शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

सत्यशोधक विवाह चळवळ गतिमान व्हावी : प्रतिमा परदेशी

By admin | Updated: February 5, 2017 23:18 IST

लातूर :भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात रविवारी तिसरे राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.

लातूर : सत्यशोधक सहजीवन, सत्यशोधक विवाह, सत्यशोधक घरभरणी, सत्यशोधक राष्ट्रवाद याचा स्वीकार करणे हा मुक्ता साळवेंचा विचार प्रसारित होणे गरजेचे आहे. ब्राह्मणशाही फक्त पोथी-पुराणात, धार्मिक कर्मकांडातूनच व्यक्त होत नाही, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात ती शोषिकाची भूमिका वठविते, हे वास्तव मुक्ता साळवे यांनी आपल्या निबंधातून अधोरेखित केले असल्याचे मत मुक्ता साळवे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी येथे व्यक्त केले.भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात रविवारी तिसरे राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर उद्घाटक ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. रमेश पारवे, संयोजक प्राचार्य डॉ. माधव गादेकर, रमेश राक्षे, बी.पी. सूर्यवंशी, दशरथ सरवदे यांची उपस्थिती होती.प्रा. परदेशी पुढे म्हणाल्या, मुक्ता साळवेंचा विचार प्रसारित करताना सत्य धर्माच्या प्रचार-प्रसारासोबत सत्यशोधक विवाहाची चळवळही गतिमान केली पाहिजे. ब्राह्मणी धर्माच्या शोषणाला, वर्चस्ववादाला रोखण्यासाठी सत्यशोधक सहजीवन, सत्यशोधक विवाह, सत्यशोधक घरभरणी, सत्यशोधक राष्ट्रवाद याचा विचार स्वीकारणे काळाची गरज आहे. मनुस्मृतीने कनिष्ठ जातींना ज्ञानाचा अधिकार नाकारला होता. जर कोणी ज्ञानार्जनाचा प्रयत्न केलाच, तर त्याचे मुंडके धडावेगळे केले जाई. वेद ऐकले तर तप्त शिस्याचा रस कानात ओतणे, पाहिले तर डोळे काढणे, वाचले तर जीभ हसाडणे यासारख्या शिक्षा मनुस्मृती देते. ज्ञानावरील ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान उभे राहू नये, यासाठी धर्मग्रंथ रचले गेले आणि दंडकही घालण्यात आले होते. मुक्ता साळवे याच इतिहासाची आठवण करून देते, असेही त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन दयानंद कांबळे यांनी केले. अशोक तोगरे यांनी आभार मानले. संमेलनाला अभ्यासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. (आणखी वृत्त हॅलो / २ वर)