरच आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. सेतू सुविधा केंद्र हलविल्यामुळे साताऱ्यातील नागरिकांना शहरात यावे लागते, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव जमील पटेल म्हणाले.