औरंगाबाद : पावसाळ्यात साताऱ्यासह औरंगाबाद तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे ५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अंतर जास्त असल्यामुळे एक टँकर फक्त दोनच फेऱ्या करते. मनपाच्या जलवाहिनीवर टँकरचे पाणी भरण्यासाठी पॉइंटची मागणी प्रशासनाने केली आहे. लवकरच मनपाच्या नक्षत्रवाडी पॉइंटवरून पाणीपुरवठा सुरू होण्याचे संकेत आहेत.साताऱ्यात १३ टँकर सुरू असून, ६ टँकर बजाजनगर, वडगाव व इतर देवळाईत एकूण २२ टँकर आणि तालुक्यातील ३० टँकर रोज २ फेऱ्या करीत आहेत. अनेकदा एकच फेरी होते. टँकर गल्लीबोळांमध्ये जाऊ शकत नसल्यामुळे छोट्या टँकरचीही सोय सातारा परिसरात करावी लागली आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे टँकरची संख्या वाढवून द्यावी, तसेच गेल्यावर्षी महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून पॉइंट काढून द्यावेत, अशी मागणी तहसीलदार विजय राऊत यांच्याकडे राहुल सिरसाट, सोमीनाथ शिराणे यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच केली. साताऱ्यात दुर्भिक्षसाताऱ्यातील लोकसंख्या पाऊण लाख झाली असून, त्यांना पुरेसे पाणी मिळेल, अशी व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. मनपाकडे पाण्याची मागणीगेल्यावर्षी वाल्मी नक्षत्रवाडीतील मनपाच्या जलवाहिनीवरून पॉइंट काढून साताऱ्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसाच पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे वारंवार केली आहे. शेंद्रा येथून टँकरने पाणी आणणे जास्त खर्चिक झाले आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कोल्हे यांच्याकडे तहसीलच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आलेला असून, तहसीलने मनपाच्या जलवाहिनीवरून टँकर भरण्याची परवानगी मागितली आहे; पण प्रत्यक्ष टँकर कधी मिळेल, असा सातारावासीयांपुढे प्रश्न आहे. मनपाशी पत्रव्यवहारतहसीलच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बिसलवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांशी पाण्यासाठी पत्रव्यवहार केला असून त्यांच्या परवानगीची वाट बघत आहोत, असे सांगितले.
साताऱ्याला मिळणार मनपाचे टँकरचे पाणी
By admin | Updated: July 20, 2014 00:59 IST