शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘रिंंगरोड’चा प्रस्ताव गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:04 IST

विकास राऊत औरंगाबाद : भूसंपादनाच्या अडचणी, निधी आणि समृद्धी महामार्ग, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या कनेक्टिव्हिटीमुळे तीसगाव ते ...

विकास राऊत

औरंगाबाद : भूसंपादनाच्या अडचणी, निधी आणि समृद्धी महामार्ग, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या कनेक्टिव्हिटीमुळे तीसगाव ते मिटामिटामार्गे पडेगाव, भावसिंगपुऱ्याकडून जाणाऱ्या प्रस्तावित असलेल्या अंदाजे २२५ कोटी रुपयांच्या रिंगरोडचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला आहे. १२ वर्षांपासून या रिंगरोडची सुरू असलेली चर्चा आता थांबली आहे. जटवाडा ते हर्सूल सावंगीकडून केम्ब्रिज चौकापर्यंत हा रस्ता पुढे नेण्याबाबत नियोजन होते.

आता फक्त १६ कोटी ५० लाख रुपयांतून तीसगाव ते मिटामिट्यापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू राहणार आहे. त्या रस्त्यालाही सध्या घरघर लागली असून, तो रस्ता आता एनएच क्र.२११ ते समृद्धी महामार्गाला जोडणारा ‘लिंकरोड’ म्हणून बदलण्यात आला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी त्या रस्त्यासाठी जमिनी दिल्या, त्यांनाही अद्याप पूर्ण मावेजा मिळालेला नाही. औद्योगिक वसाहतीतील जड वाहतूक शहराबाहेरून जावी यासाठी हा रस्ता बांधायचा होता. दरम्यान, शेतकऱ्यांनी रविवारी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोडी येथे भेटून भूसंपादनाचा मोबदला मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे शेतकरी दशरथ मुळे यांनी सांगितले. निवेदनावर २५ हून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

का गेला प्रस्ताव बासनात

जागतिक बँक प्रकल्पाने यासाठी २१ किमीचे सर्वेक्षण करून भूसंपादन, अलायन्मेंट, रोडमॅप, खर्च या बाबींचा डीपीआर तयार केला. २००९ ते २०१५ पर्यंत या रस्त्याच्या प्रस्तावाचा प्रवास संथगतीने सुरू होता. नंतर मुहूर्त लागला; परंतु भूसंपादनातील खर्च, तीन गावांतील मालमत्ता, डोंगर पायथ्याकडून पर्यावरण, वन विभागाची मिळत नसलेली परवानगी यामुळे प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवण्यात आला.

समृद्धी आणि एनएच २११ मुळे घरघर

समृद्धी महामार्ग मिटमिट्यापासून पाच किमी अंतरावर आहे, तर इकडे तीसगावपासून एनएच २११ हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे तीसगाव ते मिटमिटा हा रस्ताच आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पांतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे. १६ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च या रस्त्यावर प्रस्तावित आहे.

भूसंपादनाचाही खोडा

बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प सूत्रांनी सांगितले की, या रस्त्याच्या कामासाठी केलेले अलायन्मेंट रद्द झाले आहे. यासाठी केलेला सर्वेक्षण अहवालदेखील गुंडाळून ठेवण्यात आला आहे. समृद्धी आणि एनएच २११ मुळे सदरील रस्त्याचे काम आता होणार नाही. तीन गावांतील मालमत्ता आणि जमिनीचे भूसंपादन खर्चिक असल्यामुळे प्रस्ताव बाजूला ठेवला आहे.