शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

मनपा ठोकणार गाळ्यांना सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:18 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार मनपा प्रशासन शहरातील ३०० गाळ्यांना पोलीस बंदोबस्तात सील ठोकणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार मनपा प्रशासन शहरातील ३०० गाळ्यांना पोलीस बंदोबस्तात सील ठोकणार आहे. गुरुवार १७ आॅगस्टपासून ही कारवाई सुरू होणार असून, २१ आॅगस्ट रोजी कारवाईचा अहवाल खंडपीठात सादर करण्यात येणार आहे. ज्या व्यापाºयांच्या गाळ्यांना सील ठोकायचे आहे, त्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.शहरात महापालिकेच्या मालकीचे २० पेक्षा अधिक व्यापारी संकुल आहेत. मागील ३० वर्षांमध्ये मनपाने कोट्यवधी रुपयांच्या या संकुलांकडे अजिबात लक्ष दिले नाही. मनपाच्या गाळ्यांमध्ये कोणते भाडेकरू आहेत, ते दरवर्षी करारानुसार भाडे भरतात किंवा नाही, अनधिकृतपणे या गाळ्यांमध्ये कोणी ठाण मांडले हेसुद्धा पाहण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. २००८ मध्ये मनपाच्या गाळ्यांसंदर्भात खंडपीठात सुमोटो याचिका (क्रमांक- ६९८९) दाखल झाली. या याचिकेच्या वेळोवेळी सुनावण्या झाल्या. प्रत्येक सुनावणीच्या वेळी मनपाने एक नवीन शपथपत्र दाखल करून वेळकाढू धोरण स्वीकारले. खंडपीठाच्या ही बाब निदर्शनास येताच मागील महिन्यात खंडपीठाने थेट ३०० गाळेधारकांवर कारवाई करा, असे आदेश ४ जुलै २०१७ रोजी न्या. एस. सी. धर्माधिकारी, न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दिले. कारवाईचा अहवाल खंडपीठाला सादर करा, अशी तंबीही मनपाला दिली. खंडपीठाच्या आदेशाने मनपा प्रशासन चांगलेच हादरले. मागील एक महिन्यापासून जुन्या फायली शोधण्यात येत होत्या. सर्व गाळेधारकांच्या फायली शोधून ३०० गाळेधारकांची यादी तयार करण्यात आली. वर्षानुवर्षे पैसे न भरणाºया, करार संपलेल्या, अनधिकृतपणे गाळे बळकावून व्यवसाय करणाºयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गुरुवार १७ आॅगस्टपासून मनपा गाळे सील करणार आहे. या कामासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. मागील एक महिन्यापासून मनपाच्या मालमत्ता विभागाकडे गाळेधारकांनी पैसे भरण्यासाठी अक्षरश: रांग लावली आहे. मनपा संबंधितांकडून जुनी थकबाकीही भरून घेत आहे.