शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

पाणीटंचाईमुळे बांधकामांवर निर्बंध

By admin | Updated: January 7, 2015 01:01 IST

लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी

लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लातूर मनपाच्या आयुक्तांसह जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ बांधकामावर पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो़ त्यामुळे पाणीटंचाई अधिक जाणवेल़ त्यासाठी बांधकाम परवाने देणे स्थगित करावेत, असे या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे़ जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत़ पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, असे असतानाही शहरांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत़ या बांधकामावर मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते़ परिणामी पाणी टंचाई अधिक वाढते़ त्यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत बांधकाम परवाने देण्यात येऊ नयेत़ शिवाय, ज्या ठिकाणी बांधकामे चालू आहेत, तेही थांबविण्यात यावेत़ सुचना देऊनही बांधकामे सुरुच राहिले तर संबंधीतावर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असेही या आदेशात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी म्हटले आहे़ लातूर मनपाचे आयुक्त, उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनाही हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे़ सध्या पाणीटंचाईवर उपाययोजना सुरु असून अधिग्रहण करणे, नव्या विंधन विहरी व विहिरी घेणे तसेच जिथे गरज आहे, तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे़ टंचाईच्या स्थितीत बांधकामावर पाणी वाया घालवणे योग्य नाही़ (प्रतिनिधी)