शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 00:47 IST

भोकरदन : जालना जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची जानेवारी महिन्यामध्ये करण्यात येणारी निवड गुलदस्त्यात आहे़

भोकरदन : जालना जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची जानेवारी महिन्यामध्ये करण्यात येणारी निवड मात्र यावेळी गुलदस्त्यात आहे़भाजपा- सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या हिताचा असलेला जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये राज्यातील सर्वच गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा सुध्दा केली आहे. २०१५ - १६ मध्ये जिल्ह्यातील सुमारे २१५ गावांची पहिल्या टप्प्यामध्ये जलयुक्त शिवारमध्ये गावांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ - १७ मध्ये सुध्दा १९२ च्या जवळ पास गावांची दुसऱ्या टप्यामध्ये जलयुक्त शिवार योजने मध्ये गावांची निवड करून या गावामध्ये जलयुक्तच्या माध्यमातून सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याचे मोठे काम करण्यात आले होते. भोकरदन तालुक्यात जलयुक्त शिवार अभियाना सह सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सिंचनक्षेत्र वाढीचे काम करण्यात आले. भोकरदन तालुक्यात २०१५ - १६ मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये १५६ गावांपैकी ३४ गावांची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड करण्यात आली होती. तर २०१६ -१७ मध्ये ३१ गावांची निवड करण्यात आली होती. तालुक्यात गेल्या दोन वर्षा मध्ये ६५ गावांमध्ये ही योजना यशस्वीपणे राबविल्या गेली असली तरी ३५ ते ४० गावांमध्येच चांगली कामे झाली. या गावामध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. गेल्या दहा वर्षानंतर पहिल्यांदाच ३९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे २० हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झाली आहे. खोलीकरण कामांत चांगला जलसाठा झाला आहे.