शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

तक्रारींचा वेळेत निपटारा करा

By admin | Updated: April 28, 2015 00:29 IST

उस्मानाबाद : शहरातील नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेवून या तक्रारींचा वेळेत निपटारा करावा, अशा सूचना माजी राज्यमंत्री आ़ राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद : शहरातील नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेवून या तक्रारींचा वेळेत निपटारा करावा, अशा सूचना माजी राज्यमंत्री आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या़ नगर पालिकेत सोमवारी शहरवासियांच्या समस्यांबाबत बैठक बोलाविण्यात आली होती़ या बैठकीत ७५ नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या़शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासह ते सोडविण्याबाबत माजी राज्यमंत्री आ़ राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक झाली़ यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्याधिकारी शशिमोहन नंदा यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी शहरातील ७५ नागरिकांनी प्रभागनिहाय समस्या मांडल्या़ यात उजनीचा पाणीपुरवठा, तुंबणाऱ्या गटारी, रस्त्यांची झालेली दुरवस्था, प्रभागात घंटागाड्या न येणे, गटारी, कचराकुंडी साफ न करणे, बंद पडलेले पथदिवे, रस्त्यावर पडलेली वाळू, खडीमुळे होणारा त्रास आदी विविध समस्या मांडण्यात आल्या होत्या़ आलेल्या तक्रारीची माहिती व त्या सोडविण्याबाबत असलेल्या अडचणींची माहिती विभागाच्या प्रमुखांकडून आ़ पाटील यांनी घेतली़ नागरिकांची अडचणींबाबत मते जाणून घेत त्यांच्याशी चर्चा केली़ त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या़ शिवाय दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून आतापासूनच योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत मुख्याधिकारी नंदा यांना सूचना दिल्या़ यावेळी नगरसेवक संपत डोके, अमित शिंदे, कुणाल निंबाळकर, माळी, पृथ्वीराज चिलवंत, अभय इंगळे, बापू पवार, बबलू शेख, अफरोज पिरजादे नागरिक उपस्थित होते़ (प्रतिनिधी) नाल्यांची अवस्था पहाजुना बसडेपोच्या मागे असलेल्या खंडोबा मंदीर शेजारील भागातील नाल्यांची मोठी दुरवस्था झाली आहे़ त्यामुळे नागरिकांसह नगर परिषद शाळा क्ऱ१३ मधील चिमुकल्यांच्या आरोग्यावरही याचा विपरित परिणाम होत आहे़ अनेकांच्या घरात हे पाणी जात आहे़ तरी पालिका प्रशासनाने या परिसराला भेट देवून नाल्यांची पाहणी करावी, नाल्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़ निवेदनावर सुनिल निकम, तुकाराम गायकवाड, रणजित साळुंके, ज्ञानेश्वर गायकवाड, सतिश साळुंके, रौफ शेख आदीची स्वाक्षरी आहे़