शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ग्रेज्युएशन डिग्रीशी संबंधित माहितीचा खुलासा होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
4
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
5
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
6
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
7
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
8
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
9
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
10
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
11
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
12
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
13
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
14
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
15
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
16
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
17
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
18
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
19
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
20
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा

साताऱ्याला मिळणार मनपाचे टँकरचे पाणी

By admin | Updated: July 20, 2014 00:59 IST

औरंगाबाद : पावसाळ्यात साताऱ्यासह औरंगाबाद तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे ५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

औरंगाबाद : पावसाळ्यात साताऱ्यासह औरंगाबाद तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे ५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अंतर जास्त असल्यामुळे एक टँकर फक्त दोनच फेऱ्या करते. मनपाच्या जलवाहिनीवर टँकरचे पाणी भरण्यासाठी पॉइंटची मागणी प्रशासनाने केली आहे. लवकरच मनपाच्या नक्षत्रवाडी पॉइंटवरून पाणीपुरवठा सुरू होण्याचे संकेत आहेत.साताऱ्यात १३ टँकर सुरू असून, ६ टँकर बजाजनगर, वडगाव व इतर देवळाईत एकूण २२ टँकर आणि तालुक्यातील ३० टँकर रोज २ फेऱ्या करीत आहेत. अनेकदा एकच फेरी होते. टँकर गल्लीबोळांमध्ये जाऊ शकत नसल्यामुळे छोट्या टँकरचीही सोय सातारा परिसरात करावी लागली आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे टँकरची संख्या वाढवून द्यावी, तसेच गेल्यावर्षी महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून पॉइंट काढून द्यावेत, अशी मागणी तहसीलदार विजय राऊत यांच्याकडे राहुल सिरसाट, सोमीनाथ शिराणे यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच केली. साताऱ्यात दुर्भिक्षसाताऱ्यातील लोकसंख्या पाऊण लाख झाली असून, त्यांना पुरेसे पाणी मिळेल, अशी व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. मनपाकडे पाण्याची मागणीगेल्यावर्षी वाल्मी नक्षत्रवाडीतील मनपाच्या जलवाहिनीवरून पॉइंट काढून साताऱ्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसाच पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे वारंवार केली आहे. शेंद्रा येथून टँकरने पाणी आणणे जास्त खर्चिक झाले आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कोल्हे यांच्याकडे तहसीलच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आलेला असून, तहसीलने मनपाच्या जलवाहिनीवरून टँकर भरण्याची परवानगी मागितली आहे; पण प्रत्यक्ष टँकर कधी मिळेल, असा सातारावासीयांपुढे प्रश्न आहे. मनपाशी पत्रव्यवहारतहसीलच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बिसलवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांशी पाण्यासाठी पत्रव्यवहार केला असून त्यांच्या परवानगीची वाट बघत आहोत, असे सांगितले.