शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

‘सबका साथ, सबका विकास’ म्हणजे देखावा-मुणगेकर

By admin | Updated: June 24, 2017 23:33 IST

हिंगोली :सध्याचे सरकार सबका विकासच्या घोषणा देत आहे. हा केवळ देखावा असल्याचे प्रतिपादन भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतीय राज्यघटनेची अदृश्यपणे मोडतोड सुरू आहे. सध्याचे सरकार सबका साथ, सबका विकासच्या घोषणा देत आहे. मात्र हा केवळ देखावा असून प्रत्यक्षात मात्र मागासवर्गीयांना विकासापासून दूर ठेवल्या जात असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. हिंगोली येथे रामलीला मैदानावरील महावीर भवनात समता अभियान परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कल्याणी एज्युकेशन सोशल वेल्फेअर सोसायटी नांदेडच्या संयुक्त विद्यमाने सदर परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी डॉ. भालचंद्र मुणगेकर तर उद्घाटक प्रा. कैलास राठोड होते. स्वागताध्यक्ष अ‍ॅड. रावण धाबे तर प्रमुख पाहुणे माजी आ. भीमराव केराम, प्रा. सुधीर अनवले, फारुख अहेमद, प्रदीप राठोड, एस. जी. माचनवार आदी उपस्थित होते. यावेळी काहींना समता पुरस्काराने गौरविले. तर दहावी, बारावीतील गुणवंतांचा सत्कारही केला. मुगणेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत ‘समता’ अद्याप प्रस्थापित झाली नाही. ती आपण करूही शकलो नाही. सरकारने मागासवर्गीय दहा लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. तर दुसरीकडे भीमअ‍ॅप काढून गवगवा केला जात आहे. याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. सध्याचे सरकार शंभर टक्के मुस्लिमविरोधी आहे. शिवाय नक्षलवाद का वाढत चालला आहे, याचेही सरकारला काही देणेघेणे राहिले नसल्याचे त्यांनी सांगितले.