शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

कोवळ्या जीवांवर उठलीयं नियती!

By admin | Updated: January 13, 2015 00:15 IST

संजय तिपाले , बीड जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू चुकलेला नाही; परंतु जन्मानंतर अवघ्या एक वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडणाऱ्या अर्भकांची संख्या दिवसेंदिवस अतिशय झपाट्याने वाढू लागली आहे.

संजय तिपाले , बीडजन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू चुकलेला नाही; परंतु जन्मानंतर अवघ्या एक वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडणाऱ्या अर्भकांची संख्या दिवसेंदिवस अतिशय झपाट्याने वाढू लागली आहे. अर्भक मृत्यूत बीड जिल्हा राज्यातील पहिल्या पाचमध्ये आहे. स्त्री- भू्रणहत्येपाठोपाठ आता अर्भकमृत्यूचे संकट ‘आ’ वासून उभे आहे. ‘रेडझोन’मधून जिल्हा बाहेर काढण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे कायम आहे.नवा पाहुणा घरात आल्यावर जन्मादात्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही. महिलांसाठी मातृत्वाचे क्षण तर अविस्मरणीय अन् सुखद! मात्र, काहींच्या बाबतीत हा आनंद क्षणभंगूर ठरला आहे. एक वर्षाच्या आत मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांंची नोंद सरकारदरबारी अर्भकमृत्यू म्हणून होते.भू्रण हत्या, बालमृत्यू, मातामृत्यू यामुळे जिल्ह्यावर केंद्र सरकारने ‘फोकस’ केलेले आहे. मुलींच्या जन्मदरात ८०१ वरुन ८५३ अशी सुधारणा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तथापि, अर्भकमृत्यूला अटकाव घालणे प्रशासनाला शक्य झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. २०१० ते २०१४ या चार वर्षांत सुमारे २ हजार ९९० इतकी बालके एक वर्षाच्या आतच मृत्यूमुखी पडली. त्यामुळे आरोग्य विभागासाठी हा चिंतेचा विषय ठरत आहे. २०१३-१४ मध्ये जिल्ह्याचा अर्भकमृत्यूदर २५ टक्के इतका आहे. पाटोदा तालुक्याचा दर सर्वाधिक ६७.४ टक्के इतका असून माजलगावचा दर सर्वात कमी म्हणजे ११.५८ टक्के इतका आहे.जिल्ह्यातील अर्भकमृत्यूचे प्रमाण आरोग्य विभागाने जीवंत बालकांच्या संख्येवरुन निश्चित केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ५० गावांना समोर ठेवून आरोग्य विभागानेच २०१३- १४ मध्ये अर्भक मृत्यूमागची कारणमिंमासा शोधण्यासाठी सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अर्भकमृत्यूदर ३५ टक्के इतका असल्याचा निष्कर्ष पुढे आला होता. राज्याचा अर्भकमृत्यूदर २५ टक्के आहे. बीडमधील अर्भकमृत्यूदराचे दोन स्वतंत्र आकडे चिंताजनकच आहेत.अल्पवयीन मुलींच्या विवाहाचा टक्का ३४.६५ इतका आहे.४नवजात बालकांमधील जंतूसंसर्र्ग४जन्मजात व्यंग४कमी वयाचे बाळ जन्माला येणे४जिल्ह्यातील वाढत्या अर्भकमृत्यूमागे येथील भौगोलिक स्थिती, महिलांना गरोदरपणात करावी लागणारी कष्टाची कामे या कारणांचाही समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.गरोदरपणात महिलांनी कष्टाची कामे टाळावीत़४सकस आहार व आराम घ्यावा़४वेळोवेळी डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करावी़४प्रसूतीवेळी तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून उपचार घ्यावेत.४नवजात बालकांच्या उपचाराबाबत तत्परता४जन्मानंतर बालकांना तात्काळ अंगावरील दूध पाजावे.४डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी़