शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळेना

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

पालम : तालुक्यातील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश झालेला नाही. यामुळे वंचित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे.

पालम : तालुक्यातील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश झालेला नाही. यामुळे वंचित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे. तालुक्यात २८ फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे रबी पीक वाया गेले आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागले असून शासनाच्या मदतीवरच शेतकऱ्यांची मदार होती. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अनुदानाच्या याद्या तयार करून बँकेकडे पाठविण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. परंतु या याद्यात बरीचशी तफावत झालेली आहे. गारपीट होऊनही अनेक शेतकऱ्यांची नावे अनुदानाच्या यादीतून गायब झालेली आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही पुरवणी याद्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. अनुदान यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाकडे खेटे मारणे सुरूच ठेवले आहे. चौकशी करून पुरवणी यादीत नाव समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन संबधित अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. तालुक्यातील तांदूळवाडी, पोखर्णी देवी, सिरसम, महादेववाडी, चोरवड, भालकुडकी, लांडकवाडी, सादगीरवाडी, यमगीरवाडी, डोंगरगाव, हाकेवाडी, उक्कडगाव यासह अनेक गावातील शेतकरी पीक नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ यामुळे प्रशासनाने पुरवणी यादी तयार करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शांतीस्वरुप सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्य नामदेव कदम, किशोर कदम, सचिन पवार, विठ्ठल कदम, आण्णासाहेब कदम, पंडित जाधव, रमेश मांजरे, दिगंबर जाधव, शरद जाधव, रामेश्वर जाधव, माणिक शिंदे, अरूण पाटील , गजानन शंकरे आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)पेरणीसाठी अनुदान मिळण्याची गरजपालम तालुक्यात गारपिटीने शेतकऱ्यांना हवालदील करून सोडलेले आहे. तब्बल पंधरा दिवस गारपिटीने थैमान घातले होते. यामुळे पिकांचा हाता-तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर खराब झाला. कापूस, गहू, हरभरा, करडई, कांदा, ज्वारी व बागायती पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. हे नुकसान भरून निघणारे नाही. परंंतु शासनाच्या अनुदानावर शेतकऱ्यांची गणिते अवलंबून आहेत. ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले त्यांंनी पेरणीच्या तोंडावर बियाणे व रासायनिक खतांची खरेदी केली. परंतु वंचित शेतकऱ्यांची पेरणीच्या तोंडावर परवड सुरु झाली आहे. रिकामा खिसा झाल्याने अनुदानावरच पेरणी अवलंबून आहे. यामुळे चौकशी करून वंचित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वाटप केल्यास खरीप पेरणी होईल़