शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सेनेचा अभूतपूर्व विजय

By admin | Updated: May 17, 2014 00:18 IST

उस्मानाबाद : राष्टÑवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील दोन विद्यमान मंत्री आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळात आहेत.

 उस्मानाबाद : राष्टÑवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील दोन विद्यमान मंत्री आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळात आहेत. असे असतानाही डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराचा सव्वादोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव करीत शिवसेनेने उस्मानाबादेत अभूतपूर्व विजयाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, मतदारसंघातील आजवरच्या लोकसभा निवडणुकीत इतके विक्रमी मताधिक्य प्रथमच सेनेला मिळाले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून प्रा. रवींद्र गायकवाड यांचा ६ हजार ७८७ अशा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर प्रा. गायकवाड पक्ष कार्यापासूनही काहीसे दूर होते. तर दुसरीकडे डॉ. पद्मसिंह पाटील सक्रीय झाल्याचे चित्र असतानाच राष्टÑवादीला या दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्या बार्शी विधानसभा मतदारसंघातून गायकवाड यांना सुमारे ५४ हजारांचे मताधिक्य आहे. तर पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या तुळजापूर मतदारसंघातूनही सुमारे ३४ हजारांचे मताधिक्य सेनेला प्राप्त झाले आहे. सुमारे सव्वादोन लाखांपेक्षा अधिकच्या मताधिक्यामुळे शिवसेनेसह महायुतीमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत असून, लोकसभेप्रमाणेच येणार्‍या विधानसभा निवडणुकीतही महायुतीला यश मिळेल, असा दावा आता सेनेच्या पदाधिकार्‍यांकडून केला जात आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही केवळ उस्मानाबाद आणि उमरगा या दोन मतदारसंघावर सेनेचा झेंडा फडकला होता. मात्र, तरीही राज्यातील सत्ता आघाडीच्या हाती असल्याने सेनेची कोंडी होत होती. मात्र, काँग्रेस आणि राष्टÑवादी या आघाडीतील दोन मित्रपक्षच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र होते. याचा नेमका फायदा शिवसेनेने उचलला. जिल्हा परिषद, जिल्हा बँकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतही काँग्रेस-सेना एकत्र आल्याने सेनेला नवसंजीवनी मिळाली. त्यातच गुजरातेतून सुटलेल्या नरेंद्र मोदींच्या लाटेत महाराष्टÑातील अनेक दिग्गजांसह राष्टÑवादीच्या डॉ. पद्मसिंह पाटील यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. जिंकल्याचे कारण देशभरात असलेली मोदींची लाट. कार्यक़र्त्यांचा प्रचारातील सक्रीय सहभाग. मागील पराभवाबाबत सहानुभूती महायुतीच्या पदाधिकार्‍यांतील समन्वय हरल्याचे कारण देशभरात असलेली मोदींची लाट. आघाडीच्या पदाधिकार्‍यांतील बेबनाव. जिल्ह्याबाहेरील मतदारसंघांकडे दुर्लक्ष. सत्तेविरोधात असलेला असंतोष.