शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने जगणं झालं महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:05 IST

जयेश निरपळ गंगापूर : मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा आलेख चढता असून, मार्च महिन्यात खाद्य तेलाच्या व गॅसच्या ...

जयेश निरपळ

गंगापूर : मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा आलेख चढता असून, मार्च महिन्यात खाद्य तेलाच्या व गॅसच्या भावात विक्रमी वाढ झाल्याने सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. महागाईच्या मानाने उत्पन्नात कवडीचीही वाढ झालेली नसून दरवाढीच्या झळा सहन करत घरखर्चाचे नियोजन करणे अवघड झाले आहे.

ऑक्टोबर २०२०पासून कडधान्य व डाळींचे दर कडाडले असून, खाद्य तेलाच्या किमतीमध्ये दिवाळीपासून सुरू झालेल्या दरवाढीने मार्च २०२१ मध्ये उच्चांक गाठला आहे. यामुळे गरिबांचेच नव्हे तर, सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. शेंगदाणा तेलाची मागणी कमी असल्याने फेब्रुवारीपासून दर स्थिर असले, तरी गत सहा महिन्यांत सूर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा तेलाच्या किमतीत अनुक्रमे २४, १९ व २२ टक्के वाढ झाली असून, आधी एकाच वेळी पाच लीटर तेलाची खरेदी करणारे ग्राहक आता पाहिजे तेव्हाच तेलाची खरेदी करतांना दिसत आहेत.

तेलाप्रमाणेच मूग, मसूर व उडीद डाळीच्या किमतीतदेखील या कालावधीत आठ ते बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे. चणा व तूरडाळ स्वस्त धान्य दुकानात मिळत असल्याने त्यांचे दर स्थिर आहेत. गॅसचे भाव तब्बल २७ टक्क्यांनी वाढले असून, ऑक्टोबरमध्ये ६०३ रुपयाला मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर या महिन्यात ८२८ रुपयांवर पोहोचला आहे. तसेच केंद्र सरकारने चोरमार्गाने गॅसचे मिळणारे अनुदान हळूहळू बंद करुन संपविल्याने गरीब जीवन जगणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. गॅसच्या भडक्याने तर ग्रामीण भागात बंद झालेल्या चुली पुन्हा सुरु झाल्या असून, महिला पुन्हा धुरात डोळे फोडीत स्वयंपाक करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

चौकट

रोजंदारी, उत्पन्नात घट, महागाईत मात्र वाढ

वाढलेल्या महागाईचा फटका श्रीमंत नागरिकांना जाणवत नसला तरी, याचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर तसेच शहरांमध्ये रोजंदारीवर पोट भरणाऱ्या नागरिकांना बसला आहे. मजुरांच्या मजुरीत वाढ झालेली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्नही घटले आहे. शेतमालाला भाव नाही. यामुळे वाढलेली महागाई ही गरिबांसह सर्वसामान्यांच्या मुळावरच उठली आहे. त्यांना मर्यादित उत्पन्न व वाढत्या खर्चाचे नियोजन करतांना कसरत करावी लागत आहे.

चौकट

भाजीवरील तर्री झाली गायब

गोडेतेलाचे भाव गगनाला भिडल्याने गरिबांच्या भाजीत तेल असून, नसल्यासारखे आहे. तर सर्वसामान्यांच्या भाजीतील तर्री गायब झाल्याचे दिसत आहे. डाळींचेही भाव वाढल्याने शिजविलेल्या डाळींमध्ये पाण्याचे प्रमाण वाढले आहे.

फोटो : चार्ट आहे.