शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून सव्वाशे नोटिसा

By admin | Updated: June 23, 2016 01:36 IST

औरंगाबाद : महावितरणने शहरात सध्या कायमस्वरुपी वीज बंद केलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम उघडली आहे. यामध्ये आतापर्यंत

औरंगाबाद : महावितरणने शहरात सध्या कायमस्वरुपी वीज बंद केलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम उघडली आहे. यामध्ये आतापर्यंत ११५ जणांनी बेकायदेशीररीत्या दुसरे मीटर घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महावितरणच्या नियमानुसार वीज देयक न भरणाऱ्या तसेच प्रत्यक्ष वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला जातो. संबंधित ग्राहकांचे मीटरही काढून घेण्यात येते. या ग्राहकांना नव्याने कनेक्शन देणे हा गुन्हा आहे. तरीही शहरात अशा किती तरी ग्राहकांना नवीन मीटर दिले गेले आहे.महावितरण कंपनीने सध्या कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पंधरा दिवसांपासून महावितरणचे पथक अशा ग्राहकांच्या घरी जाऊन तपासणी करीत आहेत. आतापर्यंत सुमारे ११५ जणांना नियमाविरुद्ध मीटर दिले गेल्याचे आढळून आले आहे. यातील काही जणांनी त्याच नावाने तर काही जणांनी दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने मीटर घेतले आहे. ही बाब आढळल्यामुळे महावितरण कंपनीने या सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत. शहरात कायमस्वरुपी वीज कनेक्शन कापलेल्या ग्राहकांची संख्या ही सुमारे ३० हजार इतकी आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपासून शहरात पीडी (कायमस्वरुपी वीज कापलेल्या) ग्राहकांची तपासणी सुरू आहे. पीडी ग्राहकांची संख्या मोठी आहे.सध्याच्या काळात विजेशिवाय राहणे कुणालाही शक्य नाही. त्यामुळे हे लोक कुठून तरी वीज वापरत असणार हे नक्की आहे. म्हणूनच ते कुठून वीज वापरताहेत, त्यांना नवीन मीटर दिले गेले आहे का, दिले असेल तर ते कुणी दिले याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत शहरात ११५ जणांनी दुसरे मीटर घेतल्याचे आढळून आले आहे. सध्या त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.