शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

‘सबका साथ, सबका विकास’ म्हणजे देखावा-मुणगेकर

By admin | Updated: June 24, 2017 23:33 IST

हिंगोली :सध्याचे सरकार सबका विकासच्या घोषणा देत आहे. हा केवळ देखावा असल्याचे प्रतिपादन भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतीय राज्यघटनेची अदृश्यपणे मोडतोड सुरू आहे. सध्याचे सरकार सबका साथ, सबका विकासच्या घोषणा देत आहे. मात्र हा केवळ देखावा असून प्रत्यक्षात मात्र मागासवर्गीयांना विकासापासून दूर ठेवल्या जात असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. हिंगोली येथे रामलीला मैदानावरील महावीर भवनात समता अभियान परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कल्याणी एज्युकेशन सोशल वेल्फेअर सोसायटी नांदेडच्या संयुक्त विद्यमाने सदर परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी डॉ. भालचंद्र मुणगेकर तर उद्घाटक प्रा. कैलास राठोड होते. स्वागताध्यक्ष अ‍ॅड. रावण धाबे तर प्रमुख पाहुणे माजी आ. भीमराव केराम, प्रा. सुधीर अनवले, फारुख अहेमद, प्रदीप राठोड, एस. जी. माचनवार आदी उपस्थित होते. यावेळी काहींना समता पुरस्काराने गौरविले. तर दहावी, बारावीतील गुणवंतांचा सत्कारही केला. मुगणेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत ‘समता’ अद्याप प्रस्थापित झाली नाही. ती आपण करूही शकलो नाही. सरकारने मागासवर्गीय दहा लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. तर दुसरीकडे भीमअ‍ॅप काढून गवगवा केला जात आहे. याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. सध्याचे सरकार शंभर टक्के मुस्लिमविरोधी आहे. शिवाय नक्षलवाद का वाढत चालला आहे, याचेही सरकारला काही देणेघेणे राहिले नसल्याचे त्यांनी सांगितले.