शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

रेशीम मार्केटसाठी पाच कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर

By admin | Updated: November 4, 2016 00:21 IST

जालना : रेशीम मार्केटसाठी सहकार व वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

जालना : जिल्ह्यास मराठवाड्यात उत्पादित होणाऱ्या रेशीम कोषाला स्थानिक खुली बाजारपेठ मिळावी म्हणून चार आॅक्टोबर रोजी औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. या मार्केटसाठी सहकार व वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या मार्केटसाठी निधी मंजूर झाल्याने कामाचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. जालना शहरानजिक असलेल्या शिरसवाडी शिवारात दोन हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यात असलेल्या बाजारपेठेच्या धरतीवरच ही बाजारपेठ असणार आहे. तुती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्या काही सुविधा पाहिजे त्या या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे. येथे तांत्रिक तसेच कुशल मनुष्यबळ येथे असणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष विक्रीसाठी जालना हे मध्यवर्ती ठिकाण आहे. शेतकऱ्यांना व रिलिंग उद्योजकांना कोष खरेदी विक्रीसाठी सोयीस्कर आहे. येथील एकाच मार्केटमध्ये कोष व सूत खरेदी विक्री करण्याची सुविधा असणार आहे. मार्केट निर्मितीमुळे रेशीम लागवड क्षेत्रातही वाढ होण्याचा अंदाज रेशीम अधिकारी व्यक्त करतात. शेतकऱ्यांनीही या पिकाला प्राधान्य दिल्याने तुती (रेशीम) क्षेत्र वाढले आहे. याचा विचार करता शासनाने शेतकऱ्यांना कर्नाटकऐवजी स्थानिक बाजारपेठ व तांत्रिक माहिती उपलब्ध होण्याकरिता जालना येथे रेशीम कोष खुल्या बाजारपेठेला औरंगाबाद येथील बैठकीत मान्यता दिली. या बाजारपेठेचा जालना सोबतच तब्बल दहा हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ३ हजार ९०० एकर तुतीचे क्षेत्र आहे. यात ३ हजार ४०० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. बाजारपेठेत अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, प्रयोगशाळा, कोष सुरेक्षसाठी विशेष व्यवस्था तसेच कोष सुकविण्याची तांत्रिक व्यवस्था असणार आहे. रेशीम कोषच्या प्रतवारीनुसार शेतकऱ्यांना भाव मिळेल. बाजारपेठेत आॅनलाईन मार्केटिंगची सुविधा असल्याने शेतकऱ्यांना कर्नाटकात काय भाव सुरू आहे, याची अद्ययावत माहिती मिळेल. शीम कोष विक्री बाजारपेठेसोबतच धागा निर्मितीलाही चालना मिळणार आहे. बिगर रेशीम शेतकरी अथवा अन्य धागा निर्मितीलाही चालना मिळणार आहे.