शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

सेतू कार्यालय बंद, तलाठीही गैरहजर

By admin | Updated: June 12, 2014 01:34 IST

औरंगाबाद : सातारा परिसरातील तलाठी कार्यालयास टाळे असल्याने अधिकारी भेटत नसल्यामुळे नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत.

औरंगाबाद : सातारा परिसरातील तलाठी कार्यालयास टाळे असल्याने अधिकारी भेटत नसल्यामुळे नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. संगणकीय सातबारे सेतूमधून घ्यावेत, अशा सूचना दिल्या असल्या तरी परिसरातील सेतू सुविधा महा ई-सेवा केंद्र बंद असून नागरिकांची मात्र धावपळ होत आहे. सातारा परिसरात एन-४७ बीच्या सर्व्हेपासून नागरिक आपल्या मालमत्तेविषयी सतर्क झाले असून, साडेदहा हजार मालमत्तांची रीतसर नोंदणी तलाठी सज्जाच्या अधिकाराखाली ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत व महसूल विभागाला मोठा महसूलही मिळाला होता. सध्याच्या स्थितीत मात्र कार्यालयाचा महसूल बुडत असल्याची तक्रार सातारा परिसरातील असंख्य नागरिकांतून होत आहे. कारण तलाठी कार्यालयात अधिकारी मिळत नसल्याने महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू होत असून, शालेय कामासाठी व बँक तसेच प्रॉपर्टीच्या कामासाठी कागदपत्रांसाठी नागरिक व पालकांची पायपीट वाढली आहे.मुख्य सेतू कार्यालयातील गर्दी नियंत्रणासाठी व नागरिकांना कागदपत्रे आपल्या परिसरात सहजपणे मिळावीत यासाठी हे सेतू सुविधा केंद्र विविध भागात सुरू करण्यात आले होते. तेथे रंगविलेले बोर्डही असून, सातारा परिसरातील महा ई-सेवा केंद्रात तर कांदे-बटाटे विक्रीचे दुकान सुरू आहे. तलाठी कार्यालयात अधिकारी उपलब्ध होत नसल्याने नवीन फेरफार व सातबारा उतारा घेण्यासाठी सातारा परिसरातील नागरिकांची धावपळ होत आहे. नागरिकांना सततच्या होणाऱ्या फेऱ्या टाळण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे; अन्यथा वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल, असे काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे म्हणाले, तर राहुल शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या असून, लवकरच आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. सेतू सुविधा केंद्र हलविल्यामुळे साताऱ्यातील नागरिकांना शहरात यावे लागते, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव जमील पटेल म्हणाले.