शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

‘रिंंगरोड’चा प्रस्ताव गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:04 IST

विकास राऊत औरंगाबाद : भूसंपादनाच्या अडचणी, निधी आणि समृद्धी महामार्ग, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या कनेक्टिव्हिटीमुळे तीसगाव ते ...

विकास राऊत

औरंगाबाद : भूसंपादनाच्या अडचणी, निधी आणि समृद्धी महामार्ग, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या कनेक्टिव्हिटीमुळे तीसगाव ते मिटामिटामार्गे पडेगाव, भावसिंगपुऱ्याकडून जाणाऱ्या प्रस्तावित असलेल्या अंदाजे २२५ कोटी रुपयांच्या रिंगरोडचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला आहे. १२ वर्षांपासून या रिंगरोडची सुरू असलेली चर्चा आता थांबली आहे. जटवाडा ते हर्सूल सावंगीकडून केम्ब्रिज चौकापर्यंत हा रस्ता पुढे नेण्याबाबत नियोजन होते.

आता फक्त १६ कोटी ५० लाख रुपयांतून तीसगाव ते मिटामिट्यापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू राहणार आहे. त्या रस्त्यालाही सध्या घरघर लागली असून, तो रस्ता आता एनएच क्र.२११ ते समृद्धी महामार्गाला जोडणारा ‘लिंकरोड’ म्हणून बदलण्यात आला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी त्या रस्त्यासाठी जमिनी दिल्या, त्यांनाही अद्याप पूर्ण मावेजा मिळालेला नाही. औद्योगिक वसाहतीतील जड वाहतूक शहराबाहेरून जावी यासाठी हा रस्ता बांधायचा होता. दरम्यान, शेतकऱ्यांनी रविवारी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोडी येथे भेटून भूसंपादनाचा मोबदला मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे शेतकरी दशरथ मुळे यांनी सांगितले. निवेदनावर २५ हून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

का गेला प्रस्ताव बासनात

जागतिक बँक प्रकल्पाने यासाठी २१ किमीचे सर्वेक्षण करून भूसंपादन, अलायन्मेंट, रोडमॅप, खर्च या बाबींचा डीपीआर तयार केला. २००९ ते २०१५ पर्यंत या रस्त्याच्या प्रस्तावाचा प्रवास संथगतीने सुरू होता. नंतर मुहूर्त लागला; परंतु भूसंपादनातील खर्च, तीन गावांतील मालमत्ता, डोंगर पायथ्याकडून पर्यावरण, वन विभागाची मिळत नसलेली परवानगी यामुळे प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवण्यात आला.

समृद्धी आणि एनएच २११ मुळे घरघर

समृद्धी महामार्ग मिटमिट्यापासून पाच किमी अंतरावर आहे, तर इकडे तीसगावपासून एनएच २११ हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे तीसगाव ते मिटमिटा हा रस्ताच आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पांतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे. १६ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च या रस्त्यावर प्रस्तावित आहे.

भूसंपादनाचाही खोडा

बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प सूत्रांनी सांगितले की, या रस्त्याच्या कामासाठी केलेले अलायन्मेंट रद्द झाले आहे. यासाठी केलेला सर्वेक्षण अहवालदेखील गुंडाळून ठेवण्यात आला आहे. समृद्धी आणि एनएच २११ मुळे सदरील रस्त्याचे काम आता होणार नाही. तीन गावांतील मालमत्ता आणि जमिनीचे भूसंपादन खर्चिक असल्यामुळे प्रस्ताव बाजूला ठेवला आहे.