शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 00:47 IST

भोकरदन : जालना जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची जानेवारी महिन्यामध्ये करण्यात येणारी निवड गुलदस्त्यात आहे़

भोकरदन : जालना जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची जानेवारी महिन्यामध्ये करण्यात येणारी निवड मात्र यावेळी गुलदस्त्यात आहे़भाजपा- सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या हिताचा असलेला जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये राज्यातील सर्वच गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा सुध्दा केली आहे. २०१५ - १६ मध्ये जिल्ह्यातील सुमारे २१५ गावांची पहिल्या टप्प्यामध्ये जलयुक्त शिवारमध्ये गावांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ - १७ मध्ये सुध्दा १९२ च्या जवळ पास गावांची दुसऱ्या टप्यामध्ये जलयुक्त शिवार योजने मध्ये गावांची निवड करून या गावामध्ये जलयुक्तच्या माध्यमातून सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याचे मोठे काम करण्यात आले होते. भोकरदन तालुक्यात जलयुक्त शिवार अभियाना सह सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सिंचनक्षेत्र वाढीचे काम करण्यात आले. भोकरदन तालुक्यात २०१५ - १६ मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये १५६ गावांपैकी ३४ गावांची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड करण्यात आली होती. तर २०१६ -१७ मध्ये ३१ गावांची निवड करण्यात आली होती. तालुक्यात गेल्या दोन वर्षा मध्ये ६५ गावांमध्ये ही योजना यशस्वीपणे राबविल्या गेली असली तरी ३५ ते ४० गावांमध्येच चांगली कामे झाली. या गावामध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. गेल्या दहा वर्षानंतर पहिल्यांदाच ३९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे २० हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झाली आहे. खोलीकरण कामांत चांगला जलसाठा झाला आहे.