शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

महापालिका शाळांचा निकाल २७ टक्क्यांनी वाढला

By admin | Updated: June 18, 2014 01:35 IST

औरंगाबाद : महापालिका शाळांतील दहावीचा निकाल २७ टक्क्यांनी वाढला. गेल्या वर्षी ५३ टक्के निकाल लागला होता. यावर्षी ८०.१६ टक्के इतका निकाल लागला आहे.

औरंगाबाद : महापालिका शाळांतील दहावीचा निकाल २७ टक्क्यांनी वाढला. गेल्या वर्षी ५३ टक्के निकाल लागला होता. यावर्षी ८०.१६ टक्के इतका निकाल लागला आहे. ८०-८५ टक्क्यांपर्यंत गुण घेणाऱ्या ७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी ए. एम. शेख यांनी सांगितले.मिटमिटा शाळेचा निकाल १०० टक्के तर शहाबाजार उर्दू शाळेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. दोन शाळांचा निकाल ५० टक्क्यांहून खाली आला आहे. मनपा शाळेतून ३८३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले. त्यातील ३०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २२ विद्यार्थी ७५ टक्क्यांहून अधिक, २७ विद्यार्थी ७० टक्क्यांहून, तर ८८ विद्यार्थी ६० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. आयुक्तांनी केलेले प्रयत्न, तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे परिश्रम, विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासामुळे मनपा शाळांचा टक्का वाढला आहे. यांना मिळणार बक्षीस...मिलिंद रामेश्वर दाभाडे ८५ टक्के, शुभम् बाबासाहेब दाभाडे ८१ टक्के, खान आमेर अय्युब ८१ टक्के, शे.फरिना राजमंहमद शेख ८१ टक्के, शे.सुमानिया फेरोज ८०.८० टक्के यांच्यासह आणखी दोन विद्यार्थ्यांना ५० हजारांचे बक्षीस मिळणार आहे. तसेच १६ विद्यार्थ्यांना प्रत्येक ३५ हजारांचे बक्षीस मिळणार आहे. ५८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजारांचे बक्षीस २१ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते देण्यातयेईल. उद्या १८ जून रोजी आयुक्तांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार होईल, असे शिक्षणाधिकारी शेख यांनी सांगितले. शिक्षणमंत्र्यांकडून अभिनंदनपालिका शाळांचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढला आहे. शाळांचा निकाल चांगला लागल्याबद्दल शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांचे फोनवरून अभिनंदन केले. महापालिकेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणखी कशी मजबूत करता येईल, या दृष्टीने गांभीर्याने विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.