शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळेना

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

पालम : तालुक्यातील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश झालेला नाही. यामुळे वंचित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे.

पालम : तालुक्यातील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश झालेला नाही. यामुळे वंचित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे. तालुक्यात २८ फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे रबी पीक वाया गेले आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागले असून शासनाच्या मदतीवरच शेतकऱ्यांची मदार होती. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अनुदानाच्या याद्या तयार करून बँकेकडे पाठविण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. परंतु या याद्यात बरीचशी तफावत झालेली आहे. गारपीट होऊनही अनेक शेतकऱ्यांची नावे अनुदानाच्या यादीतून गायब झालेली आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही पुरवणी याद्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. अनुदान यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाकडे खेटे मारणे सुरूच ठेवले आहे. चौकशी करून पुरवणी यादीत नाव समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन संबधित अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. तालुक्यातील तांदूळवाडी, पोखर्णी देवी, सिरसम, महादेववाडी, चोरवड, भालकुडकी, लांडकवाडी, सादगीरवाडी, यमगीरवाडी, डोंगरगाव, हाकेवाडी, उक्कडगाव यासह अनेक गावातील शेतकरी पीक नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ यामुळे प्रशासनाने पुरवणी यादी तयार करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शांतीस्वरुप सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्य नामदेव कदम, किशोर कदम, सचिन पवार, विठ्ठल कदम, आण्णासाहेब कदम, पंडित जाधव, रमेश मांजरे, दिगंबर जाधव, शरद जाधव, रामेश्वर जाधव, माणिक शिंदे, अरूण पाटील , गजानन शंकरे आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)पेरणीसाठी अनुदान मिळण्याची गरजपालम तालुक्यात गारपिटीने शेतकऱ्यांना हवालदील करून सोडलेले आहे. तब्बल पंधरा दिवस गारपिटीने थैमान घातले होते. यामुळे पिकांचा हाता-तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर खराब झाला. कापूस, गहू, हरभरा, करडई, कांदा, ज्वारी व बागायती पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. हे नुकसान भरून निघणारे नाही. परंंतु शासनाच्या अनुदानावर शेतकऱ्यांची गणिते अवलंबून आहेत. ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले त्यांंनी पेरणीच्या तोंडावर बियाणे व रासायनिक खतांची खरेदी केली. परंतु वंचित शेतकऱ्यांची पेरणीच्या तोंडावर परवड सुरु झाली आहे. रिकामा खिसा झाल्याने अनुदानावरच पेरणी अवलंबून आहे. यामुळे चौकशी करून वंचित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वाटप केल्यास खरीप पेरणी होईल़