शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

विधानसभेवर होणार परिणाम!

By admin | Updated: May 18, 2014 00:50 IST

पंकज कुलकर्णी, जालना लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या अभुतपूर्व यशाचे साद-पडसाद होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही उमटतील, असे चित्र आहे.

पंकज कुलकर्णी, जालना लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या अभुतपूर्व यशाचे साद-पडसाद होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही उमटतील, असे चित्र आहे. या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. कल्याण काळे यांचा खा. दानवे यांच्या विरूद्धच्या तुल्यबळ लढतीत अवघ्या ८ हजार ४८२ एवढ्या अल्पमतांनी पराभव झाला होता. त्या निसटत्या पराभवाचा काँग्रेसजन या निवडणुकीतून बदला घेतील, असे अपेक्षित होते. दुर्दैवाने या निवडणुका काँग्रेसजनांनी या भागात फारशा गांभीर्याने घेतल्या नाहीत. मुळात उमेदवार ठरविण्यातच काँग्रेसजनांनी मोठा वेळ खर्ची केला. त्यानंतरच मोर्चेबांधणी सुरू झाली. नवख्या औताडे यांना जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात स्वत:च्या परिचयासह सदिच्छा भेटीतच वेळ गेला. सुदैवाने औताडे यांनी अल्पावधीतच ‘ग्रीप’ घेतली. प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध राळ उडवून धमाल उडविली. तुल्यबळ लढतीचे चित्र उभे केले. वरकरणी महायुतीपेक्षा आघाडीच सर्वार्थाने ‘स्ट्राँग’ असतानाच आघाडीचाच घात झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार सत्तेवर असतांना, जालना, भोकरदन, सिल्लोड, पैठण या चार पालिका आघाडीच्या ताब्यात असतांना आघाडीवर पराभवाची नामुष्की ओढवली. मोदी लाट हे त्याचे एकमेव कारण आहे. त्या लाटेत सत्तारूढ गटाचे मातब्बर पूर्णत: निष्प्रभ ठरले. हे वास्तव आहे. सर्वदूरच लाटेत काँग्रेसजन भुईसपाट झाले, आपले काय? असे लंगडे समर्थन या भागातील लोकप्रतिनिधींकडून केले जाईल. लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे स्वरूप वेगळे आहे, असेही दावे होतील. परंतु आमदार कैलास गोरंट्याल यांच्या जालन्यात, आ. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड, आ. कल्याण काळे यांच्या फुलंब्री, आ. संजय वाकचौरे यांच्या पैठण व आ. चंद्रकांत दानवे यांच्या भोकरदन या बालेकिल्ल्यात आघाडीचीच झालेली दाणादाण निश्चितपणे धडकी भरणारी आहे. या धक्कादायक निकालातून काँग्रेसजन काय बोध घेतील? हा भाग निराळा. बदनापूरने युतीस नेहमीच कौल दिला. मुळात हा युतीचाच बालेकिल्ला. याहीवेळी सर्वाधिक मताधिक्य देऊन बदनापूरने युतीच्या आशा उंचावल्या. पैठणमधून लोकसभेस सातत्याने महायुतीस कौल मिळाला. मात्र, विधानसभेत राष्ट्रवादीने बाजी मारली. यावेळीचे मताधिक्य राष्ट्रवादीस धास्तावणारे आहे. आ. कल्याण काळे यांच्या फुलंब्रीच्या बालेकिल्ल्यास आघाडीने पुन्हा सुरुंग लावला. ३३ हजाराचे मताधिक्य पटकावले. तिच बाब काळेंना चिंतेची आहे. पालिकेत आ. अब्दुल सत्तार यांनी एक हाती सत्ता मिळविली. मात्र, आपल्याच सिल्लोड या बालेकिल्ल्यात ते आघाडीस तारू शकले नाहीत. गेल्या निवडणुकीत आघाडीस मताधिक्य दिलेल्या जालन्याने यावेळी महायुतीमागे भक्कम समर्थन उभे केले. ते आ. कैलास गोरंट्याल यांना खटकणारे आहे. आ. चंद्रकांत दानवे यांनी आघाडीस तर खा. दानवे यांनी स्वत:स सर्वाधिक मताधिक्याच्या वल्गना केल्या. त्या फोल ठरल्या.