शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 00:47 IST

भोकरदन : जालना जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची जानेवारी महिन्यामध्ये करण्यात येणारी निवड गुलदस्त्यात आहे़

भोकरदन : जालना जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची जानेवारी महिन्यामध्ये करण्यात येणारी निवड मात्र यावेळी गुलदस्त्यात आहे़भाजपा- सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या हिताचा असलेला जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये राज्यातील सर्वच गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा सुध्दा केली आहे. २०१५ - १६ मध्ये जिल्ह्यातील सुमारे २१५ गावांची पहिल्या टप्प्यामध्ये जलयुक्त शिवारमध्ये गावांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ - १७ मध्ये सुध्दा १९२ च्या जवळ पास गावांची दुसऱ्या टप्यामध्ये जलयुक्त शिवार योजने मध्ये गावांची निवड करून या गावामध्ये जलयुक्तच्या माध्यमातून सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याचे मोठे काम करण्यात आले होते. भोकरदन तालुक्यात जलयुक्त शिवार अभियाना सह सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सिंचनक्षेत्र वाढीचे काम करण्यात आले. भोकरदन तालुक्यात २०१५ - १६ मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये १५६ गावांपैकी ३४ गावांची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड करण्यात आली होती. तर २०१६ -१७ मध्ये ३१ गावांची निवड करण्यात आली होती. तालुक्यात गेल्या दोन वर्षा मध्ये ६५ गावांमध्ये ही योजना यशस्वीपणे राबविल्या गेली असली तरी ३५ ते ४० गावांमध्येच चांगली कामे झाली. या गावामध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. गेल्या दहा वर्षानंतर पहिल्यांदाच ३९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे २० हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झाली आहे. खोलीकरण कामांत चांगला जलसाठा झाला आहे.