३ ते ६ वर्षे वयोगटांतील बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाही, तसेच खासगी बालवाडी इंग्रजी माध्यमांची ज्युनिअर केजी, सीनिअर केजीमध्ये जात नाहीत व ७ ते १७ वर्षे वयोगटांतील शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध समित्यांचे गठण करावयाचे आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी व सीईओंकडे प्रस्ताव सादर केला होता. यावर त्यांनी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यासाठी समिती गठणाबाबतही कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने ही मोहीम तूर्तास स्थगित करावी, अशी मागणी शिक्षक समितीने केली आहे. कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करावी.
कोट
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, १ मार्चपासून राबविण्यात येणारी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम जिल्हाधिकारी व सीईओंनी स्थगित करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही शोधमोहीम राबवावी.
- रंजित राठोड,
जिल्हा सरचिटणीस शिक्षक समिती