शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

शेतकऱ्यांसाठी संजीवनी योजना

By admin | Updated: July 3, 2014 00:20 IST

जालना : महावितरणची जालना जिल्ह्यातील कृषीपंपधारक २ लाख ९५ हजार ४६३ शेतकऱ्यांकडे ६३० कोटी ३६ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे.

जालना : महावितरणची जालना जिल्ह्यातील कृषीपंपधारक २ लाख ९५ हजार ४६३ शेतकऱ्यांकडे ६३० कोटी ३६ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्ती मिळण्यासाठी शासनाने व महावितरण कंपनीकडून कृषि संजीवनी योजना-२०१४ राबण्यिात येत आहे.शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के म्हणजे ३१५ कोटी १८ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केल्यास त्यांना ६८५ कोटी ५० लाख १८ हजार रुपये व्याज व दंडाची माफी मिळणार आहे.कृषि संजीवनी योजना २०१४ या योजनेत चालू कृषीपंपधारकांना ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या एकूण थकबाकी पैकी निव्वळ ५० टक्के रक्कम एकरकमी आॅगस्ट २०१४ पर्यंत भरता येईल. अन्यथा ५० टक्के मुळ थकबाकीच्या रक्कमेत तीन मासिक हप्ते म्हणजे ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के, ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत २० टक्के व ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत उरलेली १० टक्के रक्कम भरता येईल. तसेच या योजनेत १ एप्रिल २०१४ पासूनची सर्व चालू बिले पूर्णपणे व ििनयमित भरणे आवश्यक आहे. अशा ग्राहकांना पुढील दोन त्रैमासिक बिलांमध्ये ५० टक्के माफी दिली जाणार आहे. ही रक्कम शासनाकडून महावितरणला अनुदान स्वरुपात मिळणार आहे.जिल्ह्यात मार्च २०१४ अखेर शेतीपंपाचे १ लाख २ हजार ३२१ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची २६२ कोटी ९४ लाख ८० हजार रुपयांची थकबाकी आहे. कृषि संजीवनी योजनेनुसार शेतकऱ्यांनी ५० टक्के रक्कम १३१ कोटी ४७ लाख ४० हजार रुपये भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम टप्प्यात ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के म्हणजे ५२ कोटी ५८ लाख ९६ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. तिसऱ्या टप्प्यात ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत १० टक्के म्हणजे ३६ कोटी ७४ लाख १७ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ३६५ कोटी ३१ लाख ८३ हजार १९३ रुपये व्याज व दंडाची ७ कोटी ३४ लाख ८६ हजार रुपये म्हणजे ३७२ कोटी ६६ लाख ६६ हजार रुपये माफ होणार आहेत.या कृषि संजीवनी योजनेत सहभागी न होणाऱ्या ग्राहकांना अपात्र ठरविण्यात येईल. त्यांना व्याज व दंड माफीचा फायदा मिळणार नाही. शेतीपंप वीज ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेऊन जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, या योजनेचा जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकी भरावे, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता मासूळ यांनी केले. (वार्ताहर)बिलावरील व्याज व दंड होणार माफशेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के म्हणजे ३१५ कोटी १८ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केल्यास त्यांना ६८५ कोटी ५० लाख १८ हजार रुपये व्याज व दंडाची माफी मिळणार आहे.शेतीपंपाचे १ लाख २ हजार ३२१ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची २६२ कोटी ९४ लाख ८० हजार रुपयांची थकबाकी आहे.