शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

दुष्काळातही ८० कोटींचा महसूल

By admin | Updated: April 30, 2015 00:38 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून दुष्काळ मुक्कामी आहे. यामुळे बाजारपेठा ठप्प आहेत मात्र जिल्हा मुद्रांक कार्यालयाचे व्यवहार अखंडीतपणे सुरु असून

शिरीष शिंदे , बीडजिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून दुष्काळ मुक्कामी आहे. यामुळे बाजारपेठा ठप्प आहेत मात्र जिल्हा मुद्रांक कार्यालयाचे व्यवहार अखंडीतपणे सुरु असून २०१४-१५ वर्षासाठी ८० कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सदरील कार्यालयाने मार्च २०१५ पर्यंत ८५ कोटी रुपये महसूल वसूल केला आहे. २०१३-१४ मध्येही दुष्काळ होता. याही आर्थीक वर्षात ८१ टक्के उद्दीष्ट करत ७० कोटी रूपये महसूल मिळविला असल्याची माहिती जिल्हा मुद्रांक अधिकारी सुंदर जाधव यांनी बुधवारी दिली. जिल्हा मुद्रांक कार्यालयास दस्त, नोंदणी फी, मुद्रांक शुल्कामध्ये न्यायिक, न्यायकेतर यातून महसुल मिळतो. दर वर्षी रेडी रेकनर मध्ये दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ होत असल्यामुळे सर्व सामान्यांस फ्लॅट व घर खरेदी करणे अवघड बनले असे म्हटले जायचे बहुतांश प्रमाणात रिअल इस्टेट क्षेत्रात उलाढाल असल्यचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. जिल्हा मुद्रांक कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, बीड जिल्ह्यासाठी शासनाकडून २०१४-१५ वर्षासाठी ८० कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मार्च २०१५ च्या अखेरपर्यंत दस्तच्या माध्यमातून ४ कोटी ९२ लाख तर नोंदणी शुल्कच्या माध्यमातून १८ कोटी ६५ लाख ४ हजार ३८४ रुपये प्राप्त झाले आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी मुद्रांक शुल्काच्या विक्रीतून २२ कोटी ९० लाख रूपये तर न्यायिकेतर कामासाठी विक्री झालेल्या मुद्रांक शुल्कातून ७ कोटी १४ लाख रूपये महसूल मिळाला आहे. २०१४-१५ चालू आर्थिक वर्षात नोंदणी फी मधून १६ कोटी ८९ लाख १७ हजार ९९९, न्यायालयीन कामकाजासाठी विक्री झालेल्या मुद्रांक शुल्क व न्याकितेर मुद्रांक शुल्क विक्रीतून ६८ कोटी ३२ लाख ५३ हजार रूपये असे एकूण ८५ कोटी २१ लाख ७१ हजार रूपये महसूल मिळाला आहे.दरम्यान, २०१३-१४ साठी राज्य शासनाकडून जिल्ह्यास ८७ कोटी महसूलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात नोंदणी फीमधून १५ कोटी २० लाख, मुद्रांक शुल्क न्यायिक व न्यायिकेतरमधून ५५ कोटी ७० लाख असे मिळून ७० कोटी ९० लाख रूपयांचा महसूल जमा झाला होता. त्यावेळी ८१.५० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले होते.अचानक शासनाने उद्दिष्टामध्ये वाढ केल्याने काही प्रमाणात वसुली कमी झाली होती. वस्तुत: उद्दिष्टामध्ये वाढ झाली नसती तर १०० टक्के पूर्तता झाल्यात जमा होती.राज्यात ५०० च्या पुढील म्हणजेच १ हजार , ५ हजार, १५ हजार, २० हजार, २५ हजार च्या बाँडची छपाई शासनाने बंद केली आहे. याचा फटका बाँड विक्रेत्यांना होत आहे. हा निर्णय शासनाने २६ मार्च रोजी घेतला आहे. या निर्णयामुळे मुद्रांक विक्रेत्यांचा आर्थिक स्त्रोत कमकुवत झाला आहे. हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी मुद्रांक विक्रेत्यांनी एकवेळा उपोषण केले होते. तसेच हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.