शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:04 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पुणे येथे ७ एप्रिलला काढलेल्या सोडतीत जिल्ह्यातील ६०३ शाळांमधील ३ ...

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पुणे येथे ७ एप्रिलला काढलेल्या सोडतीत जिल्ह्यातील ६०३ शाळांमधील ३ हजार ६२५ विद्यार्थ्यांना आरटीईतून प्रवेशाची संधी देण्यात आली. शाळांनी त्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिल्याने प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

आरटीई लाॅटरीत प्रवेश निश्चिती झालेल्या मुलांच्या पालकांना १५ एप्रिलपासून संदेश जाण्यास सुरुवात झाली होती. परंतु, लॉकडाऊन वाढविल्याने प्रवेशाची पुढील प्रक्रिया स्थगित होती. ती सुरू करून शाळा स्तरावर कागदपत्र पडताळणीची मागणी आरटीई पालक संघाच्या वतीने प्रशांत साठे यांनी केली होती. त्या मागणीला यश आले असून, प्रवेश प्रक्रिया आज, शुक्रवारपासून शाळास्तरावर सुरू करा, पालकांना शाळांनी पोर्टलवर वेळ द्यावी व पोर्टलवरच प्रवेश निश्चिती करावी, प्रवेशासाठी २० दिवसांचा कालावधी द्या, निवड यादीमधील पालकांनी वेळेत प्रवेश न घेतल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. अर्जात चुकीची माहिती भरलेली आढळल्यास तात्पुरता प्रवेश देऊ नये. ज्या पालकांना शाळेत येणे शक्य नाही. त्यांनी शाळेला दूरध्वनी, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी. १०० टक्के प्रवेश होतील, याची खबरदारी शाळांनी घ्यावी. संपर्काअभावी प्रवेश झाला नाही, अशी तक्रार प्राप्त झाल्यास ती शाळेची सर्वस्वी जबाबदारी असेल. प्रवेशासंदर्भात अडचणी असतील त्यांनी तक्रार निवारण समितीकडे संपर्क साधावा. तसेच२०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर व्यापक प्रसिद्धी देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी शाळांना दिले आहेत.