शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

आमदारांविना पालकमंत्र्यांचा आढावा

By admin | Updated: June 10, 2017 23:38 IST

हिंगोली : जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दौरा तर आयोजित केला मात्र या आढाव्यात दोन आमदारांना एन्ट्री न दिल्याने त्यांना जड मनाने माघारी परतावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दौरा तर आयोजित केला मात्र या आढाव्यात दोन आमदारांना एन्ट्री न दिल्याने त्यांना जड मनाने माघारी परतावे लागले. शेवटी त्यांनी आम्हाला निमंत्रणच नव्हते, असे सांगून वेळ मारून नेली.साधारणपणे पालकमंत्री असो वा इतर कोणीही मंत्री आला की, आमदार मंडळींनाही आढावा बैठकीत सहभागी करून घेतले जाते. आज हिंगोलीत दोन-दोन मंत्री होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या कार्यक्रमाची रुपरेषा मात्र वेगळी होती. रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांचा आढावा किंवा बैठक असे काहीच ठेवले नव्हते. पक्षीय पातळीवर मात्र त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. विश्रामगृहावरच त्यांनी हे कार्यक्रम आटोपले अन् निघून गेले. मात्र आमदारांना जिल्हा कचेरीतून बैठकीचे निमंत्रण गेले होते. पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी ११ वाजता आढावा बैठक ठेवली होती. तर ते स्वत:च नेहमीप्रमाणे उशिराने म्हणजे १ वाजता आले. आज दुसरा शनिवार असल्याने सुटीवर पाणी फेरून हजर झालेल्या अधिकाऱ्यांना थेट आढावा होईल, असे वाटले. मात्र त्यांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या कक्षातच अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. तेथून आढावा घेतला तर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सर्व विभागांचे अधिकारी तसेच सत्ताधारी आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ.गजानन घुगे आदी हजर असल्याचे त्यांना समजले. मग त्यांनी त्या सभागृहात न जाता जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच आरोग्य विभागाचा आढावा घेतला. नंतर खालच्या सभागृहात जाऊन एकेका विभागाचा आढावा घेण्यास प्रारंभ केला. यात महसूल, गृह, जि. प., कृषी या विभागांचाच आढावा साडेचार वाजेपर्यंत चालला. त्यानंतर इतरही विभागांच्या अधिकाऱ्यांना तसेच एकेकाने बोलावले. त्यात साडेसहा वाजून गेले होते. त्यामुळे सभागृहात बसलेल्या अधिकाऱ्यांत कुरबूर ऐकायला मिळत होती. काही तर भुकेने व्याकुळले होते.प्रत्येक दौऱ्यात पालकमंत्री कोट्यवधींच्या कामांची आश्वासने देतात, घोषणा होतात. अधिकाऱ्यांना कामे करण्याची तंबी देतात, प्रत्यक्षात होत काहीच नाही. विरोधकांच्या हाती आयते कोलीत तेवढे मिळते. त्यामुळे यावेळी त्यांनी बैठकच गोपनीयपणे घेत या सगळ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. तर लवकरच याचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.