शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

सव्वाकोटीचे रस्ते मंजूर

By admin | Updated: February 13, 2015 00:46 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये तब्बल सव्वाकोटीच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. तसेच मागासवर्गीय शेतकऱ्यांना विद्युतपंप वाटपासह मंजुरी मिळाली.

उस्मानाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये तब्बल सव्वाकोटीच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. तसेच मागासवर्गीय शेतकऱ्यांना विद्युतपंप वाटपासह मंजुरी मिळाली.जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, सभापती हरिष डावरे, बाबुराव राठोड, सदस्य प्रशांत चेडे, दत्ता साळुंके, मधुकर मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन किमी अंतर असलेला दाऊतपूरला जोडणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. परिणामी या भागातील ग्रामस्थांना प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे सदरील रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होत होती. त्यावर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानुसार केंद्रिय तेराव्या वित्त आयोगातून या रस्त्यासाठी ३४ लाख ५० हजारांचा निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच कवडेवाडी हा रस्तादेखील खराब झाला होता. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. याही रस्त्याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सदरील साडेचार किमी रस्त्यावर ४५ लाख रूपये खर्च होणार आहेत. दरम्यान, उपळाई-सापनाई-सेलगाव या रस्त्याच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. खराब रस्त्यामुळे विशेषत: पावसाळ्यमध्ये ग्रामस्थ जेरीस येत होते. ही समस्या लक्षात घेवून जिल्हा परिषदेकडून ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. हिप्परगा-हराळी-तावसी या रस्त्यासाठीही ४५ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांच्या जोखडातून ग्रामस्थांची सुटका होणार आहे. (प्रतिनिधी) विद्युतपंपासाठी ४० लाख रुपयेजिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागासवर्गीय शेतकऱ्यांना अनुदानावर विद्युतपंप वाटप करण्यात येते. या योजनेसाठी ४० लाखांची तरतूर करण्यात आली आहे. या खर्चालाही स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे विद्युतपंप खरेदीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.पाणी टंचाईवरही चर्चास्थायी समितीच्या बैठकीमध्ये पाणीटंचाईवरही चर्चा करण्यात आली. सध्या १२ टँकर आणि १९४ अधिग्रहणांच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. ही टंचाई भविष्यात आणखी तीव्र रूप धारण करणार असल्याने पाणी योजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांनी यांनी दिले.