शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही ८० कोटींचा महसूल

By admin | Updated: April 30, 2015 00:38 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून दुष्काळ मुक्कामी आहे. यामुळे बाजारपेठा ठप्प आहेत मात्र जिल्हा मुद्रांक कार्यालयाचे व्यवहार अखंडीतपणे सुरु असून

शिरीष शिंदे , बीडजिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून दुष्काळ मुक्कामी आहे. यामुळे बाजारपेठा ठप्प आहेत मात्र जिल्हा मुद्रांक कार्यालयाचे व्यवहार अखंडीतपणे सुरु असून २०१४-१५ वर्षासाठी ८० कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सदरील कार्यालयाने मार्च २०१५ पर्यंत ८५ कोटी रुपये महसूल वसूल केला आहे. २०१३-१४ मध्येही दुष्काळ होता. याही आर्थीक वर्षात ८१ टक्के उद्दीष्ट करत ७० कोटी रूपये महसूल मिळविला असल्याची माहिती जिल्हा मुद्रांक अधिकारी सुंदर जाधव यांनी बुधवारी दिली. जिल्हा मुद्रांक कार्यालयास दस्त, नोंदणी फी, मुद्रांक शुल्कामध्ये न्यायिक, न्यायकेतर यातून महसुल मिळतो. दर वर्षी रेडी रेकनर मध्ये दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ होत असल्यामुळे सर्व सामान्यांस फ्लॅट व घर खरेदी करणे अवघड बनले असे म्हटले जायचे बहुतांश प्रमाणात रिअल इस्टेट क्षेत्रात उलाढाल असल्यचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. जिल्हा मुद्रांक कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, बीड जिल्ह्यासाठी शासनाकडून २०१४-१५ वर्षासाठी ८० कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मार्च २०१५ च्या अखेरपर्यंत दस्तच्या माध्यमातून ४ कोटी ९२ लाख तर नोंदणी शुल्कच्या माध्यमातून १८ कोटी ६५ लाख ४ हजार ३८४ रुपये प्राप्त झाले आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी मुद्रांक शुल्काच्या विक्रीतून २२ कोटी ९० लाख रूपये तर न्यायिकेतर कामासाठी विक्री झालेल्या मुद्रांक शुल्कातून ७ कोटी १४ लाख रूपये महसूल मिळाला आहे. २०१४-१५ चालू आर्थिक वर्षात नोंदणी फी मधून १६ कोटी ८९ लाख १७ हजार ९९९, न्यायालयीन कामकाजासाठी विक्री झालेल्या मुद्रांक शुल्क व न्याकितेर मुद्रांक शुल्क विक्रीतून ६८ कोटी ३२ लाख ५३ हजार रूपये असे एकूण ८५ कोटी २१ लाख ७१ हजार रूपये महसूल मिळाला आहे.दरम्यान, २०१३-१४ साठी राज्य शासनाकडून जिल्ह्यास ८७ कोटी महसूलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात नोंदणी फीमधून १५ कोटी २० लाख, मुद्रांक शुल्क न्यायिक व न्यायिकेतरमधून ५५ कोटी ७० लाख असे मिळून ७० कोटी ९० लाख रूपयांचा महसूल जमा झाला होता. त्यावेळी ८१.५० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले होते.अचानक शासनाने उद्दिष्टामध्ये वाढ केल्याने काही प्रमाणात वसुली कमी झाली होती. वस्तुत: उद्दिष्टामध्ये वाढ झाली नसती तर १०० टक्के पूर्तता झाल्यात जमा होती.राज्यात ५०० च्या पुढील म्हणजेच १ हजार , ५ हजार, १५ हजार, २० हजार, २५ हजार च्या बाँडची छपाई शासनाने बंद केली आहे. याचा फटका बाँड विक्रेत्यांना होत आहे. हा निर्णय शासनाने २६ मार्च रोजी घेतला आहे. या निर्णयामुळे मुद्रांक विक्रेत्यांचा आर्थिक स्त्रोत कमकुवत झाला आहे. हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी मुद्रांक विक्रेत्यांनी एकवेळा उपोषण केले होते. तसेच हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.