शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कोवळ्या जीवांवर उठलीयं नियती!

By admin | Updated: January 13, 2015 00:15 IST

संजय तिपाले , बीड जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू चुकलेला नाही; परंतु जन्मानंतर अवघ्या एक वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडणाऱ्या अर्भकांची संख्या दिवसेंदिवस अतिशय झपाट्याने वाढू लागली आहे.

संजय तिपाले , बीडजन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू चुकलेला नाही; परंतु जन्मानंतर अवघ्या एक वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडणाऱ्या अर्भकांची संख्या दिवसेंदिवस अतिशय झपाट्याने वाढू लागली आहे. अर्भक मृत्यूत बीड जिल्हा राज्यातील पहिल्या पाचमध्ये आहे. स्त्री- भू्रणहत्येपाठोपाठ आता अर्भकमृत्यूचे संकट ‘आ’ वासून उभे आहे. ‘रेडझोन’मधून जिल्हा बाहेर काढण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे कायम आहे.नवा पाहुणा घरात आल्यावर जन्मादात्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही. महिलांसाठी मातृत्वाचे क्षण तर अविस्मरणीय अन् सुखद! मात्र, काहींच्या बाबतीत हा आनंद क्षणभंगूर ठरला आहे. एक वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांंची नोंद सरकारदरबारी अर्भकमृत्यू म्हणून होते.भू्रण हत्या, बालमृत्यू, मातामृत्यू यामुळे जिल्ह्यावर केंद्र सरकारने ‘फोकस’ केलेले आहे. मुलींच्या जन्मदरात ८०१ वरुन ८५३ अशी सुधारणा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तथापि, अर्भकमृत्यूला अटकाव घालणे प्रशासनाला शक्य झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. २०१० ते २०१४ या चार वर्षांत सुमारे २ हजार ९९० इतकी बालके एक वर्षाच्या आतच मृत्यूमुखी पडली. त्यामुळे आरोग्य विभागासाठी हा चिंतेचा विषय ठरत आहे. २०१३-१४ मध्ये जिल्ह्याचा अर्भकमृत्यूदर २५ टक्के इतका आहे. पाटोदा तालुक्याचा दर सर्वाधिक ६७.४ टक्के इतका असून माजलगावचा दर सर्वात कमी म्हणजे ११.५८ टक्के इतका आहे.जिल्ह्यातील अर्भकमृत्यूचे प्रमाण आरोग्य विभागाने जीवंत बालकांच्या संख्येवरुन निश्चित केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ५० गावांना समोर ठेवून आरोग्य विभागानेच २०१३- १४ मध्ये अर्भक मृत्यूमागची कारणमिंमासा शोधण्यासाठी सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अर्भकमृत्यूदर ३५ टक्के इतका असल्याचा निष्कर्ष पुढे आला होता. राज्याचा अर्भकमृत्यूदर २५ टक्के आहे. बीडमधील अर्भकमृत्यूदराचे दोन स्वतंत्र आकडे चिंताजनकच आहेत.अल्पवयीन मुलींच्या विवाहाचा टक्का ३४.६५ इतका आहे.४नवजात बालकांमधील जंतूसंसर्र्ग४जन्मजात व्यंग४कमी वयाचे बाळ जन्माला येणे४जिल्ह्यातील वाढत्या अर्भकमृत्यूमागे येथील भौगोलिक स्थिती, महिलांना गरोदरपणात करावी लागणारी कष्टाची कामे या कारणांचाही समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.गरोदरपणात महिलांनी कष्टाची कामे टाळावीत़४सकस आहार व आराम घ्यावा़४वेळोवेळी डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करावी़४प्रसूतीवेळी तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून उपचार घ्यावेत.४नवजात बालकांच्या उपचाराबाबत तत्परता४जन्मानंतर बालकांना तात्काळ अंगावरील दूध पाजावे.४डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी़