शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

अवघ्या चार पोलिसांवर ३९ न्यायालयांची सुरक्षा

By admin | Updated: July 27, 2014 01:18 IST

बापू सोळुंके, औरंगाबाद २४ तास अलर्ट असलेल्या औरंगाबाद पोलिसांनी जिल्हा न्यायालयाची सुरक्षा ‘रामभरोसे’ सोडली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बापू सोळुंके, औरंगाबाद २४ तास अलर्ट असलेल्या औरंगाबाद पोलिसांनी जिल्हा न्यायालयाची सुरक्षा ‘रामभरोसे’ सोडली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ३९ न्यायालयांसाठी अवघ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संवेदनशील औरंगाबादचा सतत सिमीच्या अतिरेक्यांशी संबंध आला आहे. त्यामुळे अ‍ॅन्टी टेरेरिस्ट स्क्वॉड (एटीएस) स्थापन करण्यात आला आहे. पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून शहरातील महत्त्वाच्या इमारतीची तपासणी करण्यात येते. त्यात जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचाही समावेश आहे. इमारतीत १० सत्र न्यायालये आणि तालुका न्यायालयेही तेवढीच आहेत. शिवाय मराठवाड्यातील मोक्काचे विशेष न्यायालय याच इमारतीत सुरू आहे. सर्व प्रकारचे गुन्हेगारी खटले या न्यायालयांमध्ये चालविण्यात येतात. त्यामुळे फिर्यादी आणि गुन्हेगार न्यायालयाच्या तारखेला थेट आमने-सामने येतात. काही प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांचे समर्थक मोठ्या संख्येने न्यायालयात येतात. प्रसंगी न्यायालयाच्या आवारातच फ्री स्टाईल सामना रंगतो. अशा कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तेथे मोठी कुमक असणे गरजेचे असते. मात्र, याकडे आजपर्यंत पोलीस विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. न्यायालयाच्या इमारतीची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याची प्रतिक्रिया एका वरिष्ठ पोलिसांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. ओळखपत्र दाखविल्याशिवाय कोणालाही उच्च न्यायालयात प्रवेश दिला जात नाही. शिवाय त्यांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात येते. बॅगही स्कॅनरखालून गेल्याशिवाय आत नेता येत नाही. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये ३९ न्यायालयांचे नियमित कामकाज चालते. यात १ प्रधान जिल्हा व सत्र न्यायालय, ३ जिल्हा व सत्र न्यायालये, २ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालये, १ मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय. तसेच ९ दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालये, ३२ प्रथम वर्ग न्यायालयांचे कामकाजही याच इमारतीत चालते. तसेच जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे कामकाजही तेथे नियमितपणे सुरू असते.सीसीटीव्ही का नाही?सर्वच शासकीय कार्यालयांत सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार उच्च न्यायालयातही उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर जिल्हा न्यायालयाची इमारत, प्रवेशद्वार आणि परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली येणे आवश्यक आहे. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीची सुरक्षा करण्यासाठी दोन कर्मचारी आहेत. त्यापैकी एक जण सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत, तर दुसरा रात्री ८ ते सकाळी ८ असतो. न्यायालयाच्या आवारात असलेल्या पोलीस चौकीत दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तेथे केवळ दोन खुर्च्या, एक टेबल आणि तुटलेला स्टूल असतो.