शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:06 IST

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना माध्यमिक ...

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी शाळाप्रमुखांंना दिल्या आहेत.

कोरोनामुळे बाधित झालेली शिक्षणव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. २३ नोव्हेंबर महिन्यापासून इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता शासनाने ५ वी ते ८ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महानगरपालिका हद्दीव्यतिरिक्त सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या ५ वी ते ८ वीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळा अटी व शर्तींनुसार सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी ५ वी ते ८ वीपर्यंतच्या वर्गांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ कोरोना तपासणी करून घेणे अनिवार्य आहे. काही कारणांमुळे ‘आरटीपीसीआर’ तपासणी होऊ शकली नाही, अथवा या तपासणीचा अहवाल अप्राप्त असल्यास, अशा शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यास प्रतिबंध करावा, असेही शिक्षणाधिकारी डॉ. चव्हाण यांनी शाळाप्रमुखांना कळविले आहे. याशिवाय ग्रामपंचायतस्तरावरून शाळा निर्जंतुकीकरण करावे, शाळांना ऑक्सिमीटर, थर्मलगन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

चौकट...

मनपाचाही दोन दिवसांत आदेश

शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत आदेश काढले आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासकांसोबत आपले बोलणे झाले असून, तेदेखील मनपा हद्दीतील पाचवी ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्याबाबत दोन दिवसांत आदेश निर्गमित करणार आहेत.