शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

सत्यशोधक विवाह चळवळ गतिमान व्हावी : प्रतिमा परदेशी

By admin | Updated: February 5, 2017 23:18 IST

लातूर :भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात रविवारी तिसरे राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.

लातूर : सत्यशोधक सहजीवन, सत्यशोधक विवाह, सत्यशोधक घरभरणी, सत्यशोधक राष्ट्रवाद याचा स्वीकार करणे हा मुक्ता साळवेंचा विचार प्रसारित होणे गरजेचे आहे. ब्राह्मणशाही फक्त पोथी-पुराणात, धार्मिक कर्मकांडातूनच व्यक्त होत नाही, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात ती शोषिकाची भूमिका वठविते, हे वास्तव मुक्ता साळवे यांनी आपल्या निबंधातून अधोरेखित केले असल्याचे मत मुक्ता साळवे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी येथे व्यक्त केले.भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात रविवारी तिसरे राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर उद्घाटक ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. रमेश पारवे, संयोजक प्राचार्य डॉ. माधव गादेकर, रमेश राक्षे, बी.पी. सूर्यवंशी, दशरथ सरवदे यांची उपस्थिती होती.प्रा. परदेशी पुढे म्हणाल्या, मुक्ता साळवेंचा विचार प्रसारित करताना सत्य धर्माच्या प्रचार-प्रसारासोबत सत्यशोधक विवाहाची चळवळही गतिमान केली पाहिजे. ब्राह्मणी धर्माच्या शोषणाला, वर्चस्ववादाला रोखण्यासाठी सत्यशोधक सहजीवन, सत्यशोधक विवाह, सत्यशोधक घरभरणी, सत्यशोधक राष्ट्रवाद याचा विचार स्वीकारणे काळाची गरज आहे. मनुस्मृतीने कनिष्ठ जातींना ज्ञानाचा अधिकार नाकारला होता. जर कोणी ज्ञानार्जनाचा प्रयत्न केलाच, तर त्याचे मुंडके धडावेगळे केले जाई. वेद ऐकले तर तप्त शिस्याचा रस कानात ओतणे, पाहिले तर डोळे काढणे, वाचले तर जीभ हसाडणे यासारख्या शिक्षा मनुस्मृती देते. ज्ञानावरील ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान उभे राहू नये, यासाठी धर्मग्रंथ रचले गेले आणि दंडकही घालण्यात आले होते. मुक्ता साळवे याच इतिहासाची आठवण करून देते, असेही त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन दयानंद कांबळे यांनी केले. अशोक तोगरे यांनी आभार मानले. संमेलनाला अभ्यासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. (आणखी वृत्त हॅलो / २ वर)