शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

आत्मा जागृतीसाठी साधना करावी

By admin | Updated: June 10, 2016 00:04 IST

औरंगाबाद : भगवंतासमोर बसून त्याची आराधना करणे, पूजा करणे याचा अर्थ प्रत्येकाने समजून घ्यायला हवा.

औरंगाबाद : भगवंतासमोर बसून त्याची आराधना करणे, पूजा करणे याचा अर्थ प्रत्येकाने समजून घ्यायला हवा. भगवंतांनी दाखविलेला मार्ग अनुसरण्याकरिता, आपला आत्मा जागृत करण्यासाठीच ती साधना असते. समग्र ज्ञान प्राप्तीसाठीच ती उपासना असते. आत्मा हा सर्वशक्तिमान आहे आणि त्याच माध्यमातून आपण स्वर्ग, मोक्षाची प्राप्ती करवून घेऊ शकतो, असे प्रतिपादन आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज यांनी येथे केले. आनंदजी कल्याणजी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट तसेच भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती आणि सकल जैन समाजाच्या वतीने आयोजित अभय महामहोत्सवात आचार्यश्री भाविकांना मार्गदर्शन करीत होते. प्रवचनानंतर जोहरीवाडा येथील गोडीजी जैन मंदिर येथे गोडीजी पार्श्वनाथ भगवंतांच्या मूर्तीवर शांतीधारा अभिषेक करण्यात आला. सलग अडीच तास विविध औषधीयुक्त जलाचा अभिषेक करण्यात आला. शुक्रवारी १० रोजी आचार्य भगवंतांच्या आचार्यपदाच्या ३२ व्या प्रवेशानिमित्त आणि पंन्यास मोक्षरत्नजी यांच्या पंन्यासपदानिमित्त सकल जैन महिला मंडळातर्फे कुंभारवाडा येथे दुपारी २ वाजता मंगल गीत, भक्तिनाटिका, नृत्यनाटिका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरू राम जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवारी सकल जैन समाजाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे व खताचे वाटप करण्यात येणार आहे. पानदरिबा येथील अग्रसेन भवन येथे सकाळी ९ वाजता आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी यांच्या हस्ते शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बियाणे आणि खताचे वाटप करण्यात येणार आहे.यावेळी आचार्यश्रींचे ‘महावीर के पथ पर -मानवता के प्रकाश मे’ या विषयावर प्रवचन होणार आहे. त्यानंतर दुष्काळ निवारण तसेच भरपूर पर्जन्यवृष्टीकरिता जप अनुष्ठान करण्यात येणार आहे.