शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

डेंग्यूसदृश्य तापाचा दुसरा बळी

By admin | Updated: September 1, 2014 01:06 IST

फकिरा देशमुख/बाळू मोकासरे , भोकरदन/वालसावंगी गेल्या आठ-दहा दिवसांपासून भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले असून आतापर्यंत डेंग्यूसदृश्य तापाने

फकिरा देशमुख/बाळू मोकासरे , भोकरदन/वालसावंगीगेल्या आठ-दहा दिवसांपासून भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले असून आतापर्यंत डेंग्यूसदृश्य तापाने भाऊ-बहिणीचा बळी गेल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र दुसरीकडे आरोग्य विभाग बेफिकिर असून अद्यापही या गावात पथक दाखल झालेले नाही. गेल्या आठ-दहा दिवसांपासून गावात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत २५-३० रुग्ण तापाने फणफणत आहेत. २१ आॅगस्ट रोजी निवृत्ती उर्फ राजेंद्र भालचंद्र गावंडे (वय ५) यास तापामुळे बुलढाणा येथील रुग्णालयातून औरंगाबाद येथे अधिक उपचारासाठी नेण्यात येत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर ३१ आॅगस्ट रोजी निवृत्तीची बहिण अश्विनी भालचंद्र गावंडे (वय ७ वर्षे) हिचाही डेंग्यूसदृश्य तापाने औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मात्र या प्रकारानंतरही आरोग्य विभागाच्या स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार केले जात असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. गावातील एका हातपंपास दूषित पाणी असल्याने काही जणांना ताप आल्याचा दावा आरोग्य विभागातर्फे केला जात आहे. गावात डासांचे प्रमाण वाढल्याने धूर फवारणी करणे आवश्यक आहे. आरोग्य पथक अद्याप गावात दाखल झालेले नाही. मात्र गावात तापाचे रुग्ण वाढत असून परिणामी ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पद्मावती हे पुनर्वसित गाव तलावाच्या काठावर आहे. सध्या पावसाळा असल्याने गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे तापाची लागण सुरू झाली आहे. हा ताप डेंग्यूसदृश्य असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यास दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, गावात आणखी २५-३० रुग्ण तापाने फणफणले असून आरोग्य विभागाने अद्यापही सतर्कता दाखविलेली नाही, असे सरपंच रमेश तराळ, कल्याण तराळ यांनी सांगितले. याबाबत वैद्यकीय अधिकारी अनिल वाघमारे म्हणाले, या भावंडांचा मृत्यू तापाने झाला. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे ताप कोणत्या प्रकारचा आहे, हे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याशिवाय सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.मयत मुलांचे वडील भालचंद्र गावंडे हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना अश्विनी व निवृत्ती ही दोनच अपत्ये होती. दोन अपत्यांवर त्यांनी नसबंदी करून घेतली होती. मात्र या दोन्ही अपत्यांचा तापाच्या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा संसार कोलमडल्यासारखा झाला आहे. या प्रकारामुळे गावातही शोककळा पसरली आहे. ४गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पद्मावती गावातील रोहित्र वारंवार जळाल्याने सध्या गाव अंधारात आहे. अंधारामुळेच गेल्या आठवड्यात एका वृद्धाचा साप चावून मृत्यू झाला. मात्र या पार्श्वभूमीवर महावितरणने गावात नवीन रोहित्र बसविलेले नाही.