शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

साताऱ्याला मिळणार मनपाचे टँकरचे पाणी

By admin | Updated: July 20, 2014 00:59 IST

औरंगाबाद : पावसाळ्यात साताऱ्यासह औरंगाबाद तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे ५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

औरंगाबाद : पावसाळ्यात साताऱ्यासह औरंगाबाद तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे ५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अंतर जास्त असल्यामुळे एक टँकर फक्त दोनच फेऱ्या करते. मनपाच्या जलवाहिनीवर टँकरचे पाणी भरण्यासाठी पॉइंटची मागणी प्रशासनाने केली आहे. लवकरच मनपाच्या नक्षत्रवाडी पॉइंटवरून पाणीपुरवठा सुरू होण्याचे संकेत आहेत.साताऱ्यात १३ टँकर सुरू असून, ६ टँकर बजाजनगर, वडगाव व इतर देवळाईत एकूण २२ टँकर आणि तालुक्यातील ३० टँकर रोज २ फेऱ्या करीत आहेत. अनेकदा एकच फेरी होते. टँकर गल्लीबोळांमध्ये जाऊ शकत नसल्यामुळे छोट्या टँकरचीही सोय सातारा परिसरात करावी लागली आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे टँकरची संख्या वाढवून द्यावी, तसेच गेल्यावर्षी महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून पॉइंट काढून द्यावेत, अशी मागणी तहसीलदार विजय राऊत यांच्याकडे राहुल सिरसाट, सोमीनाथ शिराणे यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच केली. साताऱ्यात दुर्भिक्षसाताऱ्यातील लोकसंख्या पाऊण लाख झाली असून, त्यांना पुरेसे पाणी मिळेल, अशी व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. मनपाकडे पाण्याची मागणीगेल्यावर्षी वाल्मी नक्षत्रवाडीतील मनपाच्या जलवाहिनीवरून पॉइंट काढून साताऱ्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसाच पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे वारंवार केली आहे. शेंद्रा येथून टँकरने पाणी आणणे जास्त खर्चिक झाले आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कोल्हे यांच्याकडे तहसीलच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आलेला असून, तहसीलने मनपाच्या जलवाहिनीवरून टँकर भरण्याची परवानगी मागितली आहे; पण प्रत्यक्ष टँकर कधी मिळेल, असा सातारावासीयांपुढे प्रश्न आहे. मनपाशी पत्रव्यवहारतहसीलच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बिसलवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांशी पाण्यासाठी पत्रव्यवहार केला असून त्यांच्या परवानगीची वाट बघत आहोत, असे सांगितले.