शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कोवळ्या जीवांवर उठलीयं नियती!

By admin | Updated: January 13, 2015 00:15 IST

संजय तिपाले , बीड जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू चुकलेला नाही; परंतु जन्मानंतर अवघ्या एक वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडणाऱ्या अर्भकांची संख्या दिवसेंदिवस अतिशय झपाट्याने वाढू लागली आहे.

संजय तिपाले , बीडजन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू चुकलेला नाही; परंतु जन्मानंतर अवघ्या एक वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडणाऱ्या अर्भकांची संख्या दिवसेंदिवस अतिशय झपाट्याने वाढू लागली आहे. अर्भक मृत्यूत बीड जिल्हा राज्यातील पहिल्या पाचमध्ये आहे. स्त्री- भू्रणहत्येपाठोपाठ आता अर्भकमृत्यूचे संकट ‘आ’ वासून उभे आहे. ‘रेडझोन’मधून जिल्हा बाहेर काढण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे कायम आहे.नवा पाहुणा घरात आल्यावर जन्मादात्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही. महिलांसाठी मातृत्वाचे क्षण तर अविस्मरणीय अन् सुखद! मात्र, काहींच्या बाबतीत हा आनंद क्षणभंगूर ठरला आहे. एक वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांंची नोंद सरकारदरबारी अर्भकमृत्यू म्हणून होते.भू्रण हत्या, बालमृत्यू, मातामृत्यू यामुळे जिल्ह्यावर केंद्र सरकारने ‘फोकस’ केलेले आहे. मुलींच्या जन्मदरात ८०१ वरुन ८५३ अशी सुधारणा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तथापि, अर्भकमृत्यूला अटकाव घालणे प्रशासनाला शक्य झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. २०१० ते २०१४ या चार वर्षांत सुमारे २ हजार ९९० इतकी बालके एक वर्षाच्या आतच मृत्यूमुखी पडली. त्यामुळे आरोग्य विभागासाठी हा चिंतेचा विषय ठरत आहे. २०१३-१४ मध्ये जिल्ह्याचा अर्भकमृत्यूदर २५ टक्के इतका आहे. पाटोदा तालुक्याचा दर सर्वाधिक ६७.४ टक्के इतका असून माजलगावचा दर सर्वात कमी म्हणजे ११.५८ टक्के इतका आहे.जिल्ह्यातील अर्भकमृत्यूचे प्रमाण आरोग्य विभागाने जीवंत बालकांच्या संख्येवरुन निश्चित केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ५० गावांना समोर ठेवून आरोग्य विभागानेच २०१३- १४ मध्ये अर्भक मृत्यूमागची कारणमिंमासा शोधण्यासाठी सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अर्भकमृत्यूदर ३५ टक्के इतका असल्याचा निष्कर्ष पुढे आला होता. राज्याचा अर्भकमृत्यूदर २५ टक्के आहे. बीडमधील अर्भकमृत्यूदराचे दोन स्वतंत्र आकडे चिंताजनकच आहेत.अल्पवयीन मुलींच्या विवाहाचा टक्का ३४.६५ इतका आहे.४नवजात बालकांमधील जंतूसंसर्र्ग४जन्मजात व्यंग४कमी वयाचे बाळ जन्माला येणे४जिल्ह्यातील वाढत्या अर्भकमृत्यूमागे येथील भौगोलिक स्थिती, महिलांना गरोदरपणात करावी लागणारी कष्टाची कामे या कारणांचाही समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.गरोदरपणात महिलांनी कष्टाची कामे टाळावीत़४सकस आहार व आराम घ्यावा़४वेळोवेळी डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करावी़४प्रसूतीवेळी तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून उपचार घ्यावेत.४नवजात बालकांच्या उपचाराबाबत तत्परता४जन्मानंतर बालकांना तात्काळ अंगावरील दूध पाजावे.४डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी़