शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

साठे चौक बंद, मात्र वाहतूक समस्या कायम

By admin | Updated: November 25, 2015 23:23 IST

शिरीष शिंदे , बीड मोठ्या अपघातास कारणीभूत ठरणारा अण्णा भाऊ साठे चौक अधीक्षकांच्या सुचनेवरुन बंद करत वाहतूक अश्विनी हॉटेल समोरून वळविण्यात आली.

शिरीष शिंदे , बीडमोठ्या अपघातास कारणीभूत ठरणारा अण्णा भाऊ साठे चौक अधीक्षकांच्या सुचनेवरुन बंद करत वाहतूक अश्विनी हॉटेल समोरून वळविण्यात आली. मात्र, वाहतूक समस्या अद्यापही कायमच आहे. येथे सिग्नल बसविणे अत्यंत जोखमीचे ठरणार असल्याचे वाहतूक पोलिसांचे मत आहे तर वाहनधारकांनाही वळण घेताना अपघाताचा धोका कायम असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पहाणीवरुन समजुन आले. त्यामुळे वीर हॉस्पिटलजवळ सिग्नल बसविल्यास तो सर्वांनाच फायदेशीर ठरेल असे मत सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. शहरातून राष्ट्रीय मार्ग गेल्यामुळे दिवसरात्र हा रस्ता रहदारीने व्यस्त असतो. मालवाहू गाड्यांमुळे अनेकांचे प्राण अण्णा भाऊ साठे चौकात गेले आहेत. चौक हा अपघाताचे केंद्र असल्यामुळे तो कायमचा बंद करण्याचे धाडस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले. ही वाहतूक हॉटेल अश्विनी समोरुन वळविली. ज्यांना सुभाष रोडकडे जायचे आहे त्यांनी हॉटेल अश्विनीसमोरून वळून क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या किंवा वळण घेऊन सरळ जात साठे चौकातून खाली जाण्याचे नियोजन झाले. चार रस्ते जोडणारा मात्र चौक नसणारा रस्तासाठे चौक बंद केल्यामुळे हॉटेल अश्विनीकडे जाण्याऱ्यांची संख्या अधिक वाढली. हा भाग हा चौक होत नाही. कारण, सहयोगनगर भागातून येणारा रस्ता, हनुमान मंदिराकडून येणारा रस्ता समोरासमोर नाही. त्यामुळे चौक होत नाही. अशा परिस्थितीत येथे सिग्नल लावणे हा योग्य निर्णय नसल्याचे समोर आले. वीर हॉस्पिटलसमोरील जागा योग्य वीर हॉस्पिटलसमोर मोठी जागा आहे कारण त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा सोडली आहे तर समोर विरुद्धबाजुला मोकळी जागा आहे. या ठिकाणी सिग्नल बसविल्यास बसस्थानकाकडून येणारी वाहने थांबतील. तसेच त्यांना अश्विनी हॉटेलसमोर जाऊन वळण्याची गरज भासणार नाही. याचा लाभ व्यापाऱ्यांना होईल. वीर हॉस्पिटलसमोर सिग्नल झाला तर नागरिकांना लगेच सुभाष रोडला जाता येईल. तसेच वीर हॉस्पिटलाच्या बाजुला रस्त्याच्या बाजुला उभी राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे शक्य होईल, अशा प्रतिक्रीया सर्व सामान्य नागरिकातून व्यक्त होत आहेत.अश्विनी हॉटेलसमोर सिग्नल बसविण्याचा पेच वाहतूक पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. या ठिकाणी सिग्नल बसविल्यास बसस्थानकाकडील येणारी वाहतूक सिग्नलवर येऊन थांबेल तर जालना रोडकडील येणारी वाहतूक ही दुसऱ्या बाजूने सिग्नलवर थांबेल. सिग्नल ग्रीन होण्यासाठी १ मिनिट २० सेकंदाचा कालावधी निश्चित केला तर यावेळेत मोंढा रोडकडे जाणारा रस्ता मोठ्या वाहनांमुळे ब्लॉक होईल. दुसरी बाब म्हणजे, सहयोगनगर भागातून व हनुमान मंदिराकडून येणारे वाहनधारक थांबु शकणार नाहीत. त्यांना जायचे असेल तर जालना रोडकडूून स्थानकाकडे व बसस्थानकाकडून जाणारी वाहने थांबली पाहिजेत. मात्र, सिग्नल त्या बाजुने असायला हवे हे होणे शक्य नाही. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल बसविणे हा डोक्याला ताप होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.