शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

लग्न सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा ‘आधार’

By admin | Updated: May 22, 2014 00:12 IST

शिरूर अनंतपाळ : उन्हाळ्यात विशेषत: मे महिन्यात लग्न समारंभाची मोठी घाई असते. त्यामुळे मंगल कार्यालये हाऊसफुल्ल असतात.

शिरूर अनंतपाळ : उन्हाळ्यात विशेषत: मे महिन्यात लग्न समारंभाची मोठी घाई असते. त्यामुळे मंगल कार्यालये हाऊसफुल्ल असतात. शिवाय, ते सामान्य माणसांना महागाईमुळे परवडत नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातील लग्न सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा ‘आधार’ घ्यावा लागतो, असेच चित्र अनेक गावांतून दिसून येत आहे. यातून शाळा-कॉलेजना शैक्षणिक वाटचाल करण्यासाठी थोडाफार मदतनिधीही उपलब्ध होत आहे. तुलसी विवाहानंतर साधारणपणे विवाह सोहळ्यांना सुरुवात होते. परंतु, त्या कालावधीत खरीप आणि रबी हंगामातील अनेक शेती मशागतीची कामे असतात. त्यामुळे विवाह समारंभास उपस्थित राहणे कठीण असते. उन्हाळ्यात विशेषत: मे महिन्यात शेतीची कामे आटोपलेली असतात. त्यामुळे मे महिन्यातच लगीनघाई सुरू असते. या महिन्याच्या शेवटी तर एकाच तारखेस अनेक विवाह समारंभ सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे मंगल कार्यालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्याच वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना ती परवडणारी सुद्धा नाहीत. यासाठी ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा आधार घ्यावा लागत आहे. माफक भाड्यात किंबहुना काही ठिकाणी तर मोफतच या इमारतींचा लाभ घेतला जातो. परिणामी, विवाह सोहळ्यांना शाळा-कॉलेजचा आधार मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.(वार्ताहर) शैक्षणिक मदतनिधी... समाजाचा सहभाग मिळवून शैक्षणिक मदतनिधी मिळवून शाळेच्या विधायक कामांंसाठी खर्च करावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येते. त्यामुळे काही शाळा रितसर भाडे पावती देऊन शाळा-कॉलेजची इमारत लग्न समारंभासाठी देतात. परंतु, असा संकेत पाळणार्‍या शाळा क्वचितच असल्या तरी लग्न सोहळ्यासाठी शाळा-कॉलेजचाच वापर होतो. अवकाळीचाही अडथळा... मार्च महिन्यापासून सातत्याने अवकाळी पावसाचा फटका विवाह समारंभास बसत आहे. वादळी वार्‍यात शामियाने मंडप उडून फाटून जात आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यावर पाणी पडत आहे. यामुळेही शाळा-कॉलेजचा ‘आधार’ घ्यावा लागत आहे. माफक भाड्यात किंबहुना मोफत इमारत अन् सुरक्षितता मिळते.