शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

महसूल, पोलिसांचा वाळू तस्करीस आशीर्वाद

By admin | Updated: May 29, 2014 00:39 IST

रवी गात , अंबड तालुक्यात सर्वदूर अवैध वाळू उपसा व वाहतुकीने कहर केला आहे. महसूल, पोलिस व राजकीय आशीर्वादामुळे वाळू तस्कारांची दादागिरी वाढली आहे.

 रवी गात , अंबड तालुक्यात सर्वदूर अवैध वाळू उपसा व वाहतुकीने कहर केला आहे. महसूल, पोलिस व राजकीय आशीर्वादामुळे वाळू तस्कारांची दादागिरी वाढली आहे. नदी पात्रांची चाळणी झाली आहे. पर्यावरण विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. वाळू तस्कर प्रामुख्याने गोंदी, शहागड, वडीगोद्री, पाचोड, औरंगाबाद. शहागड, सुखापुरी फाटा, सोनक पिंपळगाव, वडीलासुरा, पाचोड, औरंगाबाद. शहागड, सुखापुरी फाटा, अंबड, मार्डी, किनगाव चौफुली, रोहिलागड, औरंगाबाद. शहागड, सुखापुरी फाटा, अंबड, मार्डी, किनगांव चौफुली, जामखेड, औरंगाबाद. शहागड, सुखापुरी फाटा, अंबड, पारनेर फाटा, औरंगाबाद, तीर्थपुरी, झिरपी फाटा, सुखापुरी फाटा, औरंगाबाद. शहागड, अंबड टाकळी, पैठण, औरंगाबाद इ. मार्गांनी आपली अवैध वाळू वाहतूक होते. महसूल व पोलिस प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकार्‍यांच्या संगनमताने ही वाळू तस्करी सुरु आहे. वाळू तस्करीमुळे केवळ तस्करच नव्हे तर महसूल व पोलिस प्रशासनातील अनेक अधिकारीही गब्बर झाले आहेत. राजकीय नेते, महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी, वाळू माफिया यांची एक साखळीच कार्यरत आहे. ही साखळी मोडून वाळू तस्करी थांबविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीमुळे गोदापात्राचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरणाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. याबरोबरच वाळू तस्करांची अवजड वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करत असल्याने तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. खड्डयांमुळे अनेक अपघातही घडले आहे. मागील आठवडयात शहागड-पैठण रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची धडक होऊन तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाने वाळू तस्करीच्या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहण्यास सुरुवात केलेली नाही. जिल्हाधिकारी ए.एस.रंगा नायक व पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी याप्रकरणी विशेष लक्ष देऊन वाळू तस्करांविरोधात विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी स्वत: वाळु तस्करीच्या विरोधात मोहीम राबविली तरच या वाळु तस्करांना आळा बसु शकतो, अन्यथा येणार्‍या काही वर्षात गोदापात्रात वाळु ऐवजी केवळ माती पाहण्याची वेळ आपल्यावर येईल एवढे मात्र निश्चित. (समाप्त) नदीपात्रातून सततच्या वाळू उपशाचा परिणाम पाणी पातळीवर होत आहे. परिसरातील विहिरी तसेच कूपनलिकांच्या पाणी पातळीची झपाट्याने घट होत आहे. वाळू उपशामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे अतोनात नुकसान होत आहे. या प्रकाराकडे पर्यावरण विभागाचेही दुर्लक्ष होत आहे.