शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
6
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
7
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
8
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
9
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
10
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
11
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
12
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
13
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
14
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
15
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
16
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
17
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
18
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
20
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण

‘सेतू’ चा उडणार फज्जा

By admin | Updated: May 30, 2016 01:15 IST

औरंगाबाद : बारावीचा निकाल लागल्यानंतर विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांची सेतू सुविधा केंद्रात एकच गर्दी होत आहे

औरंगाबाद : बारावीचा निकाल लागल्यानंतर विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांची सेतू सुविधा केंद्रात एकच गर्दी होत आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर तर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूचा पूर्ण फज्जा उडण्याची शक्यता आहे. कारण महा ई- सेवा केंद्राकडे सध्या सेतू असून, नियोजनाअभावी प्रत्येक प्रमाणपत्राचे वेगळे काऊंटर तेथे सुरू आहे. नऊ महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाला या प्रकरणात निर्णय घेता येत नसल्याचे दिसते आहे. सध्या सेतूची यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. दलाल ठाण मांडून नागरिकांना गाठून पंधरा मिनिटांत प्रमाणपत्र देण्याचे सांगून त्यांच्याकडून रक्कम उकळत आहेत. जिल्हा प्रशासन हे निमूटपणे पाहत आहे. सेतू सुविधा केंद्राचा ठेका देण्याचा घोळ नऊ महिन्यांपासून सुरू असून, प्रशासनाने महा ई-सेवा केंद्राला सेतू केंद्र चालविण्यास दिले. यांच्यात होती स्पर्धा....सेतू सुविधा केंद्र्राचा ठेका घेण्यासाठी गुजरात इन्फोटेक, जेएमके इन्फो सॉफ्ट लि., कारवी डेटा मॅनेजमेंट, पेंटागॉन सर्व्हिसेस स्पर्धेत होते. निवडीसाठी तांत्रिक मूल्यमापन समिती नेमण्यात आली. गुजरात इन्फोटेकला कमी गुण मिळाले. गुजरात इन्फोटेकने जेएमकेच्या दोन संस्थांच्या अनुभवाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप दाखल केले, तसेच न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर जेएमकेला जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले. या निर्णयाविरोधात जेएमकेने न्यायालयात धाव घेतली. सेतू सुविधा केंद्राचा ठेका मिळविण्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव आहे. या दबावातूनच गुजरात इन्फो.ला ठेका देण्यात आला; परंतु त्या विरोधात जेएमके इन्फोने कोर्टात धाव घेतल्याने सगळे प्रकरण लांबले आहे. न्यायालयाने जेएमकेच्या अनुभवाबाबतचा मुद्दा निकाली काढत जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात इन्फोच्या बाजूने दिलेले आदेश रद्दबातल ठरविले. आता पुन्हा पुनर्मूल्यांकन करण्याची धडपड प्रशासनाने सुरू केली आहे. प्रशासनाने जेएमके व गुजरातची एनओसी मागितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मार्च २०१६ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून दहावीला ६४ हजार ६६८ विद्यार्थी बसले. या आठवडाअखेरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. यातील सुमारे ७० टक्के विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि शैक्षणिक शुल्क माफीसाठी सेतू सुविधा केंद्रातून प्रमाणपत्र काढण्यासाठी यावेच लागेल. सेतूचे नियोजन कोलमडलेले असल्यामुळे व सध्या तेथे प्रत्येक प्रमाणपत्र देण्यासाठी ‘बाजार’ भरल्याप्रमाणे स्टॉल्स लागलेले आहेत. त्यामुळे पालकांना आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने केंद्राचा ठेका कुणालाही द्यावा. किंवा महा-ई-सेवेकडेही ते काम ठेवले तर हरकत नाही; परंतु नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्यातून पारदर्शक आणि वेळेत सुविधा मिळणे अपेक्षित असल्याची मागणी जोर धरीत आहे.