शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सेनेचा अभूतपूर्व विजय

By admin | Updated: May 17, 2014 00:18 IST

उस्मानाबाद : राष्टÑवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील दोन विद्यमान मंत्री आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळात आहेत.

 उस्मानाबाद : राष्टÑवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील दोन विद्यमान मंत्री आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळात आहेत. असे असतानाही डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराचा सव्वादोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव करीत शिवसेनेने उस्मानाबादेत अभूतपूर्व विजयाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, मतदारसंघातील आजवरच्या लोकसभा निवडणुकीत इतके विक्रमी मताधिक्य प्रथमच सेनेला मिळाले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून प्रा. रवींद्र गायकवाड यांचा ६ हजार ७८७ अशा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर प्रा. गायकवाड पक्ष कार्यापासूनही काहीसे दूर होते. तर दुसरीकडे डॉ. पद्मसिंह पाटील सक्रीय झाल्याचे चित्र असतानाच राष्टÑवादीला या दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्या बार्शी विधानसभा मतदारसंघातून गायकवाड यांना सुमारे ५४ हजारांचे मताधिक्य आहे. तर पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या तुळजापूर मतदारसंघातूनही सुमारे ३४ हजारांचे मताधिक्य सेनेला प्राप्त झाले आहे. सुमारे सव्वादोन लाखांपेक्षा अधिकच्या मताधिक्यामुळे शिवसेनेसह महायुतीमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत असून, लोकसभेप्रमाणेच येणार्‍या विधानसभा निवडणुकीतही महायुतीला यश मिळेल, असा दावा आता सेनेच्या पदाधिकार्‍यांकडून केला जात आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही केवळ उस्मानाबाद आणि उमरगा या दोन मतदारसंघावर सेनेचा झेंडा फडकला होता. मात्र, तरीही राज्यातील सत्ता आघाडीच्या हाती असल्याने सेनेची कोंडी होत होती. मात्र, काँग्रेस आणि राष्टÑवादी या आघाडीतील दोन मित्रपक्षच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र होते. याचा नेमका फायदा शिवसेनेने उचलला. जिल्हा परिषद, जिल्हा बँकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतही काँग्रेस-सेना एकत्र आल्याने सेनेला नवसंजीवनी मिळाली. त्यातच गुजरातेतून सुटलेल्या नरेंद्र मोदींच्या लाटेत महाराष्टÑातील अनेक दिग्गजांसह राष्टÑवादीच्या डॉ. पद्मसिंह पाटील यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. जिंकल्याचे कारण देशभरात असलेली मोदींची लाट. कार्यक़र्त्यांचा प्रचारातील सक्रीय सहभाग. मागील पराभवाबाबत सहानुभूती महायुतीच्या पदाधिकार्‍यांतील समन्वय हरल्याचे कारण देशभरात असलेली मोदींची लाट. आघाडीच्या पदाधिकार्‍यांतील बेबनाव. जिल्ह्याबाहेरील मतदारसंघांकडे दुर्लक्ष. सत्तेविरोधात असलेला असंतोष.