शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

शेतकऱ्यांसाठी संजीवनी योजना

By admin | Updated: July 3, 2014 00:20 IST

जालना : महावितरणची जालना जिल्ह्यातील कृषीपंपधारक २ लाख ९५ हजार ४६३ शेतकऱ्यांकडे ६३० कोटी ३६ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे.

जालना : महावितरणची जालना जिल्ह्यातील कृषीपंपधारक २ लाख ९५ हजार ४६३ शेतकऱ्यांकडे ६३० कोटी ३६ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्ती मिळण्यासाठी शासनाने व महावितरण कंपनीकडून कृषि संजीवनी योजना-२०१४ राबण्यिात येत आहे.शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के म्हणजे ३१५ कोटी १८ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केल्यास त्यांना ६८५ कोटी ५० लाख १८ हजार रुपये व्याज व दंडाची माफी मिळणार आहे.कृषि संजीवनी योजना २०१४ या योजनेत चालू कृषीपंपधारकांना ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या एकूण थकबाकी पैकी निव्वळ ५० टक्के रक्कम एकरकमी आॅगस्ट २०१४ पर्यंत भरता येईल. अन्यथा ५० टक्के मुळ थकबाकीच्या रक्कमेत तीन मासिक हप्ते म्हणजे ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के, ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत २० टक्के व ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत उरलेली १० टक्के रक्कम भरता येईल. तसेच या योजनेत १ एप्रिल २०१४ पासूनची सर्व चालू बिले पूर्णपणे व ििनयमित भरणे आवश्यक आहे. अशा ग्राहकांना पुढील दोन त्रैमासिक बिलांमध्ये ५० टक्के माफी दिली जाणार आहे. ही रक्कम शासनाकडून महावितरणला अनुदान स्वरुपात मिळणार आहे.जिल्ह्यात मार्च २०१४ अखेर शेतीपंपाचे १ लाख २ हजार ३२१ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची २६२ कोटी ९४ लाख ८० हजार रुपयांची थकबाकी आहे. कृषि संजीवनी योजनेनुसार शेतकऱ्यांनी ५० टक्के रक्कम १३१ कोटी ४७ लाख ४० हजार रुपये भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम टप्प्यात ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के म्हणजे ५२ कोटी ५८ लाख ९६ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. तिसऱ्या टप्प्यात ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत १० टक्के म्हणजे ३६ कोटी ७४ लाख १७ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ३६५ कोटी ३१ लाख ८३ हजार १९३ रुपये व्याज व दंडाची ७ कोटी ३४ लाख ८६ हजार रुपये म्हणजे ३७२ कोटी ६६ लाख ६६ हजार रुपये माफ होणार आहेत.या कृषि संजीवनी योजनेत सहभागी न होणाऱ्या ग्राहकांना अपात्र ठरविण्यात येईल. त्यांना व्याज व दंड माफीचा फायदा मिळणार नाही. शेतीपंप वीज ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेऊन जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, या योजनेचा जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकी भरावे, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता मासूळ यांनी केले. (वार्ताहर)बिलावरील व्याज व दंड होणार माफशेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के म्हणजे ३१५ कोटी १८ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केल्यास त्यांना ६८५ कोटी ५० लाख १८ हजार रुपये व्याज व दंडाची माफी मिळणार आहे.शेतीपंपाचे १ लाख २ हजार ३२१ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची २६२ कोटी ९४ लाख ८० हजार रुपयांची थकबाकी आहे.