शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

लग्न सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा ‘आधार’

By admin | Updated: May 22, 2014 00:12 IST

शिरूर अनंतपाळ : उन्हाळ्यात विशेषत: मे महिन्यात लग्न समारंभाची मोठी घाई असते. त्यामुळे मंगल कार्यालये हाऊसफुल्ल असतात.

शिरूर अनंतपाळ : उन्हाळ्यात विशेषत: मे महिन्यात लग्न समारंभाची मोठी घाई असते. त्यामुळे मंगल कार्यालये हाऊसफुल्ल असतात. शिवाय, ते सामान्य माणसांना महागाईमुळे परवडत नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातील लग्न सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा ‘आधार’ घ्यावा लागतो, असेच चित्र अनेक गावांतून दिसून येत आहे. यातून शाळा-कॉलेजना शैक्षणिक वाटचाल करण्यासाठी थोडाफार मदतनिधीही उपलब्ध होत आहे. तुलसी विवाहानंतर साधारणपणे विवाह सोहळ्यांना सुरुवात होते. परंतु, त्या कालावधीत खरीप आणि रबी हंगामातील अनेक शेती मशागतीची कामे असतात. त्यामुळे विवाह समारंभास उपस्थित राहणे कठीण असते. उन्हाळ्यात विशेषत: मे महिन्यात शेतीची कामे आटोपलेली असतात. त्यामुळे मे महिन्यातच लगीनघाई सुरू असते. या महिन्याच्या शेवटी तर एकाच तारखेस अनेक विवाह समारंभ सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे मंगल कार्यालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्याच वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना ती परवडणारी सुद्धा नाहीत. यासाठी ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा आधार घ्यावा लागत आहे. माफक भाड्यात किंबहुना काही ठिकाणी तर मोफतच या इमारतींचा लाभ घेतला जातो. परिणामी, विवाह सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा आधार मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.(वार्ताहर) शैक्षणिक मदतनिधी... समाजाचा सहभाग मिळवून शैक्षणिक मदतनिधी मिळवून शाळेच्या विधायक कामांंसाठी खर्च करावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येते. त्यामुळे काही शाळा रितसर भाडे पावती देऊन शाळा-कॉलेजची इमारत लग्न समारंभासाठी देतात. परंतु, असा संकेत पाळणार्‍या शाळा क्वचितच असल्या तरी लग्न सोहळ्यासाठी शाळा-कॉलेजचाच वापर होतो. अवकाळीचाही अडथळा... मार्च महिन्यापासून सातत्याने अवकाळी पावसाचा फटका विवाह समारंभास बसत आहे. वादळी वार्‍यात शामियाने मंडप उडून फाटून जात आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यावर पाणी पडत आहे. यामुळेही शाळा-कॉलेजचा ‘आधार’ घ्यावा लागत आहे. माफक भाड्यात किंबहुना मोफत इमारत अन् सुरक्षितता मिळते.