शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळेना

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

पालम : तालुक्यातील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश झालेला नाही. यामुळे वंचित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे.

पालम : तालुक्यातील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश झालेला नाही. यामुळे वंचित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे. तालुक्यात २८ फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे रबी पीक वाया गेले आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागले असून शासनाच्या मदतीवरच शेतकऱ्यांची मदार होती. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अनुदानाच्या याद्या तयार करून बँकेकडे पाठविण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. परंतु या याद्यात बरीचशी तफावत झालेली आहे. गारपीट होऊनही अनेक शेतकऱ्यांची नावे अनुदानाच्या यादीतून गायब झालेली आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही पुरवणी याद्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. अनुदान यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाकडे खेटे मारणे सुरूच ठेवले आहे. चौकशी करून पुरवणी यादीत नाव समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन संबधित अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. तालुक्यातील तांदूळवाडी, पोखर्णी देवी, सिरसम, महादेववाडी, चोरवड, भालकुडकी, लांडकवाडी, सादगीरवाडी, यमगीरवाडी, डोंगरगाव, हाकेवाडी, उक्कडगाव यासह अनेक गावातील शेतकरी पीक नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ यामुळे प्रशासनाने पुरवणी यादी तयार करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शांतीस्वरुप सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्य नामदेव कदम, किशोर कदम, सचिन पवार, विठ्ठल कदम, आण्णासाहेब कदम, पंडित जाधव, रमेश मांजरे, दिगंबर जाधव, शरद जाधव, रामेश्वर जाधव, माणिक शिंदे, अरूण पाटील , गजानन शंकरे आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)पेरणीसाठी अनुदान मिळण्याची गरजपालम तालुक्यात गारपिटीने शेतकऱ्यांना हवालदील करून सोडलेले आहे. तब्बल पंधरा दिवस गारपिटीने थैमान घातले होते. यामुळे पिकांचा हाता-तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर खराब झाला. कापूस, गहू, हरभरा, करडई, कांदा, ज्वारी व बागायती पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. हे नुकसान भरून निघणारे नाही. परंंतु शासनाच्या अनुदानावर शेतकऱ्यांची गणिते अवलंबून आहेत. ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले त्यांंनी पेरणीच्या तोंडावर बियाणे व रासायनिक खतांची खरेदी केली. परंतु वंचित शेतकऱ्यांची पेरणीच्या तोंडावर परवड सुरु झाली आहे. रिकामा खिसा झाल्याने अनुदानावरच पेरणी अवलंबून आहे. यामुळे चौकशी करून वंचित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वाटप केल्यास खरीप पेरणी होईल़