शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

सव्वाकोटीचे रस्ते मंजूर

By admin | Updated: February 13, 2015 00:46 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये तब्बल सव्वाकोटीच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. तसेच मागासवर्गीय शेतकऱ्यांना विद्युतपंप वाटपासह मंजुरी मिळाली.

उस्मानाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये तब्बल सव्वाकोटीच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. तसेच मागासवर्गीय शेतकऱ्यांना विद्युतपंप वाटपासह मंजुरी मिळाली.जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, सभापती हरिष डावरे, बाबुराव राठोड, सदस्य प्रशांत चेडे, दत्ता साळुंके, मधुकर मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन किमी अंतर असलेला दाऊतपूरला जोडणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. परिणामी या भागातील ग्रामस्थांना प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे सदरील रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होत होती. त्यावर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानुसार केंद्रिय तेराव्या वित्त आयोगातून या रस्त्यासाठी ३४ लाख ५० हजारांचा निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच कवडेवाडी हा रस्तादेखील खराब झाला होता. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. याही रस्त्याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सदरील साडेचार किमी रस्त्यावर ४५ लाख रूपये खर्च होणार आहेत. दरम्यान, उपळाई-सापनाई-सेलगाव या रस्त्याच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. खराब रस्त्यामुळे विशेषत: पावसाळ्यमध्ये ग्रामस्थ जेरीस येत होते. ही समस्या लक्षात घेवून जिल्हा परिषदेकडून ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. हिप्परगा-हराळी-तावसी या रस्त्यासाठीही ४५ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांच्या जोखडातून ग्रामस्थांची सुटका होणार आहे. (प्रतिनिधी) विद्युतपंपासाठी ४० लाख रुपयेजिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागासवर्गीय शेतकऱ्यांना अनुदानावर विद्युतपंप वाटप करण्यात येते. या योजनेसाठी ४० लाखांची तरतूर करण्यात आली आहे. या खर्चालाही स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे विद्युतपंप खरेदीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.पाणी टंचाईवरही चर्चास्थायी समितीच्या बैठकीमध्ये पाणीटंचाईवरही चर्चा करण्यात आली. सध्या १२ टँकर आणि १९४ अधिग्रहणांच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. ही टंचाई भविष्यात आणखी तीव्र रूप धारण करणार असल्याने पाणी योजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांनी यांनी दिले.